शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, पुरोहित अन् व्यावसायिक नवरा नको गं बाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:07 IST

- इंजिनिअर्सना प्रचंड मागणी : आपल्याच क्षेत्रातील वर-वधूंना पसंती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय संस्कृतीत विवाह हा व्यवहार ...

- इंजिनिअर्सना प्रचंड मागणी : आपल्याच क्षेत्रातील वर-वधूंना पसंती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतीय संस्कृतीत विवाह हा व्यवहार नव्हे तर दोन जीवांचा, मनांचा आणि सोबतच दोन कुटुंबांचा मेळ होय. म्हणूनच साताजन्माची संकल्पना या संस्काराला जोडली गेली आहे. त्यामुळेच, विवाह संस्कार हा प्रत्येक पुरुष व स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो आणि एका अर्थाने नव्या आयुष्यास प्रारंभ होतो, असे म्हटले जाते. पूर्वी मुलाच्या कर्तृत्वावर व मुलीच्या संस्कारावर तसेच दोन्ही कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेवर विवाह जोडले जात असत. वर्तमानात स्थिती बदलली आहे. आता मुलाचे कर्तृत्व आणि मुलीचे संस्कार, बँक बॅलेन्स व भविष्यवेधी नियोजनावर अर्थात मुलाच्या प्रोफेशनवर विवाह संस्कार पार पडत असल्याचे दिसून येते. त्याच कारणाने वधू किंवा वधू कुटुंबीयांकडून शेतकरी, पौरोहित्य करणारे गुरुजी किंवा व्यावसायिक वर नाकारत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेक वर विवाहाविना आहेत तर वधूही अपेक्षित वर मिळत नसल्याने एकटे आयुष्य जगत आहेत.

इंजिनिअर्सचा भाव जादा

बारावीनंतर मुलगा पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअर्सच्या शिक्षणात गेला की लागलीच प्लेसमेंट मिळते आणि पगार सुरू होतो. पुढे त्याच्या कुवतीनुसार कंपन्या बदलत जातात आणि प्रमोशनही होत जाते. एका अर्थाने सुखासीन आयुष्याची निश्चिती असल्याने इंजिनिअर्स मुलांची व मुलींची मागणी प्रचंड आहे. वर-वधू दोघेही इंजिनिअर्स जोडीदाराला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

सेम प्रोफेशन अनुकूल

डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो. व्यवसाय सेट असल्याने आणि त्याच व्यवसायात साथ देणारा, देणारी जाेडीदार मिळाली तर कसल्याच त्रुटी उत्पन्न होत नाहीत. कलावंत कलेची जाण किंवा आदर असणारा जोडीदार निवडण्यावर भर देतो. अशी स्थिती वेगवेगळ्या क्षेत्रातील वर- वधूंची आहे. सेम प्रोफेशन असले की एकमेकांच्या अडचणी समजवून सांगण्यास अडचण निर्माण होत नाही आणि आयुष्य सुखासीन असते, अशी या मागची धारणा आहे.

मुुंबई-पुणे किंवा होम टाऊनला प्राधान्य

विशेषत: मुली नवरा मुलगा मुंबई-पुणे येथील असल्याला प्राधान्य देतात. बऱ्याच मुली शिकून याच शहरांमध्ये नोकरीला असतात. तेव्हा लग्न झाल्यावर नोकरी सोडावी लागू नये, असा त्यामागचा हेतू असतो. विशेषत: आयटी क्षेत्रात हा कल दिसून येतो. देशातील कोणत्याही शहरात नोकरी असली तर त्याच शहरातील किंवा मुंबई-पुणे येथील मुलगा मिळाला तर तिथे नोकरी मिळणे सहज शक्य असते, हेही त्यामागचे कारण आहे. अनेक मुलींना होम टाऊन नवरा अधिक प्रिय असल्याचे दिसून येते.

शेतकरी, पुरोहित, व्यावसायिक धोक्याचे

आजकाल शेती बेभरवशाची असल्याने शिकलेला असो वा सधन तरी मुली किंवा मुलीचे कुटुंबीय शेतकरी नवरा नको, अशीच भूमिका घेताना दिसतात. पौरोहित्य करणाऱ्यांची स्थिती त्याहीपेक्षा बिकट आहे. वेदांचा अभ्यास, ज्ञानी आणि तत्त्वचिंतक असला तरी धोतरावर राहणारा नवरा असला की अनेक नव्या आधुनिक युगात वावरणे कठीण जाते म्हणूनच पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींना नापसंती दिली जात आहे. व्यवसायाची स्थिती एकसारखी नसते. चढ-उतार सातत्याने असते. अशा स्थितीत नसली भानगड नको म्हणून व्यावसायिक नवरा नको गं बाई, अशी धारणा मुलींची झाली आहे.

----------

एकमेकांचा सन्मान महत्त्वाचा

एकमेकांचे प्रोफेशन पाहून वर-वधूंची निवड करणे गैर नाही. यामुळे एकमेकांचा सन्मान राखला जातो. काळाच्या ओघात प्रत्येकाला आपल्या पसंती आजमावणे योग्य आहे. मात्र, मुलींच्या बाबतीत दिसून येणारा सासू-सासऱ्यांना नकार, हा चिंतेचा विषय आहे. या प्रकारामुळे अशा मुलींबाबत समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. एकमेकांच्या माता-पित्याचा सन्मान ठेवणे गरजेचे आहे. सोबतच मुलाच्या व मुलीच्या कर्तृत्वावर विश्वास असणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

- सुप्रिया केकतपुरे, शाखा प्रमुख : अनुरूप विवाह संस्था, धरमपेठ

-------

जगाचे पोट भरणाऱ्यालाच नकार

शेतकरी नसेल तर जगाचे पोट कोण भरणार, हा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. शेतकऱ्यांविषयी सुशिक्षित लोक कळवळा व्यक्त करतात. मात्र, विवाहाचा विषय येतो, तेव्हा हेच लोक शेतकरी नवरा नको, असा उपहास करतात. मात्र, मुलगा ३५ वर्षाचा आहे, शिकलेला आहे आणि सोबत कलावंतही आहे. पोट भरतो आणि शेतीच्या भरवशावरच सगळ्या हौस भागवतो आहे. मात्र, त्याला स्थळ येतच नाही, ही दैना आहे.

- शीला रमेश उमप, शेतकरी

....................