शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

पांढरे केस लपविण्यासाठी ‘डाय’ करताय? केमिकल लोचा झाला तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2022 14:21 IST

हेअर डायच्या अधिक वापराने आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो.

ठळक मुद्देअनुवांशिकपणा व तणावामुळेही होतात पांढरे केस केसांची योग्य काळजी व पोषण महत्त्वाचे

नागपूर : प्रत्येकाच्या सौंदर्यात भर घालण्यात त्याच्या केसांचा खूप मोठा वाटा असतो. दाट, काळेभोर आणि नीटनेटके केस समोरच्या व्यक्तीवर वेगळीच छाप पाडतात. परंतु, अलीकडे मोठ्यांचेच नव्हे तर लहान मुलांचेही केस पांढरे होण्याच्या समस्येत वाढ झाली आहे.

केस पांढरे झाले की कमी वेळ आणि कमी खर्चाचा उपाय म्हणून केसांना ‘हेअर डाय’ लावण्याचे प्रमाणही वाढले आहे; पण हेअर डायच्या अधिक वापराने आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे कमी वयात केस पांढरे होणे यापेक्षाही केस काळे करण्यासाठी हेअर डाय वापरणे अनेकांना जास्त काळजी वाढविणारे ठरत आहे.

-केस अकाली पांढरे का होतात

: अनुवांशिकपणा, केसांची योग्य काळजी न घेणे, त्यांना योग्य पोषण न मिळणे

: एका अभ्यासानुसार तणाव आपल्याला वेळेआधीच वृद्धत्वाकडे घेऊन जातो.

: ‘व्हिटॅमिन बी-१२’ची कमी. याच्या कमतरतेमुळे आपल्या केसांना काळे ठेवण्याचे काम करणारे मेलानिन हे तत्त्व नवीन पेशीची निर्मिती करणे थांबवते.

:ज्या लोकांना नेहमी डोकेदुखी किंवा सायनस किंवा ॲनिमिया आजार असतो, त्या लोकांचे केसदेखील वेळेआधीच पांढरे होतात.

:मुधमेहामुळेसुद्धा केस पांढरे होण्याचा धोका असतो.

:मद्यपान, धूम्रपान, आदींचे व्यसनसुद्धा केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरतात.

-डायआधी हे करून पाहा

: आवळा पावडर आणि रिठा पावडर यांचा वापर केसांसाठी परिणामकारक मानले जाते. हा उपाय करण्यासाठी एका लोखंडी कढईत आवळा पावडर व रिठा पावडर एकत्र करून रात्रभर भिजवावी. हे मिश्रण दुसऱ्या दिवशी सकाळी केसांना लावावे. हा लेप केसांवर ४५ मिनिटे ते एक तास ठेवून पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा हा उपाय करावा.

:: आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे केसांना कांद्याचा रस लावणे. केस विंचरून मग हा रस केसांच्या मुळांना लावावा. हा रस पूर्ण सुकला की मग केस शाम्पूने धुवावेत. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कांद्याचा रस लावावा. याचा चांगला प्रभाव दिसून येतो.

-डाय लावताना ही काळजी घ्या

हेअर डाय लावण्यापूर्वी त्याची ‘ॲलर्जी’ तर नाही याची तपासणी करून घ्या. यासाठी कानाच्या मागील भागात डाय लावून काही तास राहू द्या, त्यानंतर जर खाज सुटली किंवा त्वचा लालसर झाली तर तो डाय वापरू नका.

- आहाराकडे लक्ष आवश्यक

पूर्वी ४० नंतर पांढरे केस व्हायचे. अलीकडे ३० नंतर पांढऱ्या केसाच्या समस्या वाढल्या आहेत. सात ते आठ वर्षांतील मुला-मुलींमध्ये सुद्धा ही समस्या दिसून येत आहे. या मागे अनेक कारणे असले तरी महत्त्वाचे एक कारण म्हणजे आपला आहार. हा आहार योग्य नसला की त्याचा प्रभाव केसांवरही पडतो.

- डॉ. नितीन बरडे, त्वचा व केस रोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यHair Care Tipsकेसांची काळजी