शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

अमरावती रोडवर जीवघेणा प्रवास : दररोज होतात अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:55 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागपुरात हजारो वाहन चालकांना रोज मनस्ताप सहन करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. अमरावती रोडवरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका वाहनचालकांना बसतो आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिकेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागपुरात हजारो वाहन चालकांना रोज मनस्ताप सहन करत स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. अमरावती रोडवरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका वाहनचालकांना बसतो आहे.नागपूर शहरात सर्वात जास्त वाहन आणि प्रवासी अमरावती महामार्गातून नागपुरात प्रवेश करतात. अमरावतीपासून नागपूरच्या वाडीपर्यंतचा चार पदरी महामार्ग उत्कृष्ट आहे. मात्र, वाडीमधून नागपूर महापालिकेच्या हद्दीत हा महामार्ग येताच त्यावर खड्ड्यांची मालिकाच सुरू होते. गेल्या काही महिन्यात या रस्त्यावर अनेक वाहनचालकांचा अपघात होऊन ते जखमी झाले आहे. काहींना जीव ही गमवावा लागला आहे. विद्यापीठ कॅम्पसपासून वाडी नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर कुठेही रात्रीची विद्युत व्यवस्था नसल्याने आणि दुभाजकाची निर्मिती अशास्त्रीय पद्धतीची असल्याने रात्रीच्या वेळी महामार्गाचा हा टप्पा वाहनचालकांना जणू यमराज सारखाच भासतो. एक महिनापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेने अमरावती महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. विद्यापीठ कॅम्पसकडून वाडी नाकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अर्ध्या पट्याचे डांबरीकरण केले. अर्ध्या डांबरीकरणामुळे रस्त्याच्या मधोमध उंचसखल भाग तयार झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या दुचाकी त्यावरून घसरून अपघात होत आहे. रात्रीच्या वेळेला दुचाकी घसरून वाहनचालक जखमी झाले आहे. आठवड्याभरापूर्वी पोस्टल कॉलनी समोर एका दाम्पत्याचा असाच अपघात होऊन महिलेच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. दोन दिवसांपूर्वी हॉटेल हायवे ग्लोरीसमोर दुचाकी रस्त्याच्या उंचसखल भागावरून घसरल्याने दोघे जण जखमी झाले.महापालिकेने काही आठवड्यापूर्वी या महामार्गावर विद्यापीठ कॅम्पसपर्यंत दुभाजकावर रिफ्लेकटर लावले. मात्र, त्यापुढच्या टप्प्यात अत्यंत धोकादायक दुभाजकाला रिफ्लेकटर न लावताच तसेच सोडून दिले.वाडी, दत्तवाडी, डिफेन्स, आठवा मैल, गोंडखैरी, लावा दवलामेटी अशा परिसरातून रोज हजारो लोक शहरात येतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे त्या सर्वांना रोज आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीroad safetyरस्ते सुरक्षा