शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांना नाही मिळणार भरपाई

By गणेश हुड | Updated: July 29, 2023 16:45 IST

विमा काढलेल्या पिकाचाही सर्वे नाही : शासनाच्या मदतीची प्रतिक्षाच

नागपूर : मागील वर्षी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने अद्याप दिलेली नाही. त्यात यंदा २६ व २७ जुलैला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी झाली. २ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके आडवी झाली आहेत. तर कुठे जमीन खरडून गेली आहे. ज्यांनी पीक विमा काढलेला नाही. अशा शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळणार नाही. दुसरीकडे विमा काढलेला आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचा कंपन्यांनी अद्याप सर्वे केलेला नाही. त्यात शासनाच्या मदतीची प्रतिक्षाच असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

जिल्ह्याच्या उमरेड, नागपूर, कामठी, हिंगणा, आणि पारशिवनी तालुक्यातील ९८ गावांतील २५९० शेतकऱ्यांच्या २ हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे कापूस, सोयाबिन आणि तूर या पिकाचे झाले आहे. नागपूर जिल्ह्यात २६ आणि २७ जुलै रोजी धुव्वाधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर २६ जुलै रोजी झालेल्या पावसात उमरेड, नागपूर, कामठी, हिंगणा, आणि पारशिवनी तालुक्यातील ९८ गावांतील खरिपाच्या पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. मात्र पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळणार नाही. बहुसंख्य शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही. अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

विमा कंपन्यांनी विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असता अतिवृष्टीग्रस्त गावांतील परिस्थिती गंभीर आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी केली आहे.अध्यक्ष,उपाध्यक्षांनी केली १८ गावांची पाहणी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. हिंगणा तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या पेंढरी (देवळी), किरमिटी (भारकस), खडकी, सुकळी (बेलदार), बिडगणेशपुर, टाकळघाट तर नागपूर ग्रामीण मधील बैलवाडा , पांजरी (लोधी), सुकळी, मांगरूळ (तुंबडी), वाकेश्वर, वारंगा, कोलार, परसोडी, देवडी (गुजर) किन्हाळमाकडी, रुईखैरी, खापरी (सुभेदार) गावातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. तसेच पावसामुळे पडझड झालेल्या घरांची माहिती घेतली.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी