शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

महागड्या सिलिंडरने वाढविली रेस्टॉरंट मालकांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोना काळात दीड वर्षांत रेस्टॉरंट जवळपास आठ महिने बंद राहिल्याने आणि कच्चा माल व व्यावसायिक सिलिंडरचे दर ...

नागपूर : कोरोना काळात दीड वर्षांत रेस्टॉरंट जवळपास आठ महिने बंद राहिल्याने आणि कच्चा माल व व्यावसायिक सिलिंडरचे दर तब्बल ४३५ रुपयांनी वाढल्याने रेस्टॉरंट मालकांची चिंता वाढली आहे.

गेल्या वर्षीपासून रेस्टॉरंटची बिघडलेली स्थिती अजूनही सुधारलेली नाही. यावर्षीही मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने बहुतांश दिवस रेस्टॉरंट बंद होते, तर यंदा वेळेच्या मर्यादेमुळे ग्राहकांची संख्या घटली आहे. लोक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील पदार्थांची खरेदी करणे टाळत आहेत. याशिवाय माल तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत दीडपटीने वाढ झाल्याने रेस्टॉरंट केवळ नावापुरतेच चालवावे लागत आहे. आता रेस्टॉरंटमध्ये नाश्ता आणि हॉटेलमध्ये जेवण महाग झाले आहे. त्यातच रेस्टॉरंटला लागणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरची (१९ किलो) वर्षभरात ४३५ रुपयांनी वाढ झाली आहे. महागाई वाढल्याने कर्मचारी पगारवाढीची मागणी करीत आहेत. याशिवाय विजेचे दर, प्रॉपर्टी कर, पाण्याचे बिल आदींची वाढ झाली आहे. ना नफा, ना तोटा, या तत्त्वावर रेस्टॉरंट सुरू आहे. कधी कधी पदार्थ उरल्यास तोटाही सहन करावा लागतो. सध्या सण नसल्याने मिठाईला मागणी कमीच आहे. या सर्व कारणामुळे रेस्टॉरंट चालवावे वा नाही, या चिंतेत बहुतांश रेस्टॉरंट मालक असून, अनेकांनी काही दिवसासाठी रेस्टॉरंट बंद केल्याची माहिती नंदनवन येथील राम भंडारचे मालक वसंत गुप्ता यांनी दिली.

पदार्थांच्या किमती वाढविण्याची जोखीम

भाज्या, खाद्यतेल आणि डिझेल वाढल्याने सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. फिनिश मालाच्या वस्तूंची किमत २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. अशा महागाईत मालाच्या किमती वाढविणे ही एक जोखिमच आहे. किंमत वाढविल्यास खर्च निघणे कठीण होणार आहे. लोकांची खरेदी कमी झाली आहे. त्यातच भाव वाढविल्यास लोक खरेदीसाठी येणार नाहीत, अशी भीती वाटते. त्यामुळे वर्षापासून पदार्थांच्या किमती वाढविल्या नाहीत. निरंतर वाढत्या महागाईत रेस्टॉरंट चालविणे कठीण झाल्याचे गुप्ता म्हणाले.

नागपुरात पाच हजारांपेक्षा जास्त रेस्टॉरंट

नागपुरात नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत तसेच हातठेल्यावर खाद्यपदार्थांची विक्री होणारे जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त रेस्टॉरंट आहेत. त्यातील अनेक बंद पडले आहेत. नंदनवन भागात हातठेल्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणारे सुहास बुटले म्हणाले, कोरोना संकटानंतर खाद्यपदार्थांची विक्री अर्ध्यापेक्षा कमी झाली आहे. त्यात मनपा प्रशासनाचे दुपारी ४ वाजता दुकान बंद करण्याचे निर्देश असल्याने दंड आकारण्याची भीती आहे. त्यामुळे अनेकदा नफा तर सोडा कच्च्या मालाचीही किंमत निघत नाही. गेल्या वर्षी सहा महिने व्यवसाय बंद होता. त्यामुळे कुटुंबीयांचा खर्च चालविण्याची चिंता होती. यावर्षीही तीच चिंता सतावत आहे. प्रशासनाने वेळेची मर्यादा हटवावी.