शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पाणी टंचाईवर उतारा

By admin | Updated: January 3, 2015 02:33 IST

पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा कृषी क्षेत्रावर परिणाम होतो. सोबतच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते.

नागपूर : पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा कृषी क्षेत्रावर परिणाम होतो. सोबतच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. यावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत जिल्ह्यातील ५२५ गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. २०१४ मध्ये पर्जन्यमानात २० टक्के पेक्षा जास्त घट असलेले राज्यात १८४ तालुके आहेत. भूजल पातळीत ३ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या तालुक्यांची संख्या ७२ आहे. २ ते ३ मीटर पेक्षा जास्त घट झालेले ११६ तर १ ते २ मीटर पेक्षा जास्त घट झालेले १९० तालुके आहेत. म्हणजेच भूगर्भातील पाणी पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या तालुक्यांची संख्या १८८ इतकी आहे. राज्यातील २२ जिल्ह्यातील १९०५९ गावांत टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केलेली आहे. २०१२-१३ या वर्षात टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पुणे विभागातील पाच जिल्ह्यात जलयुक्त गाव अभियान राबविण्यात आले होते. यात विविध योजना राबवून पाणी अडविण्यासाठी व भूजल पातळीत वाढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला होता.यात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकाम, जुने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध, जलस्रोतातील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमतेने वापर आदी बाबींवर भर देण्यात आला होता. यामुळे टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी मदत झाली. या कार्यक्र माची फलश्रुती विचारात घेता राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा शासन पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे. यात नागपूर जिल्ह्यात ५२५ गावांची निवड करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)