शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

खरीप हंगाम तोंडावर; दोन लाख रुपयांवरील कर्जाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 16:47 IST

बँकांशी प्रामाणिक व्यवहार करूनही या कर्जदार शेतक ऱ्यांना नव्या सरकारच्या कर्जमाफी योजनेचा अद्याप कुठलाही लाभ मिळाला नाही. आधी नैसर्गिक संकटांचा सामना व आता कोरोना संसर्गाशी लढा त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी पुरता नागवला आहे.

ठळक मुद्दे नियमित कर्ज भरणारे शेतकरी सापडले कैचीत

शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतक ऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यात दोन लाख रुपयांवरील कर्जदार शेतकरी व उधारवाड करून नियमित कर्ज भरणा करणारे शेतकरी कैचीत सापडले. बँकांशी प्रामाणिक व्यवहार करूनही या कर्जदार शेतक ऱ्यांना नव्या सरकारच्या कर्जमाफी योजनेचा अद्याप कुठलाही लाभ मिळाला नाही. आधी नैसर्गिक संकटांचा सामना व आता कोरोना संसर्गाशी लढा त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी पुरता नागवला आहे.तालुक्यात सुमारे २० हजारावर शेतकरी असून, त्यापैकी १४,६२६ शेतकरी सेवा सहकारी संस्थांचे सभासद आहेत. यात काही शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून तर काही शेतकरी भिवापूर व उमरेड येथील राष्ट्रीययकृत बँकांतून खरीप हंगामासाठी अल्पमुदत कर्ज घेतात. निसर्गाच्या अजब चक्र व्यूहात कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी सतत नुकसानीच्या तावडीत राहीला. याची दखल घेत, सत्तारूढ होताच महाविकास आघाडी सरकारने १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीतील ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह थकीत असलेले व परतफेड न झालेले २ लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय २७ डिसेंबर २०१९ रोजी घेतला. यात थकीत कर्जदार शेतक ºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र ज्यांचे कर्ज २ लाख रुपयावर आहे किंवा जे शेतकरी कर्जाचा नियमित भरणा करून बँकांशी प्रामाणिकता जपतात त्यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी या कर्जमाफीपासून अद्याप वंचित आहेत.याबाबत शेतकऱ्यांची ओरड वाढताच, शासनाने काही निर्णय घेण्याचे सुतोवाचही केले. मात्र त्याची पूर्तता होण्यापूर्वीच, जागतिक संकट ठरलेल्या कोरोना संसर्गाचे देशात व महाराष्ट्रात आगमन झाले. गत दीड महिन्यापासून शासन-प्रशासन कोरोना संसर्गाशी तर शेतकरीबांधव सततचे नुकसान, शेतमालाला मिळणारा तुटपुंजा भाव व संचारबंदीशी भांडत रडकुंडीस आला आहे. त्यात आता खरीप हंगाम तोंडावर असताना, ना कर्जमाफी पदरात पडली, ना नव्या कर्जाची रक्कम खात्यात आली. त्यामुळे शेती करायची कशी? कुटुंब जगवायचे कसे? असे नानाविध प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.

मंत्रिमंडळाचा निर्णय, पण बँकांना आदेश नाही?‘कोरोनामुक्ती’ हे शासनाचे पहिले मिशन आहे. मात्र सोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी व नव्या कर्जाचे वितरण हीसुद्धा तितकीच महत्त्वाची बाब असल्याचे मत कृषिमित्र आनंद राऊत यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. शासनाने दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ केले. मात्र दोन लाख रुपयांवरील कर्जदार शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिला. कर्जाचा नियमित भरणा करणाºया शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली. याबाबत आम्ही निवेदने दिली. त्याची दखल घेत, शासनाने ‘ओटीएस’ अर्थात २ लाख रुपयावरील कर्जदार शेतकऱ्याने वरील रक्कम भरल्यास त्यांना २ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान जाहीर केले. तसा निर्णयसुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. मात्र याबाबतचे आदेश अद्यापही बँकांना मिळालेले नाही. कोरोना संसर्ग व संचारबंदीपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची, खरीप हंगाम तोंडावर असतानाही अंमलबजावणी झाली नाही. असेही राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी