शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांना नाही मिळणार भरपाई

By गणेश हुड | Updated: July 29, 2023 16:45 IST

विमा काढलेल्या पिकाचाही सर्वे नाही : शासनाच्या मदतीची प्रतिक्षाच

नागपूर : मागील वर्षी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने अद्याप दिलेली नाही. त्यात यंदा २६ व २७ जुलैला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी झाली. २ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके आडवी झाली आहेत. तर कुठे जमीन खरडून गेली आहे. ज्यांनी पीक विमा काढलेला नाही. अशा शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळणार नाही. दुसरीकडे विमा काढलेला आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचा कंपन्यांनी अद्याप सर्वे केलेला नाही. त्यात शासनाच्या मदतीची प्रतिक्षाच असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

जिल्ह्याच्या उमरेड, नागपूर, कामठी, हिंगणा, आणि पारशिवनी तालुक्यातील ९८ गावांतील २५९० शेतकऱ्यांच्या २ हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे कापूस, सोयाबिन आणि तूर या पिकाचे झाले आहे. नागपूर जिल्ह्यात २६ आणि २७ जुलै रोजी धुव्वाधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर २६ जुलै रोजी झालेल्या पावसात उमरेड, नागपूर, कामठी, हिंगणा, आणि पारशिवनी तालुक्यातील ९८ गावांतील खरिपाच्या पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. मात्र पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळणार नाही. बहुसंख्य शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही. अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

विमा कंपन्यांनी विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असता अतिवृष्टीग्रस्त गावांतील परिस्थिती गंभीर आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी केली आहे.अध्यक्ष,उपाध्यक्षांनी केली १८ गावांची पाहणी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. हिंगणा तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या पेंढरी (देवळी), किरमिटी (भारकस), खडकी, सुकळी (बेलदार), बिडगणेशपुर, टाकळघाट तर नागपूर ग्रामीण मधील बैलवाडा , पांजरी (लोधी), सुकळी, मांगरूळ (तुंबडी), वाकेश्वर, वारंगा, कोलार, परसोडी, देवडी (गुजर) किन्हाळमाकडी, रुईखैरी, खापरी (सुभेदार) गावातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. तसेच पावसामुळे पडझड झालेल्या घरांची माहिती घेतली.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी