शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
2
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
3
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
4
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
5
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
6
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
7
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
8
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
9
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
10
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
11
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
12
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
13
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
14
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
15
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
16
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
17
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
18
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
19
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
20
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट

महापालिकेचे डोळे उघडले, जन्माच्या दाखल्यावर टाकताहेत नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:07 IST

लोकमत इम्पॅक्ट नागपूर : १५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या जन्म दाखल्यावर नाव टाकण्याचा आदेश राज्य शासनाने दिल्यानंतरही नागपूर महापालिका ...

लोकमत इम्पॅक्ट

नागपूर : १५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या जन्म दाखल्यावर नाव टाकण्याचा आदेश राज्य शासनाने दिल्यानंतरही नागपूर महापालिका अनभिज्ञ होती. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महापालिकेच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागाचे डोळे उघडले आणि जन्माच्या दाखल्यावर नाव टाकण्याची प्रक्रिया दोन दिवसापासून सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या आरोग्य उपसंचालक व उपमुख्य निबंधक कार्यालयाच्यावतीने महापालिकेला ई-मेल पाठवून संबंधित आदेशाची अंमलबजावणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु महापालिकेच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी ई-मेलची पडताळणी केली. सोबतच आदेशाची सत्यता तपासण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने पत्र लिहिण्यात आले. जन्म मृत्यू प्रमाणपत्र विभागाला आदेशाचा ई-मेल आल्याची माहिती मिळाल्यानंतर जन्माच्या दाखल्यावर नाव टाकण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. १५ वर्ष वयापर्यंत जन्माच्या दाखल्यावर नाव टाकता येऊ शकते. परंतु त्यापेक्षा अधिक वय झाल्यानंतर जन्माच्या दाखल्यावर नाव टाकणे बंद करण्यात आले होते. राज्य शासनाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पासपोर्ट, आधारकार्डसह अनेक कागदपत्रांवर नाव टाकण्यासाठी जन्माचा दाखला महत्वाचा असतो. राज्य शासनाने १५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे नाव जन्माच्या दाखल्यावर टाकण्याची सुविधा २७ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविली आहे. उल्लेखनीय म्हणजे राज्य शासनाने यापूर्वी जन्माच्या दाखल्यावर नाव टाकण्यासाठी तीन वेळा सवलत दिली आहे. सर्वात आधी २६ ऑक्टोबर २००५ पासून २५ ऑक्टोबर २००७, दुसऱ्यांदा १ जानेवारी २०१३ पासून १३ डिसेंबर २०१४ आणि १५ मे २०१५ पासून १४ मे २०२० पर्यंत सवलत दिली होती. पाच वर्ष नाव टाकण्याची सवलत दिल्याची अधिसूचना जारी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

...................

नागरिकांमध्ये करणार जागृती

जन्म मृत्यौ प्रमाणपत्र नोंदणी विभागाचे आरोग्य अधिकारी व उपनिबंधक डॉ. अतीक उर रहमान खान यांनी सांगितले की, जन्माच्या प्रमाणपत्रावर नाव टाकण्याचा कालावधी राज्य शासनाने एप्रिल २०२६ पर्यंत वाढविला आहे. या आदेशानंतर नाव नोंदविण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांना जागरुक करण्यात येईल. ज्यांची नाव नोंद झाले नाही त्यांनी येऊन आपल्या नावाची नोंदणी करावी, असे ते म्हणाले.

..................