शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

शेतकरी महिलांची रामगिरीवर धडक

By admin | Updated: February 29, 2016 02:46 IST

ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी धडक दिली.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा : क्रांतिकारी शेतकरी महिला संघटनानागपूर : ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी धडक दिली. मशाली घेऊन आलेल्या या महिलांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. यावेळी महिलांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुष्काळ, नापिकी, शेतमालाला बाजारपेठेत भाव नाही, त्यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत आहे. आत्महत्येमुळे शेतकऱ्याचा प्रश्न सुटत असला तरी, घरच्या महिलेवर कुटुंबाच्या पालनपोषणाचे संकट उभे ठाकले आहे. नवऱ्याच्या आत्महत्येनंतर सर्व जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. त्यासाठी या महिला शेतात राबत आहेत. मुले अनाथ झाली आहे. शेतकरी महिलांचे प्रश्न सरकारपुढे मांडावे, यासाठी क्रांतिकारी शेतकरी महिला संघटनेतर्फे रविवारी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी मंदा ठवरे यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी धडक दिली. हाती मशाली घेऊन या महिलांनी रामगिरीपुढे धरणे दिले. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, सिंचन योजना लागू करावी, शेतकऱ्यांच्या मालाला बोली लावण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर हमी भाव देण्यात यावा, वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करावी, शेतकऱ्यांच्या विधवांचे पुनर्वसन करावे, विधवांना शासनातर्फे संपूर्ण रक्कम देण्यात यावी, विदर्भातील औद्योगिक क्षेत्रात स्थानिक बेरोजगार तरुण, तरुणींना प्राधान्य देण्यात यावे, अशा मागण्या या महिलांच्या होत्या. मोर्चात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा, शेतमजूर महिलांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी महिलांनी पोलिसांना केली. सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. शेवटी पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)