शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपवासाचा साबुदाणा व शेंगदाणा महाग; भाविकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 23:46 IST

Fasting sago and peanuts are expensive आषाढ महिन्यानंतर व्रतांचे दिवस सुरू होतात. भक्ती आणि उपासनेचा श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. यंदा कोरोनाकाळातच किराणासह उपवासाच्या वस्तूंच्या दरात किलोमागे १० ते २५ रुपयांची तेजी आली आहे. त्यामुळे यंदा श्रावणात भाविकांचा उपवास महागणार आहे.

ठळक मुद्दे उपवास पदार्थांच्या मागणीत वाढ : फळेही महागली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आषाढ महिन्यानंतर व्रतांचे दिवस सुरू होतात. भक्ती आणि उपासनेचा श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. यंदा कोरोनाकाळातच किराणासह उपवासाच्या वस्तूंच्या दरात किलोमागे १० ते २५ रुपयांची तेजी आली आहे. त्यामुळे यंदा श्रावणात भाविकांचा उपवास महागणार आहे. गेल्या काही वर्षांत तयार उपवास पदार्थांना मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

श्रावणात साबुदाणा, शेंगदाणा, भगर, पेंडखजूर, राजगिरा, उपवासाची भजणी, चिवडा, उपवासाचा चिवडा, नॉयलॉनच्या साबुदाण्याचा चिवडा आदी खाद्यपदार्थांना गेल्या काही वर्षांत मागणी वाढली आहे. किरकोळ किराणा दुकानात एक महिन्यापूर्वी साबुदाण्याचे दर ६० रुपये किलो होते. सध्या यात किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. श्रावणात इतवारी ठोक बाजारात जवळपास २५० टन साबुदाण्याची आवक आणि विक्री होते. पावसाळ्यात भगरला जास्त मागणी असते. भाव १२० किलोवर पोहोचले असून, किलोमागे दर्जानुसार १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे. श्रावणात जवळपास २० टन भगरची विक्री होत असल्याचे किराणा दुकानदार चंदू जैन यांनी सांगितले. उपवासाच्या दिवसात शेंगदाण्याला जास्त मागणी असते. भाव दर्जानुसार १०० ते १२० रुपये किलो आहेत. राजगिऱ्यातही ५ ते १० रुपयांची वाढ झाली असून भाव ७५ ते ८० रुपये आहेत. पेंडखजूरही २०० ते २५० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध असून कोरोनानंतर विक्री वाढल्याचे जैन म्हणाले.

नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे माजी सचिव अशोक वाधवानी म्हणाले, कोरोनानंतर उपवासाच्या वस्तूंची मागणी शहरी आणि ग्रामीण भागात कमी झाली आहे. आठवड्यातून शनिवार व रविवारी लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने ग्रामीण भागातील किरकोळ व्यापारी नागपुरात खरेदीसाठी येत नाहीत. त्याचा फटका व्यवसायाला बसला आहे.

सफरचंद २४० रुपये किलो

सध्या बाजारात फळांमध्ये सफरचंदाचे भाव सर्वाधिक आहेत. किरकोळ बाजारात दर्जानुसार २४० ते २६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सध्या केळीचे भाव ४० ते ५० रुपये डझन, मोसंबी ७० ते ८० रुपये, पपई ३० ते ५० रुपये किलो, डाळिंब ८० ते १०० रुपये किलो भाव असल्याचे सक्करदरा येथील फळ विक्रेते संतोष तिवारी यांनी सांगितले.

साबुदाणा ६०-७०

शेंगदाणा १००-१२०

भगर ११०-१२०

नॉयलॉन साबुदाणा ७०-७५

टॅग्स :InflationमहागाईnagpurनागपूरMarketबाजार