शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

देशावर खोटा इतिहास लादला गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 12:13 IST

आपल्या देशाचा इतिहास हा गौरवशाली राहिला आहे. मात्र ७०० वर्षांपूर्वी झालेल्या परदेशी आक्रमणानंतरचा इतिहासच समोर आणला गेला.

ठळक मुद्देदेशाच्या अंतर्गत सुरक्षा व आव्हानांवर ‘मंथन’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशाचा इतिहास हा गौरवशाली राहिला आहे. मात्र ७०० वर्षांपूर्वी झालेल्या परदेशी आक्रमणानंतरचा इतिहासच समोर आणला गेला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील अनेक योद्ध्यांचे योगदान दाबण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न झाला. खऱ्या अर्थाने देशाच्या राजकारण्यांमुळेच अंतर्गत सुरक्षेवर आव्हान उभे ठाकले आहे, असा दावा ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केला. ‘मंथन’तर्फे आयोजित देशाची अंतर्गत सुरक्षा व आव्हान या विषयावर ते बोलत होते.चिटणवीस केंद्रात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जाणूनबुजून काही विशिष्ट लोकांसाठी फायद्याचा ठरणारा इतिहास समोर आणण्यात आला तर सत्य दाबण्यात आले. अगदी महात्मा गांधींच्या हत्या संदर्भातील कपूर आयोगाचा अहवालदेखील समोर आला नाही. देशहिताच्या मुद्यांकडे डोळेझाक करुन ‘व्होटबँक’ वाढविण्यावर भर देण्यात आला, असा आरोप यावेळी कुलश्रेष्ठ यांनी केला.आजच्या तारखेत देशासमोर पाकिस्तान किंवा चीनपेक्षा जास्त धोका हा अंतर्गत फुटिरवाद्यांचा आहे. आपल्याच देशात राहून हे लोक देशविरोधी गोष्टी बोलत आहेत, कारवायांना प्रोत्साहन देत आहेत. आज लढाई ही शस्त्रांनी किंवा युद्ध मैदानावर नव्हे कर वैचारिक पातळीवर लढली जात आहे. त्यासाठीच तथ्यहीन गोष्टी इतिहासाच्या नावाखाली पसरविल्या जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे यात राजकारणी आघाडीवर आहेत, असे ते म्हणाले.आपल्या देशाची शोकांतिका म्हणजे सुभाषचंद्र बोस यांना युद्ध गुन्हेगार ठरविण्यात आले व भगतसिंह, सावरकर यांच्या त्यागावर प्रश्नचिन्ह लागले. अनेक खरे ‘हिरो’ देशासमोर आलेच नाही, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. अंकिता देशकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.नथुराम गोडसे हिंदू दहशतवादी कसा ?दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो. मात्र तरीदेखील हिंदू दहशतवादावर चर्चा होते. मात्र इस्लाम दहशतवादावर कुणीच बोलत नाही. नथुराम गोडसे पहिला हिंदू दहशतवादी होता असे दावे करण्यात येत आहेत. गोडसेने महात्मा गांधी यांना मारून घोर पापच केले होते. त्याचे समर्थन होऊच शकत नाही. मात्र गोडसेने धर्मांधतेतून महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्या नव्हत्या. त्याने गांधींना का मारले या कारणांची चर्चा होत नाही. जर धर्माच्या आधारावर गोडसेने गांधींना मारले नव्हते तर मग तो हिंदू दहशतवादी कसा होता, असा प्रश्न कुलश्रेष्ठ यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Socialसामाजिक