शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

एक्झिट पोलने वाढविला बीपी

By admin | Updated: May 13, 2014 00:52 IST

लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले आणि सायंकाळी एक्झिट पोलचा वर्षाव सुरू झाला. या वर्षावात कमळ फुलणार व केंद्रात एनडीएचे सरकार येणार असल्याचे भाकीत केले.

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले आणि सायंकाळी एक्झिट पोलचा वर्षाव सुरू झाला. या वर्षावात कमळ फुलणार व केंद्रात एनडीएचे सरकार येणार असल्याचे भाकीत केले. यामुळे नागपूरच्या राजकीय वतरुळातही नेत्यांचा बीपी वाढला. भाजपचे राष्ट्रीय नेते गडकरी यांच्यासह शिवसेनेचे कृपाल तुमाने आजच जिंकले, असा दावा युतीचे नेते करीत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसजनांना अजूनही खा. विलास मुत्तेमवार व खा. मुकुल वासनिक विजयी होतील, अशी आशा आहे.

निकालासाठी तीन दिवस शिल्लक राहिले असताना पुन्हा एकदा नागपुरात कोण जिंकणार, याबाबतच्या चर्चांना जोर चढला आहे. टीम भाजप उत्साहात आहे. गडकरी पाच नव्हे तर पन्नास हजारांहून अधिक मतांनी जिंकतील, असा दावा करीत आहे. दुसरीकडेही काँग्रेसचे बहुतांश नेतेही विलास मुत्तेमवार जिंकतीलच असे ठामपणे सांगताना दिसत नाही. मात्र, मुत्तेमवारांसाठी मैदानात झटणारी टीम पाचव्यांदा विलासभाऊच दिल्ली गाठतील, असा दावा करीत आहे. रामटेकमध्येही अशीच काहीशी चर्चा आहे. शिवसेनेचे कृपाल तुमाने हे मोठय़ा फरकाने जिंकतील, अशाच चर्चा लग्नसोहळे, साक्षगंध आदी कार्यक्रमांमध्ये रंगताना दिसत आहेत. काँग्रेस कार्यकर्तेही या चर्चांना फारसा विरोध करताना दिसत नाही. निकाल लागू द्या, वासनिकच जिंकलेले दिसतील, असा शेवटचा सूर आवळून ते चर्चेला विराम देत आहेत.

भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे म्हणाले, मतदानाची टक्केवारी १५ टक्क्यांनी वाढली आहे. भाजपने शहरात संघटनात्मक काम केले. गडकरींनी गेली ३५ वर्षे नागपूरकरांची सेवा केली. त्यामुळे मतदारांनी त्यांना भरभरून साथ दिली आहे. ते एक लाखावर मतांनी निवडून येतील, यात शंका नाही. केंद्रात २७२ चे स्वप्न साकार होताना दिसत आहे. गडकरींना दिल्लीत पाठवून नागपूरकरही यात आपला वाटा देणार आहेत, असेही खोपडे म्हणाले. दुसरीकडे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. विरोधी लाटेत इंदिरा गांधी हरल्या तेव्हा नागपुरातून गेव्ह आवारी निवडून आले होते. सर्व समाजाने काँग्रेसला चांगले मतदान केले आहे. भाजपने वर्षभरापूर्वी प्रचार सुरू केला होता. पण शेवटी काँग्रेसने धडाका लावला व भाजपचा जोर कमी झाला. सोनिया गांधी यांनी चिखलीच्या सभेत दिलेला ‘वारे पंजा’चा नारा नागपुरात खरा ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)