शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

१३५ किलोमीटरची पदयात्रा करून शेतकरी, शेतमजूर धडकले विधानभवनावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2022 19:01 IST

Nagpur News महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात हजारो शेतकरी, शेतमजूर आपल्या न्याय मागण्यांसाठी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य किसान सभेचा भव्य मोर्चा

नागपूर : खरीप हंगामात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत असून शासनाने शेतकरी, शेतमजुरांना दिलासा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात हजारो शेतकरी, शेतमजूर आपल्या न्याय मागण्यांसाठी सहभागी झाले होते.

वणी येथून २१ डिसेंबरला या मोर्चाची सुरुवात झाली. १३५ किलोमीटरचे अंतर पायी चालून शेतकरी, शेतमजूर आपल्या न्याय्य मागण्या घेऊन शासन दरबारी पोहोचले. टेकडी मार्गावर मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी जोरदार नारेबाजी करून शेतकऱ्यांना शासनाने न्याय देण्याची मागणी केली. शासनाने शेतकऱ्यांसोबत न्याय न केल्यास आगामी निवडणुकीत शासनाला धडा शिकविण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. मोर्चातील शिष्टमंडळाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्री महोदयांनी अधिवेशन झाल्यानंतर १५ दिवसांत मुंबईत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.

नेतृत्व : अतुलकुमार अंजान, हिरालाल परदेशी, राजन क्षीरसागर, सुभाष लांडे, तुकाराम भस्मे, नयन गायकवाड, सागर दुर्योधन

मागण्या :

-पूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५५ हजार भरपाई द्यावी

-गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कायम करून मालकी हक्क द्यावा

-वनजमीन धारकांना पट्टे द्यावे, त्यासाठी वनविभागाच्या अभिप्रायाची बेकायदेशीर अट रद्द करावी

-राखीव जंगल या सदराखाली वनहक्कांची पायमल्ली बंद करावी

-वनजमिनीवरील घरांसाठीचे अतिक्रमण रीतसर करून मालकी द्यावी

-रानटी पशूंच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या ५० मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर ताडोबा अभयारण्य सफारी बंद करा

-सर्व प्रकल्पातील कालवा दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरू करा

-१८ तास वीजपुरवठा करून शेती पंपाचे वीज बिल माफ करा

-घरकूल योजनेसाठी पात्र असताना मालकीची जागा नसल्यामुळे वंचित राहिलेल्यांना जागा उपलब्ध करून द्या

 

.................

टॅग्स :agitationआंदोलन