शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काळामुळेच आहे सृष्टीचे अस्तित्व

By admin | Updated: September 11, 2015 03:37 IST

काळाच्या प्रेरणेमुळे सूर्य या सृष्टीला प्रकाशमान करीत असून काळामुळेच या सृष्टीचे अस्तित्व आहे,

महेश्वरी प्रसाद : ‘भारत मे समय की संकल्पना’ यावर व्याख्याननागपूर : काळाच्या प्रेरणेमुळे सूर्य या सृष्टीला प्रकाशमान करीत असून काळामुळेच या सृष्टीचे अस्तित्व आहे, असे प्रतिपादन प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभाग बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे माजी प्राध्यापक डॉ. महेश्वरी प्रसाद यांनी आज येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती व्याख्यानमालेत ‘भारत मे समय की संकल्पना’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम उपस्थित होते. डॉ. महेश्वरी प्रसाद म्हणाले, काळामुळेच जमिनीची निर्मिती होऊन त्यावर प्राणिमात्रांना आश्रय घेण्यास जागा मिळाली. काळामुळेच सर्व जग सुखी होते. काळच ईश्वर, प्रजा यांचा पालक आहे. काळामुळेच तपशक्ती, दिशांची निर्मिती झाली. काळामुळे वायु प्रवाहित होऊन पृथ्वीला गती मिळते. ब्रह्म या संकल्पनेचा विस्तार झाल्यामुळे उपनिषदांमध्ये काळाची स्थिती गौण झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु वेदांताचे काही संप्रदाय काळाला ईश्वराची शक्ती म्हणून स्वीकार करतात. काळामुळे प्राणी जन्म घेतात, मोठे होतात आणि त्यांचा अस्तही होतो. काळाचे ज्ञान प्रत्यक्ष नाही, परंतु अंदाजाने घेता येते. जैनदर्शनही काळाची वास्तविक सत्ता मान्य करतो. या दर्शनानुसार काळाचे सहा द्रव्य आहेत. त्यात जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काळ यांचा समावेश आहे. पतंजली यांनी ज्यामुळे मूर्त पदार्थांची वृद्धी, ऱ्हास होताना दिसतो तो काळ अशी व्याख्या केली असल्याचे त्यांनी सांगितले. भागवतातही काळामुळेच प्राण्यांची निर्मिती आणि संहार होत असल्याचे मान्य करण्यात आल्याचे ते म्हणाले. विज्ञानाने आधुनिक काळात केलेल्या प्रगतीचे योग्य विश्लेषण आवश्यक असून या विश्लेषणाला काळाच्या कसोटीवर तपासून पाहता आले तर ही आमची मोठी उपलब्धी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांनी काळ सर्व समावेशक असून गेलेला काळ परत मिळविणे शक्य नसल्याचे सांगितले. संचालन प्रीती त्रिवेदी यांनी केले. आभार कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)