शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

शेतकरी उगारणार सरकारवर ‘आसूड’

By admin | Updated: April 12, 2017 02:03 IST

सत्तेत येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक नफा मिळवून देऊ अशी वचने दिली होती.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करानागपूर : सत्तेत येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक नफा मिळवून देऊ अशी वचने दिली होती. परंतु एकहाती सत्ता आल्यानंतर सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. आम्ही शेतकऱ्यांचे नाहीच अशा अविर्भावात सरकार वागत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत गल्लीतून दिल्लीपर्यंत सारखीच उत्तरे मिळत आहे. बैलाला वठणीस आणण्यासाठी जसा शेतकरी त्यांच्यावर आसूड उगारतो, तसेच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सरकार शेतकऱ्यांचे ऐकत नसल्यामुळे शेतकरी सरकारवर आसूड उगारणार असल्याची भावना प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापर्यंत ही आसूड यात्रा प्रहार व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आली आहे. ११ दिवसांच्या यात्रेला आमदार निवासातून सुरुवात झाली. बच्चू कडू व शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वात आसूड यात्रा नागपूरमार्गे वर्धेकडे निघाली आहे. यात्रेत राष्ट्रीय किसान मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार शर्मा, राष्ट्रीय किसान युनियनचे हरियाणाचे गुरुनामसिंग सहभागी झाले आहेत. यात्रेत विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे. ११ दिवस ही यात्रा महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, नंदूरबार असा प्रवास करीत गुजरात येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या जन्मगावी २१ एप्रिलला पोहचणार आहे. यात्रेच्या समापनाला हजारो शेतकरी व मृत शेतकऱ्यांच्या विधवा रक्तदान करून ‘शेतकऱ्यांचे रक्त घ्या, जीव घेऊ नका’ असा संदेश सरकारला देणार आहे. (प्रतिनिधी)देशभरातील शेतकऱ्यांचा दिल्लीत घेरावदेशभरातील शेतकरी हा केवळ कर्जमुक्ती व लागत मूल्यापेक्षा अधिक हमीभाव यासाठी लढतो आहे. देशभरातील शेतकऱ्यांचा हा लढा जानेवारी २०१८ मध्ये दिल्लीत पोहचणार आहे. देशातील शेतकऱ्यांच्या ६० संघटना एकत्र येऊन, शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीत पोहचविणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून निघालेली आसूड यात्रा सरकारवर दबाव वाढविण्याचा एक भाग आहे. -शिवकुमार शर्मा, अध्यक्ष, राष्ट्रीय किसान मजदूर संघआसूड यात्रेतून सरकारकडे मागण्यास्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी तातडीने लागू करा.राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्त करा.पेरणी ते कापणीपर्यंतचा सर्व खर्च रोजगार हमी योजनेमार्फत जाहीर करा.सर्व शेतमालावरील निर्यातबंदी हटवा.शहराप्रमाणे गावातील नागरिकांना घरकूल योजनेचा लाभ द्या. अपंग, विधवा महिला यांना दारिद्र्य रेषेची आणि उत्पन्नाची अट न ठेवता अंत्योदय योजना आणि घरकूल योजनेचा लाभ द्या.अपंग, विधवा यांना ५००० रुपये प्रतिमाह मानधन द्या.