शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

देशभरातील जंगलांना घातक लॅन्टेनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 11:31 IST

Nagpur News केवळ विदर्भातीलच नव्हे तर देशभरातील जंगलाला लॅन्टेना (घाणेरी) या वनस्पतीचा विळखा पडला आहे. देशभरातील ४० टक्के जंगल या वनस्पतीच्या विळख्यात आले आहे.

ठळक मुद्दे केवळ व्याघ्र प्रकल्पातच निर्मूलन सुरू‘नरेगा’मधून काम थांबले

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केवळ विदर्भातीलच नव्हे तर देशभरातील जंगलाला लॅन्टेना (घाणेरी) या वनस्पतीचा विळखा पडला आहे. देशभरातील ४० टक्के जंगल या वनस्पतीच्या विळख्यात आले आहे. दिवसेंदिवस या वनस्पतीची वाढ होत असली तरी फक्त वन्यजीव अधिवास व्यवस्थापनात या वनस्पतीच्या निर्मूलनाचा समावेश करण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेतून निर्मूलनास नकार दिल्याने सध्या अन्य जंगलात लॅन्टेना निर्मूलनाचे काम थांबले आहे.

१९७२ मध्ये देशात दुष्काळ पडला असताना मिलो गव्हासोबत ही वनस्पतीही अमेरिकेतून भारतात आल्याचे सांगितले जाते. मागील ५० वर्षांत अनेक विदेशी निरुपयोगी वनस्पतीसोबतच लॅन्टेनाचीही घुसखोरी जंगलात झाली आहे. ती भारतीय जंगलाला हानीकारक असून, पहिल्या पाचमध्ये गणली जाते. लॅन्टेनाच्या निर्मूलनासाठी १९९५-९६ मध्ये प्रयत्नांना सुरुवात झाली. राज्य शासनाने जीआर काढून रोजगार हमीत समावेश केला. नंतरच्या काळात ही योजना बंद पडून ‘नरेगा’ योजना आली. त्यातही समावेश केला गेला. मात्र पुढे केंद्र सरकारने अन्न चळवळ नसल्याचे कारण देत लॅन्टेना निर्मूलन राबविण्यासाठी नकार दिला. नंतर २००४ पासून हे कामच बंद पडले. परिणामत: या विषारी वनस्पतीचा विळखा वाढला.

वन्यजिवांच्या अधिवासातच निर्मूलन

डॉ. सी. आर. बाबू यांच्या उपस्थितीत मेळघाट येथे कार्यशाळा घेण्यात आली. यात लॅन्टेना निर्मूलनावर अभ्यास करण्यात आला. ही वनस्पती वाघांसाठी धोकादायक असून, त्यांचे यकृत निकामी होते, असे अध्ययनातून पुढे आले. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात किमान तीन वर्षे सतत उच्चाटन करून त्या ठिकाणी तृणभक्षी प्राण्यांसाठी उंच गवताची लागवड करण्याची योजना मांडली गेली. त्यानंतर वन्यजिवांच्या अधिवास व्यवस्थापनात समावेश करण्यात आला.

एकाच वेळी सर्व ठिकाणी निर्मूलनाचा धडक कार्यक्रम राबविला तरच उच्चाटन शक्य आहे. यासंदर्भात आपण स्वत: केंद्राकडे विनंती केली. एनआरईजीएसमध्ये समावेश व्हावा, यासाठीही प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. आता शहरापर्यंत ही वनस्पती पसरल्याने जैवविविधतेला धोका वाढला आहे.

- किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

 

लॅन्टेना ४० टक्के जंगलात

लॅन्टेना सुमारे ४० टक्के जंगलात पसरली आहे. ती मातीतील पौष्टिक घटक नाहीसे करते. प्राण्यांच्या पोटात ही वनस्पती गेल्यास यकृत निकामी करते. मानवी शरीरालाही अपायकारक असल्याचे ‘ग्लोबल इकॉलॉजी अँड कन्झर्वेशन’च्या अभ्यासातून पुढे आले आहे. या वनस्पतीने सुमारे एक लाख ५४ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण