शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

नागपुरातील मेहंदीबाग रेल्वे अंडर ब्रिजच्या बांधकामाला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 20:52 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची विनंती मंजूर करून मेहंदीबाग येथील रेल्वे अंडर ब्रिज (आरयूबी)चे बांधकाम पूर्ण करण्यासाठी २१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदत वाढवून दिली.

ठळक मुद्देहायकोर्ट : दपूम रेल्वेची विनंती मंजूर

ऑनलाईन लोकमत 

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची विनंती मंजूर करून मेहंदीबाग येथील रेल्वे अंडर ब्रिज (आरयूबी)चे बांधकाम पूर्ण करण्यासाठी २१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदत वाढवून दिली.न्यायालयाने २३ जून २०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार या ‘आरयूबी’चे काम २२ डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण करायचे होते. परंतु, विविध करणांमुळे या मुदतीत ‘आरयूबी’चे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण दपूम रेल्वेतर्फे देण्यात आल्यामुळे न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. दपूम रेल्वेच्या वतीने वरिष्ठ विभागीय अभियंता (केंद्रीय) भोलाप्रसाद विश्वकर्मा यांनी न्यायालयात मुदतवाढीसाठी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. प्रतिज्ञापत्रानुसार, न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वेने ‘आरयूबी’चे डिझाईन तयार करणे, डिझाईन मंजूर करणे, निविदा प्रक्रिया पूर्ण करणे इत्यादी बाबी केल्या. रायपूर येथील शिवजी अ‍ॅन्ड कंपनीला ‘आरयूबी’चे कंत्राट देण्यात आले आहे. कंपनीसोबत ३० जुलै २०१७ रोजी करारही करण्यात आला आहे. १ मे २०१७ रोजी रेल्वे व मनपा अधिकाºयांनी ‘आरयूबी’ परिसराचे संयुक्त निरीक्षण केले. दरम्यान, उत्तर-पूर्व भागात अतिक्रमण, पाणी पाईप लाईन इत्यादी अडथळे आढळून आले. मनपाला ते अडथळे दूर करण्यासाठी लागणारा खर्च रेल्वे देणार असून त्याला अद्याप मंजुरी मिळायची आहे. यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर लगेच ‘आरयूबी’च्या कामाला सुरुवात केली जाईल.यासंदर्भात खैरीपुरा-बिनाकी-मंगळवारी-प्रेमनगर निवासी कृती समितीने जनहित याचिका दाखल केली होती. मेहंदीबाग रेल्वे फाटकावर यापूर्वी रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) बांधण्यात आला आहे. परंतु, परिसरातील नागरिकांना या पुलावरून गेल्यास ‘यू टर्न’ घेऊन घराकडे जाणे अडचणीचे आहे. परिणामी, परिसरातील नागरिक रेल्वे फाटकातूनच जाणे पसंत करतात. रेल्वे फाटकाजवळ केवळ १३ फुटाचा मार्ग असल्याने वाहतूक कोंडी होते. या मार्गाने रोज सुमारे ४० रेल्वेगाड्या जातात व गेट उघडायला ३० ते ४० मिनिटे लागतात़ मूळ रस्ता ४० फुटांचा असून संरक्षण भिंतीमुळे रेल्वेगेटजवळ तो १३ फुटांचा होतो. दोन्ही बाजूने हीच परिस्थिती आहे. न्यायालयाने ही याचिका निकाली काढताना येथे १८ महिन्यांत ‘आरयूबी’ बांधण्याचा आदेश दिला होता. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर तर, रेल्वेतर्फे अ‍ॅड. नितीन लांबट यांनी बाजू मांडली.महत्त्वाचे मुद्दे१ - ‘आरयूबी’ हा ‘आरओबी’ला समांतर राहणार आहे. ‘आरयूबी’ वाहतुकीसाठी मोकळा झाल्यानंतर येथील रेल्वे फाटक (५६९) बंद करण्यात येईल.२ - न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. समितीने ‘आरयूबी’ बांधण्याची सूचना केली होती.३ - दपूम रेल्वेच्या मुख्य पूल अभियंत्यांनी २० सप्टेंबर २०१६ रोजी ‘आरयूबी’च्या आराखड्याला अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर निविदा मागविण्यात आल्या.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर