शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जानेवारीपासून चारचाकी वाहनात फास्टॅग अत्यावश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 10:43 IST

Nagpur News Fastag नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून नवीन अथवा जुन्या चारचाकी वाहनांना फास्टॅग आवश्यक असणार आहे. यात १ डिसेंबर २०१७ च्यापूर्वी विकलेले एम व एन कॅटॅगिरीच्या चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागातील टोल नाक्याहून ८० टक्के होत आहे इलेक्ट्रॉनिक टोल वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून नवीन अथवा जुन्या चारचाकी वाहनांना फास्टॅग आवश्यक असणार आहे. यात १ डिसेंबर २०१७ च्यापूर्वी विकलेले एम व एन कॅटॅगिरीच्या चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने फास्टॅगच्या आवश्यकतेसंदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामुळे सेंट्रल मोटर व्हेईकल १९८९ मध्ये संशोधन करण्यात आले आहे. सूत्रानुसार यापूर्वी १ डिसेंबर २०१७ नंतर नोंदणी झालेल्या सर्व नवीन चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग आवश्यक होते. नॅशनल परवाना असलेल्या वाहनांना १ ऑक्टोबर २०१९ पासून फास्टॅग अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर फॉर्म ५१(इन्शुरन्स सर्टिफिकेट)मध्ये बदल करून थर्ड पार्टी इन्शुरन्स करताना वैध फास्टॅग आवश्यक केले आहे. इन्शुरन्स सर्टिफिकेटसाठी संशोधन एप्रिल २०२१ पासून लागू होईल.

एनएचएआयने नागपूर विभागीय कार्यालयांतर्गत सर्व टोल नाक्यांवर ७० ते ८० टक्के टोल वसुली फास्टॅग अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत आहे. शिल्लक २० ते ३० टक्के वाहनांची रोख वसुली करण्यासाठी ‘लेन’ उपलब्ध केली आहे. पण पूर्णपणे फास्टॅग आवश्यक झाल्यावर रोख वसुलीसाठी उपलब्ध केलेल्या ‘लेन’ला इलेक्ट्रॉनिक टोलमध्ये बदलविण्यात येणार आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक