शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

याकूबच्या फाशीने अखेरच्या क्षणी भरली होती धडकी

By admin | Updated: July 30, 2016 02:18 IST

सर्व तयारी झाली होती. जवळपास पूर्णच कारागृह प्रशासन फाशीच्या अंमलबजावणीसाठी सज्ज होते.

टीम नागपूरही आली होती दडपणात : वर्षभरानंतर खुलासा नरेश डोंगरे नागपूर सर्व तयारी झाली होती. जवळपास पूर्णच कारागृह प्रशासन फाशीच्या अंमलबजावणीसाठी सज्ज होते. परंतु, २९ जुलैच्या मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या घडामोडीमुळे ‘आॅपरेशन याकूब’ राबविणारी ‘टीम नागपूर’ अस्वस्थ झाली होती. फाशी होणार की टळणार, या मुद्याने अनिश्चितता नव्हे थरार वाढवला होता. त्यामुळे शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही प्रचंड दडपणात होतो, अशी माहितीवजा कबुली याकूबच्या फाशीची अंमलबजावणी करण्यात मुख्य भूमिका वठविणारे कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांनी शुक्रवारी लोकमतशी बोलताना दिली. देश हादरवणाऱ्या १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील सिद्धदोष आरोपी याकूब अब्दुल रज्जाक मेमन याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ ला सकाळी ७ वाजता फाशी देण्यात आले. ३० जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर, लोकमत प्रतिनिधीने कारागृहातील सुरक्षा आढावा घेतानाच अधीक्षक देसाई यांच्याशी बातचित केली. देसाई यांनी २६ / ११ चा आरोपी, पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला पुण्याच्या येरवडा कारागृहात फासावर टांगले. कसाब नंतर संसद हल्ल्याचा आरोपी अफजल गुरू याला फाशी देण्यात आले. या दोन्ही फाशीच्या घटनेनंतर शत्रुघ्न चव्हाण या याचिकाकर्त्याने न्यायालयात फाशीच्या शिक्षेच्या अनुषंगाने याचिका सादर केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून याकूबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करायची होती. २०१४ नंतरची ही पहिलीच फाशी होती. त्यामुळे प्रारंभापासूनच दडपण होते. वरिष्ठ आणि अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने फाशीच्या शिक्षेची प्रक्रिया महिनाभरापासूनच नागपुरात सुरू झाली. मार्च २०१५ मध्ये जेल ब्रेक झाले. ४८ तास कुणी झोपलेच नाही २९ जुलैच्या मध्यरात्री विलक्षण नाट्य घडले. त्यामुळे ४८ तासांपासून ‘आॅपरेशन याकूब’साठी अविश्रांत कार्यरत ‘असलेल्या टीम नागपूर’मधील अस्वस्थता तीव्र झाली. राज्यपालांनी फेटाळलेल्या दयेच्या अर्जाला आव्हान देत याकूबच्यावतीने देशातील काही नामवंत वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे धाव घेतली. त्यानंतर ऐतिहासिक घडामोडी सुरू झाल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ खंडपीठापुढे पहाटेपर्यंत याकूबचे वकील आणि सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. तो चार-साडेचार तासांचा कालावधी प्रचंड थरारक होता. नागपूर-मुंबई-दिल्लीचा निरंतर संपर्क सुरू होता. दर तासा-अर्ध्या तासात फोन खणखणत होता. तशी अस्वस्थता तीव्र होत होती. फाशी होणार की नाही, त्याबाबत संभ्रम होता. परिणामी घालमेल वाढली होती. अखेर ४.४६ वाजता याकूबच्या वकिलांनी केलेले सर्व दावे फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने फाशीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळाली अन् ...याकूबला फाशी देण्यात आल्यानंतरही पुढचे १२ तास टीम नागपूर जागीच होती. आज तो घटनाक्रम आठवताना तो थरारही आठवतो, असे देसाई सांगतात. सर्व ठिकठाक मात्र... याकूबच्या फाशीला एक वर्षाचा कालावधी झाला. कारागृहाच्या आतबाहेरच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. सर्व ठीकठाक आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून आजही कारागृहातील पश्चिम तसेच उत्तर-दक्षिणेकडील प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. कारागृहाच्या आतमधील (मुख्य प्रवेशद्वार) परिसरात मोठ्या संख्येत पोलीस तैनात होते. अर्धा डझन वाहने आणि अ‍ॅम्बुलन्सही सज्ज होती. प्रत्येकाला दूरवरच थांबवून पूर्ण तपासणी केल्यानंतर प्रवेश दिला जात होता. कारागृहाच्या बाहेर २९ जुलै २०१५ च्या वातावरणाची अनुभूती येत होती. तर आतमधील व्यवस्थाही याकूबच्या फाशीच्या वर्षपूर्तीची आठवण करून देत होती.