शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या सिलिंडरने वाढविली रेस्टॉरंट मालकांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोना काळात दीड वर्षांत रेस्टॉरंट जवळपास आठ महिने बंद राहिल्याने आणि कच्चा माल व व्यावसायिक सिलिंडरचे दर ...

नागपूर : कोरोना काळात दीड वर्षांत रेस्टॉरंट जवळपास आठ महिने बंद राहिल्याने आणि कच्चा माल व व्यावसायिक सिलिंडरचे दर तब्बल ४३५ रुपयांनी वाढल्याने रेस्टॉरंट मालकांची चिंता वाढली आहे.

गेल्या वर्षीपासून रेस्टॉरंटची बिघडलेली स्थिती अजूनही सुधारलेली नाही. यावर्षीही मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने बहुतांश दिवस रेस्टॉरंट बंद होते, तर यंदा वेळेच्या मर्यादेमुळे ग्राहकांची संख्या घटली आहे. लोक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील पदार्थांची खरेदी करणे टाळत आहेत. याशिवाय माल तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत दीडपटीने वाढ झाल्याने रेस्टॉरंट केवळ नावापुरतेच चालवावे लागत आहे. आता रेस्टॉरंटमध्ये नाश्ता आणि हॉटेलमध्ये जेवण महाग झाले आहे. त्यातच रेस्टॉरंटला लागणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरची (१९ किलो) वर्षभरात ४३५ रुपयांनी वाढ झाली आहे. महागाई वाढल्याने कर्मचारी पगारवाढीची मागणी करीत आहेत. याशिवाय विजेचे दर, प्रॉपर्टी कर, पाण्याचे बिल आदींची वाढ झाली आहे. ना नफा, ना तोटा, या तत्त्वावर रेस्टॉरंट सुरू आहे. कधी कधी पदार्थ उरल्यास तोटाही सहन करावा लागतो. सध्या सण नसल्याने मिठाईला मागणी कमीच आहे. या सर्व कारणामुळे रेस्टॉरंट चालवावे वा नाही, या चिंतेत बहुतांश रेस्टॉरंट मालक असून, अनेकांनी काही दिवसासाठी रेस्टॉरंट बंद केल्याची माहिती नंदनवन येथील राम भंडारचे मालक वसंत गुप्ता यांनी दिली.

पदार्थांच्या किमती वाढविण्याची जोखीम

भाज्या, खाद्यतेल आणि डिझेल वाढल्याने सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. फिनिश मालाच्या वस्तूंची किमत २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. अशा महागाईत मालाच्या किमती वाढविणे ही एक जोखिमच आहे. किंमत वाढविल्यास खर्च निघणे कठीण होणार आहे. लोकांची खरेदी कमी झाली आहे. त्यातच भाव वाढविल्यास लोक खरेदीसाठी येणार नाहीत, अशी भीती वाटते. त्यामुळे वर्षापासून पदार्थांच्या किमती वाढविल्या नाहीत. निरंतर वाढत्या महागाईत रेस्टॉरंट चालविणे कठीण झाल्याचे गुप्ता म्हणाले.

नागपुरात पाच हजारांपेक्षा जास्त रेस्टॉरंट

नागपुरात नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत तसेच हातठेल्यावर खाद्यपदार्थांची विक्री होणारे जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त रेस्टॉरंट आहेत. त्यातील अनेक बंद पडले आहेत. नंदनवन भागात हातठेल्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणारे सुहास बुटले म्हणाले, कोरोना संकटानंतर खाद्यपदार्थांची विक्री अर्ध्यापेक्षा कमी झाली आहे. त्यात मनपा प्रशासनाचे दुपारी ४ वाजता दुकान बंद करण्याचे निर्देश असल्याने दंड आकारण्याची भीती आहे. त्यामुळे अनेकदा नफा तर सोडा कच्च्या मालाचीही किंमत निघत नाही. गेल्या वर्षी सहा महिने व्यवसाय बंद होता. त्यामुळे कुटुंबीयांचा खर्च चालविण्याची चिंता होती. यावर्षीही तीच चिंता सतावत आहे. प्रशासनाने वेळेची मर्यादा हटवावी.