शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांची फरफट; ईपीएफओ मागत आहे जात पडताळणी प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 11:20 IST

नागपुरात कर्मचारी भविष्य निधी संघटनेत (ईपीएफओ) कार्यरत अनुसूचित जमातीच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी विभाग जात पडताळणी प्रमाणपत्र मागत आहे.

ठळक मुद्देदोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्मचारी भविष्य निधी संघटनेत (ईपीएफओ) कार्यरत अनुसूचित जमातीच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी विभाग जात पडताळणी प्रमाणपत्र मागत आहे. आर्थिक विवंचनेने दोघांच्याही कुटुंबीयांना संसाराचा गाडा हाकणे कठीण झाले आहे.मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक फायदे मिळावेत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष संजय थूल यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले आहे. शिवाय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही नवी दिल्ली येथील मुख्य कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे.ईपीएफओ नागपूर कार्यालयात वरिष्ठ सुपरवायझर पदावर कार्यरत लक्ष्मण विठ्ठल पराते यांचा १५ फेब्रुवारी २०१९ ला हृदयघाताने तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी गजानन पौनीकर यांचा ३० सप्टेंबर २०१९ ला मृत्यू झाला. या दोघांचीही नियुक्ती हलबा (अनुसूचित जमाती) या वर्गात झाली होती.नोकरीवर असताना त्यांच्यावर विभागातर्फे शो कॉज, चार्ज शीट वा निलंबनाची कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पराते यांना पत्नी आणि तीन मुली आहेत. त्यांना मृत्यूपश्चात पेन्शन, ग्रॅच्युएटी, जीपीएफ आणि लिव्ह इन कॅशमेंटचा निधी न मिळाल्याने कुटुंबीयांवर आर्थिक संकट आले आहे. कुटुंबीयातील सदस्य गेल्या एक वर्षापासून कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. ईपीएफओच्या अधिकाऱ्यांतर्फे सकारात्मक उत्तर मिळालेले नाही. हलबा वर्गात नोकरी असल्याचे कारण सांगून पेन्शन वा अन्य लाभ देण्यास विभाग मनाई करीत आहेत.लक्ष्मण पराते वा गजानन पौनीकर यांना नोकरीदरम्यान जातीसंबंधित कोणतीही कागदपत्रे मागितली नाहीत. पण मृत्यूनंतर जात पडताळणी प्रमाणपत्राच्या नावावर त्यांचे नोकरीनंतरचे सर्व लाभ थांबविण्यात आले आहेत. तसे पाहता कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर जात पडताळणी प्रमाणपत्र मागण्याची काहीही तरतूद नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकारी म्हणाले, लक्ष्मण पराते यांची नियुक्ती अनुसूचित जमातीच्या आधारावर करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देणे आवश्यक होते. कामावर असताना लक्ष्मण पराते यांच्यावर जातीच्या आधारावर कारवाई करण्यात आली नव्हती. पण त्यांनी जात पडताळणी प्रमापपत्र न दिल्याने त्यांचे आर्थिक लाभ थांबविण्यात आले आहेत. मृत्यूपश्चात लाभ मिळावेत म्हणून सरकारकडून आदेश मिळणे महत्त्वाचे आहे. पीडित परिवार लाभ मागत आहेत. पण सरकारच्या आदेशानंतरच त्यांना संपूर्ण आर्थिक फायदे देण्यात येईल. हलबा समाजासंदर्भात वेळोवेळी कोर्टाचे निर्णय येत आहेत. अनेक वर्षांपासून या जातीच्या कर्मचाऱ्यांना जात पडताळणी करण्याचे निर्देश आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार अनेक शासकीय विभाग संबंधित कर्मचाऱ्यांना जातीसंबंधित कागदपत्रे मागत आहेत. ईपीएफओमध्ये जवळपास ४० कर्मचाऱ्यांवर जात तपासणीची तलवार लटकत आहे.मृत्यूनंतर जात पडताळणी प्रमाणपत्र मागण्याचे औचित्य नाही

कोणत्याही कर्मचाऱ्याच्या जातीला खोटी ठरविण्याचा कुणालाही अधिकार नाही. लक्ष्मण पराते जिवंत असताना त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मागता आले असते. प्रसंगी कारवाईही करता आली असती. पण कामावर असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर कारवाई करण्याचे काहीच औचित्य नाही. पेन्शन, जीपीएफ, ग्रॅच्युईटी आणि लिव्ह इन कॅशमेंट हा पीडित परिवाराचा अधिकार आहे. मृत्यूनंतर जात पडताळणी प्रमाणपत्र मागणे हे न्यायाविरुद्ध आहे.- संजय थूल, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर एम्प्लॉईज असोसिएशन.

पीडित परिवाराला मदत करूअनुसूचित जमातीच्या हक्कासाठी संघटनेचा अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. शासनामध्ये कार्यरत या वर्गातील कर्मचाऱ्यांना जात पडताळणीचा त्रास होत आहे. ३३ अनुसूचित जमातींना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाही. कुणाच्या माध्यमातून पीडित कुटुंब आमच्याकडे आले तर त्यांची निश्चितच मदत करू.- नंदा पराते, अध्यक्ष,आदिम संविधान संरक्षण समिती.

टॅग्स :Governmentसरकार