शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

शेतकऱ्याच्या पत्नीचा विमा रकमेसाठी १७ वर्षे संघर्ष; ग्राहक आयोगात मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2022 07:00 IST

Nagpur News विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने सरकारी विमा रकमेसाठी १७ वर्षे संघर्ष केला. अखेर तिला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने न्याय दिला.

राकेश घानोडे

नागपूर : विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने सरकारी विमा रकमेसाठी १७ वर्षे संघर्ष केला. अखेर तिला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने न्याय दिला. तिने प्रशासनाकडून मिळालेल्या मनस्तापाला कंटाळून आयोगात धाव घेतली होती.

रमाबाई टेकाम असे पीडित पत्नीचे नाव असून, त्या आलागोंदी, ता. काटोल येथील रहिवासी आहेत. त्यांचे पती पंजाबराव यांचा ३ मार्च २००५ रोजी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी काटोल तहसीलदाराकडे विमा दावा दाखल केला होता. त्या दाव्यावर दीर्घ काळ काहीच निर्णय घेण्यात आला नाही. परिणामी, त्यांनी २०१९ मध्ये ग्राहक आयोगाचे दार ठोठावले होते. आयोगाने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता टेकाम यांना विमा दाव्याचे एक लाख रुपये व या रकमेवर १५ एप्रिल २०१९ पासून ९ टक्के व्याज अदा करा, असा आदेश नुकताच आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला दिला. याशिवाय टेकाम यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १५ हजार व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कम काटोलच्या तहसीलदाराने द्यायची आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. अन्यथा देय रकमेवर १२ टक्के व्याज लागू होईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रकरणावर आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

प्रशासनाची कानउघाडणी

ग्राहक आयोगाने पीडित पत्नीला न्याय देतानाच प्रशासनाची कानउघाडणीही केली. शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार प्रदान करण्याच्या उदात्त भूमिकेतून राज्य सरकारने शेतकरी अपघात विमा योजना लागू केली. प्रशासनाने सरकारचा हेतू व ग्रामीण भागातील अशिक्षितता लक्षात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जबाबदारीपूर्वक कार्य करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर वेळेत आर्थिक मदत मिळाली नाही तर पीडित कुटुंब रस्त्यावर येते. याकरिता, प्रशासनाने भरपाई अदा करण्याकरिता तातडीने पावले उचलली पाहिजे, असे आयोगाने सुनावले.

टॅग्स :consumerग्राहक