शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

उपवासाचा साबुदाणा व शेंगदाणा महाग; भाविकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 23:46 IST

Fasting sago and peanuts are expensive आषाढ महिन्यानंतर व्रतांचे दिवस सुरू होतात. भक्ती आणि उपासनेचा श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. यंदा कोरोनाकाळातच किराणासह उपवासाच्या वस्तूंच्या दरात किलोमागे १० ते २५ रुपयांची तेजी आली आहे. त्यामुळे यंदा श्रावणात भाविकांचा उपवास महागणार आहे.

ठळक मुद्दे उपवास पदार्थांच्या मागणीत वाढ : फळेही महागली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आषाढ महिन्यानंतर व्रतांचे दिवस सुरू होतात. भक्ती आणि उपासनेचा श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. यंदा कोरोनाकाळातच किराणासह उपवासाच्या वस्तूंच्या दरात किलोमागे १० ते २५ रुपयांची तेजी आली आहे. त्यामुळे यंदा श्रावणात भाविकांचा उपवास महागणार आहे. गेल्या काही वर्षांत तयार उपवास पदार्थांना मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

श्रावणात साबुदाणा, शेंगदाणा, भगर, पेंडखजूर, राजगिरा, उपवासाची भजणी, चिवडा, उपवासाचा चिवडा, नॉयलॉनच्या साबुदाण्याचा चिवडा आदी खाद्यपदार्थांना गेल्या काही वर्षांत मागणी वाढली आहे. किरकोळ किराणा दुकानात एक महिन्यापूर्वी साबुदाण्याचे दर ६० रुपये किलो होते. सध्या यात किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. श्रावणात इतवारी ठोक बाजारात जवळपास २५० टन साबुदाण्याची आवक आणि विक्री होते. पावसाळ्यात भगरला जास्त मागणी असते. भाव १२० किलोवर पोहोचले असून, किलोमागे दर्जानुसार १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे. श्रावणात जवळपास २० टन भगरची विक्री होत असल्याचे किराणा दुकानदार चंदू जैन यांनी सांगितले. उपवासाच्या दिवसात शेंगदाण्याला जास्त मागणी असते. भाव दर्जानुसार १०० ते १२० रुपये किलो आहेत. राजगिऱ्यातही ५ ते १० रुपयांची वाढ झाली असून भाव ७५ ते ८० रुपये आहेत. पेंडखजूरही २०० ते २५० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध असून कोरोनानंतर विक्री वाढल्याचे जैन म्हणाले.

नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे माजी सचिव अशोक वाधवानी म्हणाले, कोरोनानंतर उपवासाच्या वस्तूंची मागणी शहरी आणि ग्रामीण भागात कमी झाली आहे. आठवड्यातून शनिवार व रविवारी लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने ग्रामीण भागातील किरकोळ व्यापारी नागपुरात खरेदीसाठी येत नाहीत. त्याचा फटका व्यवसायाला बसला आहे.

सफरचंद २४० रुपये किलो

सध्या बाजारात फळांमध्ये सफरचंदाचे भाव सर्वाधिक आहेत. किरकोळ बाजारात दर्जानुसार २४० ते २६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सध्या केळीचे भाव ४० ते ५० रुपये डझन, मोसंबी ७० ते ८० रुपये, पपई ३० ते ५० रुपये किलो, डाळिंब ८० ते १०० रुपये किलो भाव असल्याचे सक्करदरा येथील फळ विक्रेते संतोष तिवारी यांनी सांगितले.

साबुदाणा ६०-७०

शेंगदाणा १००-१२०

भगर ११०-१२०

नॉयलॉन साबुदाणा ७०-७५

टॅग्स :InflationमहागाईnagpurनागपूरMarketबाजार