शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

१३५ किलोमीटरची पदयात्रा करून शेतकरी, शेतमजूर धडकले विधानभवनावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2022 19:01 IST

Nagpur News महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात हजारो शेतकरी, शेतमजूर आपल्या न्याय मागण्यांसाठी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य किसान सभेचा भव्य मोर्चा

नागपूर : खरीप हंगामात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत असून शासनाने शेतकरी, शेतमजुरांना दिलासा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात हजारो शेतकरी, शेतमजूर आपल्या न्याय मागण्यांसाठी सहभागी झाले होते.

वणी येथून २१ डिसेंबरला या मोर्चाची सुरुवात झाली. १३५ किलोमीटरचे अंतर पायी चालून शेतकरी, शेतमजूर आपल्या न्याय्य मागण्या घेऊन शासन दरबारी पोहोचले. टेकडी मार्गावर मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी जोरदार नारेबाजी करून शेतकऱ्यांना शासनाने न्याय देण्याची मागणी केली. शासनाने शेतकऱ्यांसोबत न्याय न केल्यास आगामी निवडणुकीत शासनाला धडा शिकविण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. मोर्चातील शिष्टमंडळाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्री महोदयांनी अधिवेशन झाल्यानंतर १५ दिवसांत मुंबईत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.

नेतृत्व : अतुलकुमार अंजान, हिरालाल परदेशी, राजन क्षीरसागर, सुभाष लांडे, तुकाराम भस्मे, नयन गायकवाड, सागर दुर्योधन

मागण्या :

-पूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५५ हजार भरपाई द्यावी

-गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कायम करून मालकी हक्क द्यावा

-वनजमीन धारकांना पट्टे द्यावे, त्यासाठी वनविभागाच्या अभिप्रायाची बेकायदेशीर अट रद्द करावी

-राखीव जंगल या सदराखाली वनहक्कांची पायमल्ली बंद करावी

-वनजमिनीवरील घरांसाठीचे अतिक्रमण रीतसर करून मालकी द्यावी

-रानटी पशूंच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या ५० मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर ताडोबा अभयारण्य सफारी बंद करा

-सर्व प्रकल्पातील कालवा दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरू करा

-१८ तास वीजपुरवठा करून शेती पंपाचे वीज बिल माफ करा

-घरकूल योजनेसाठी पात्र असताना मालकीची जागा नसल्यामुळे वंचित राहिलेल्यांना जागा उपलब्ध करून द्या

 

.................

टॅग्स :agitationआंदोलन