शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी उगारणार सरकारवर ‘आसूड’

By admin | Updated: April 12, 2017 02:03 IST

सत्तेत येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक नफा मिळवून देऊ अशी वचने दिली होती.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करानागपूर : सत्तेत येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक नफा मिळवून देऊ अशी वचने दिली होती. परंतु एकहाती सत्ता आल्यानंतर सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. आम्ही शेतकऱ्यांचे नाहीच अशा अविर्भावात सरकार वागत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत गल्लीतून दिल्लीपर्यंत सारखीच उत्तरे मिळत आहे. बैलाला वठणीस आणण्यासाठी जसा शेतकरी त्यांच्यावर आसूड उगारतो, तसेच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सरकार शेतकऱ्यांचे ऐकत नसल्यामुळे शेतकरी सरकारवर आसूड उगारणार असल्याची भावना प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापर्यंत ही आसूड यात्रा प्रहार व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आली आहे. ११ दिवसांच्या यात्रेला आमदार निवासातून सुरुवात झाली. बच्चू कडू व शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वात आसूड यात्रा नागपूरमार्गे वर्धेकडे निघाली आहे. यात्रेत राष्ट्रीय किसान मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार शर्मा, राष्ट्रीय किसान युनियनचे हरियाणाचे गुरुनामसिंग सहभागी झाले आहेत. यात्रेत विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे. ११ दिवस ही यात्रा महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, नंदूरबार असा प्रवास करीत गुजरात येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या जन्मगावी २१ एप्रिलला पोहचणार आहे. यात्रेच्या समापनाला हजारो शेतकरी व मृत शेतकऱ्यांच्या विधवा रक्तदान करून ‘शेतकऱ्यांचे रक्त घ्या, जीव घेऊ नका’ असा संदेश सरकारला देणार आहे. (प्रतिनिधी)देशभरातील शेतकऱ्यांचा दिल्लीत घेरावदेशभरातील शेतकरी हा केवळ कर्जमुक्ती व लागत मूल्यापेक्षा अधिक हमीभाव यासाठी लढतो आहे. देशभरातील शेतकऱ्यांचा हा लढा जानेवारी २०१८ मध्ये दिल्लीत पोहचणार आहे. देशातील शेतकऱ्यांच्या ६० संघटना एकत्र येऊन, शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीत पोहचविणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून निघालेली आसूड यात्रा सरकारवर दबाव वाढविण्याचा एक भाग आहे. -शिवकुमार शर्मा, अध्यक्ष, राष्ट्रीय किसान मजदूर संघआसूड यात्रेतून सरकारकडे मागण्यास्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी तातडीने लागू करा.राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्त करा.पेरणी ते कापणीपर्यंतचा सर्व खर्च रोजगार हमी योजनेमार्फत जाहीर करा.सर्व शेतमालावरील निर्यातबंदी हटवा.शहराप्रमाणे गावातील नागरिकांना घरकूल योजनेचा लाभ द्या. अपंग, विधवा महिला यांना दारिद्र्य रेषेची आणि उत्पन्नाची अट न ठेवता अंत्योदय योजना आणि घरकूल योजनेचा लाभ द्या.अपंग, विधवा यांना ५००० रुपये प्रतिमाह मानधन द्या.