शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

आर्थिक वर्ष तीन महिन्यांनी वाढल्याने करभरणा तारखेला मुदतवाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:08 AM

कोरोनाच्या उद्रेकामुळे मार्च महिन्यात व्यापारी/ उद्योजक व कंपन्यांना भरावा लागणारा कर भरणा/विवरणपत्रे (रिटर्न्स) यांच्या तारखा वाढण्याची शक्यता आहे. यावर निर्णय लवकरच होईल, अशी माहिती प्रत्यक्ष कर मंडळ व अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळातील सूत्रांनी लोकमतला दिली.

ठळक मुद्देकर मंडळ अधिकाऱ्यांची माहितीअडचणीतील लॉकडाऊ नमुळे व्यापारी आणि उद्योजकांना मिळेल दिलासा

सोपान पांढरीपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या उद्रेकामुळे मार्च महिन्यात व्यापारी/ उद्योजक व कंपन्यांना भरावा लागणारा कर भरणा/विवरणपत्रे (रिटर्न्स) यांच्या तारखा वाढण्याची शक्यता आहे. यावर निर्णय लवकरच होईल, अशी माहिती प्रत्यक्ष कर मंडळ व अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळातील सूत्रांनी लोकमतला दिली.महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, पंजाब आदी राज्यांनी लॉकडाऊन घोषित केल्यामुळे सर्व बाजारपेठा व उद्योग प्रकल्प बंद झाले आहेत. मार्चमध्येच ही परिस्थिती उद्भवल्याने व्यापारी, उद्योजक व कंपन्या प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे ३१ मार्च २०२० रोजी संपणारे २०१९-२० हे आर्थिक वर्ष १५ महिन्यांचे म्हणजेच जून २0२0 पर्यंत करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतलाच आहे. त्यामुळे करभरणा करायलाही मुदतवाढ मिळेल, अशी शक्यता दिसू लागली आहे. तशी मागणी इन्कम टॅक्स गॅझेटेड आॅफिसर्स असोसिएशनने व फेडरेशन आॅफ इन्कम टॅक्स आॅफिसर्स असोसिएशनने केली होती. रिझर्व्ह बँकेनेच आता आर्थिक वर्ष १५ महिन्यांचे करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडियाचे (आयसीएआय) अध्यक्ष अतुल गुप्ता म्हणाले की, प्राप्तिकर विभाग, व्यापारी व कंपन्यांची सॉफ्टवेअर्स १२ महिन्यांसाठी आहेत, ती सर्व बदलावी लागतील. मार्चमध्ये येणाºया करभरणा व विवरणपत्रांच्या तारखा वाढविणे हीच बहुसंख्या व्यापारी व उद्योजकांची मागणी आहे. याबाबतीत आयसीएआयने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर मंडळे, रिझर्व्ह बँक, सेबी व अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याकडे मागणी केली आहे.आर्थिक वर्षाचे महिने वाढवल्यास आणि सध्या शेअर बाजार पडलेला असताना बाजारमूल्य कमी झालेल्या मोठ्या कंपन्यांना त्याचा गैरफायदा घेतील, अशी भीती या निर्णयाआधी नागपुरातील एक ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट अभिजीत केळकर यांनी व्यक्त केली होती. प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष प्रमोदकुमार मोदी व अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष एम. अजितकुमार यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क झाला नाही.परंतु या दोन्ही मंडळांतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सध्या मोदी व अजितकुमार यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत याच मुद्यावर बैठका सुरू होत्या. त्यानंतर २0१९/२0 हे आर्थिक वर्ष ३0 जूनपर्यंत नेण्याचा निर्णय झाला.

टॅग्स :GSTजीएसटी