शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शेतकरी विधवा असुरक्षित आणि बहिष्कृतही; धक्कादायक वास्तव, राज्य शासनाच्या आधाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:28 IST

शेतक-यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या विधवांना घर, समाज, सरकारी प्रक्रिया, शेती आदी सर्वच आघाड्यांवर संघर्ष करावा लागत आहे. त्यातही पदोपदी अपमान, अवहेलना आणि वेळप्रसंगी बहिष्काराला तोंड द्यावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

- सविता देव हरकरेनागपूर : शेतक-यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या विधवांना घर, समाज, सरकारी प्रक्रिया, शेती आदी सर्वच आघाड्यांवर संघर्ष करावा लागत आहे. त्यातही पदोपदी अपमान, अवहेलना आणि वेळप्रसंगी बहिष्काराला तोंड द्यावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.पती निधनाचे दु:ख, भावनिक आघात, अत्यंत कठीण आर्थिक परिस्थिती, कमालीची असुरक्षितता अशा परिस्थितीत स्वत:च्या अथवा मुलांच्या भविष्याचा विचार तर सोडा आजचा दिवस कसा जगायचा या काळजीने त्या खचून गेल्या. कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर येऊन पडते. महिलांच्या उत्थानासाठी कार्यरत प्रकृती संस्था व हाऊसिंग अ‍ॅण्ड लॅण्ड राईटस् नेटवर्क यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासात ही गोष्ट उघड झाली आहे.शेतकरी विधवांपुढील आव्हाने- शेतीचा सातबारा नावावर करून घेणे- संपत्तीत वाटा मिळविताना कुटुंबात होणारा विरोध- मुलांचे शिक्षण, लग्न, आजारपण- स्वत:चा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह- मुलीचा संसार तुटलाच तर, तिच्या पालनपोषणाचा प्रश्न- कर्ज परतफेड- समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन- सरकार पातळीवर मदत मिळविताना होणारा त्रासपाहणीतील निष्कर्ष- घर अथवा जमिनीवरील हक्काची मागणी केली की कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींकडून त्यांना गप्प बसवले जाते.- अधिकार मागितले की, कुटुंबात बहिष्कृतासारखी वागणूक मिळते. मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. विशेषत: पदरी मुली असलेल्या स्त्रियांना अधिकार देण्यास स्पष्टपणे नकार दिला जातो.- वारसा हक्क किंवा आत्महत्येनंतर असलेल्या अधिकारांबाबत त्या अनभिज्ञ आहेत.शासनाकडून अपेक्षा- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवांवर होणारा अन्याय आणि बहिष्कारासारख्या घटनांना आळा घालण्याकरिता धोरणांची आखणी व अंमलबजावणी केली जावी. तसेच कायदेशीर तरतुदींचे पुनरावलोकन करून आवश्यक बदल केला जावा.- मानवाधिकार व महिलांच्या अधिकारांबाबत संबंधित विभागांतील अधिकाºयांना प्रशिक्षण द्यावे. त्यांना शेतकरी विधवांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील बनवावे.- पीडित स्त्रियांसाठी समुपदेशन केंद्रे स्थापन करावीत.शेतक-यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या विधवा व मुले ज्या दाहक आर्थिक, सामाजिक आणि भावनिक वास्तवाला सामोरे जात आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न या अभ्यासात केला आहे. या परिस्थितीत काय सुधारणा करता येईल, हे देखील सुचविले आहे.- सुवर्णा दामले,कार्यकारी संचालक, प्रकृती

टॅग्स :Farmerशेतकरी