शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

एक्झिट पोलने वाढविला बीपी

By admin | Updated: May 13, 2014 00:52 IST

लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले आणि सायंकाळी एक्झिट पोलचा वर्षाव सुरू झाला. या वर्षावात कमळ फुलणार व केंद्रात एनडीएचे सरकार येणार असल्याचे भाकीत केले.

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले आणि सायंकाळी एक्झिट पोलचा वर्षाव सुरू झाला. या वर्षावात कमळ फुलणार व केंद्रात एनडीएचे सरकार येणार असल्याचे भाकीत केले. यामुळे नागपूरच्या राजकीय वतरुळातही नेत्यांचा बीपी वाढला. भाजपचे राष्ट्रीय नेते गडकरी यांच्यासह शिवसेनेचे कृपाल तुमाने आजच जिंकले, असा दावा युतीचे नेते करीत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसजनांना अजूनही खा. विलास मुत्तेमवार व खा. मुकुल वासनिक विजयी होतील, अशी आशा आहे.

निकालासाठी तीन दिवस शिल्लक राहिले असताना पुन्हा एकदा नागपुरात कोण जिंकणार, याबाबतच्या चर्चांना जोर चढला आहे. टीम भाजप उत्साहात आहे. गडकरी पाच नव्हे तर पन्नास हजारांहून अधिक मतांनी जिंकतील, असा दावा करीत आहे. दुसरीकडेही काँग्रेसचे बहुतांश नेतेही विलास मुत्तेमवार जिंकतीलच असे ठामपणे सांगताना दिसत नाही. मात्र, मुत्तेमवारांसाठी मैदानात झटणारी टीम पाचव्यांदा विलासभाऊच दिल्ली गाठतील, असा दावा करीत आहे. रामटेकमध्येही अशीच काहीशी चर्चा आहे. शिवसेनेचे कृपाल तुमाने हे मोठय़ा फरकाने जिंकतील, अशाच चर्चा लग्नसोहळे, साक्षगंध आदी कार्यक्रमांमध्ये रंगताना दिसत आहेत. काँग्रेस कार्यकर्तेही या चर्चांना फारसा विरोध करताना दिसत नाही. निकाल लागू द्या, वासनिकच जिंकलेले दिसतील, असा शेवटचा सूर आवळून ते चर्चेला विराम देत आहेत.

भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे म्हणाले, मतदानाची टक्केवारी १५ टक्क्यांनी वाढली आहे. भाजपने शहरात संघटनात्मक काम केले. गडकरींनी गेली ३५ वर्षे नागपूरकरांची सेवा केली. त्यामुळे मतदारांनी त्यांना भरभरून साथ दिली आहे. ते एक लाखावर मतांनी निवडून येतील, यात शंका नाही. केंद्रात २७२ चे स्वप्न साकार होताना दिसत आहे. गडकरींना दिल्लीत पाठवून नागपूरकरही यात आपला वाटा देणार आहेत, असेही खोपडे म्हणाले. दुसरीकडे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. विरोधी लाटेत इंदिरा गांधी हरल्या तेव्हा नागपुरातून गेव्ह आवारी निवडून आले होते. सर्व समाजाने काँग्रेसला चांगले मतदान केले आहे. भाजपने वर्षभरापूर्वी प्रचार सुरू केला होता. पण शेवटी काँग्रेसने धडाका लावला व भाजपचा जोर कमी झाला. सोनिया गांधी यांनी चिखलीच्या सभेत दिलेला ‘वारे पंजा’चा नारा नागपुरात खरा ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)