शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती रोडवर जीवघेणा प्रवास : दररोज होतात अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:55 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागपुरात हजारो वाहन चालकांना रोज मनस्ताप सहन करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. अमरावती रोडवरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका वाहनचालकांना बसतो आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिकेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागपुरात हजारो वाहन चालकांना रोज मनस्ताप सहन करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. अमरावती रोडवरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका वाहनचालकांना बसतो आहे.नागपूर शहरात सर्वात जास्त वाहन आणि प्रवासी अमरावती महामार्गातून नागपुरात प्रवेश करतात. अमरावतीपासून नागपूरच्या वाडीपर्यंतचा चार पदरी महामार्ग उत्कृष्ट आहे. मात्र, वाडीमधून नागपूर महापालिकेच्या हद्दीत हा महामार्ग येताच त्यावर खड्ड्यांची मालिकाच सुरू होते. गेल्या काही महिन्यात या रस्त्यावर अनेक वाहनचालकांचा अपघात होऊन ते जखमी झाले आहे. काहींना जीव ही गमवावा लागला आहे. विद्यापीठ कॅम्पसपासून वाडी नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर कुठेही रात्रीची विद्युत व्यवस्था नसल्याने आणि दुभाजकाची निर्मिती अशास्त्रीय पद्धतीची असल्याने रात्रीच्या वेळी महामार्गाचा हा टप्पा वाहनचालकांना जणू यमराज सारखाच भासतो. एक महिनापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेने अमरावती महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. विद्यापीठ कॅम्पसकडून वाडी नाकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अर्ध्या पट्याचे डांबरीकरण केले. अर्ध्या डांबरीकरणामुळे रस्त्याच्या मधोमध उंचसखल भाग तयार झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या दुचाकी त्यावरून घसरून अपघात होत आहे. रात्रीच्या वेळेला दुचाकी घसरून वाहनचालक जखमी झाले आहे. आठवड्याभरापूर्वी पोस्टल कॉलनी समोर एका दाम्पत्याचा असाच अपघात होऊन महिलेच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. दोन दिवसांपूर्वी हॉटेल हायवे ग्लोरीसमोर दुचाकी रस्त्याच्या उंचसखल भागावरून घसरल्याने दोघे जण जखमी झाले.महापालिकेने काही आठवड्यापूर्वी या महामार्गावर विद्यापीठ कॅम्पसपर्यंत दुभाजकावर रिफ्लेकटर लावले. मात्र, त्यापुढच्या टप्प्यात अत्यंत धोकादायक दुभाजकाला रिफ्लेकटर न लावताच तसेच सोडून दिले.वाडी, दत्तवाडी, डिफेन्स, आठवा मैल, गोंडखैरी, लावा दवलामेटी अशा परिसरातून रोज हजारो लोक शहरात येतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे त्या सर्वांना रोज आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीroad safetyरस्ते सुरक्षा