शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शेतकरी उगारणार सरकारवर ‘आसूड’

By admin | Updated: April 12, 2017 02:03 IST

सत्तेत येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक नफा मिळवून देऊ अशी वचने दिली होती.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘सीएम टू पीएम’ आसूड यात्रा : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करानागपूर : सत्तेत येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक नफा मिळवून देऊ अशी वचने दिली होती. परंतु एकहाती सत्ता आल्यानंतर सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. आम्ही शेतकऱ्यांचे नाहीच अशा अविर्भावात सरकार वागत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत गल्लीतून दिल्लीपर्यंत सारखीच उत्तरे मिळत आहे. बैलाला वठणीस आणण्यासाठी जसा शेतकरी त्यांच्यावर आसूड उगारतो, तसेच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सरकार शेतकऱ्यांचे ऐकत नसल्यामुळे शेतकरी सरकारवर आसूड उगारणार असल्याची भावना प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापर्यंत ही आसूड यात्रा प्रहार व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आली आहे. ११ दिवसांच्या यात्रेला आमदार निवासातून सुरुवात झाली. बच्चू कडू व शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वात आसूड यात्रा नागपूरमार्गे वर्धेकडे निघाली आहे. यात्रेत राष्ट्रीय किसान मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार शर्मा, राष्ट्रीय किसान युनियनचे हरियाणाचे गुरुनामसिंग सहभागी झाले आहेत. यात्रेत विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे. ११ दिवस ही यात्रा महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, नंदूरबार असा प्रवास करीत गुजरात येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या जन्मगावी २१ एप्रिलला पोहचणार आहे. यात्रेच्या समापनाला हजारो शेतकरी व मृत शेतकऱ्यांच्या विधवा रक्तदान करून ‘शेतकऱ्यांचे रक्त घ्या, जीव घेऊ नका’ असा संदेश सरकारला देणार आहे. (प्रतिनिधी)देशभरातील शेतकऱ्यांचा दिल्लीत घेरावदेशभरातील शेतकरी हा केवळ कर्जमुक्ती व लागत मूल्यापेक्षा अधिक हमीभाव यासाठी लढतो आहे. देशभरातील शेतकऱ्यांचा हा लढा जानेवारी २०१८ मध्ये दिल्लीत पोहचणार आहे. देशातील शेतकऱ्यांच्या ६० संघटना एकत्र येऊन, शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीत पोहचविणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून निघालेली आसूड यात्रा सरकारवर दबाव वाढविण्याचा एक भाग आहे. -शिवकुमार शर्मा, अध्यक्ष, राष्ट्रीय किसान मजदूर संघआसूड यात्रेतून सरकारकडे मागण्यास्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी तातडीने लागू करा.राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्त करा.पेरणी ते कापणीपर्यंतचा सर्व खर्च रोजगार हमी योजनेमार्फत जाहीर करा.सर्व शेतमालावरील निर्यातबंदी हटवा.शहराप्रमाणे गावातील नागरिकांना घरकूल योजनेचा लाभ द्या. अपंग, विधवा महिला यांना दारिद्र्य रेषेची आणि उत्पन्नाची अट न ठेवता अंत्योदय योजना आणि घरकूल योजनेचा लाभ द्या.अपंग, विधवा यांना ५००० रुपये प्रतिमाह मानधन द्या.