शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

उपराजधानीत जीव धोक्यात घालून पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 10:11 IST

नागपूर शहरात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या परिचारिकांना कुठल्याही स्वरूपाची सुरक्षा साधने महापालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेली नाहीत.

ठळक मुद्देमनपाकडून परिचारिकांना सुरक्षेची साधने उपलब्ध नाहीतआरोग्य विभागात नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गामुळे खासगी व सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात संसर्गाची लागण झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असतानाही नागपूर शहरात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या परिचारिकांना कुठल्याही स्वरूपाची सुरक्षा साधने महापालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेली नाहीत. यामुळे त्यांना जीव धोक्यात घालून तपासणी करावी लागत आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात संसर्गित रुग्णांची संख्या पाच हजारांच्या जवळ गेली आहे. तर मृत रुग्णांची संख्या शंभराहून अधिक झाली आहे. दुसरीकडे यात दररोज तीनशेहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने मेयो, मेडिकल रुग्णालयावरील भार वाढला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संसर्गित रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. या रुग्णांची तपासणी करण्यासाठी परिचारिका त्यांच्या घरी जात आहेत. परंतु त्यांना महापालिकेने सुरक्षा किट उपलब्ध केलेली नाही. रबरी हॅण्डग्लोव्हज, एन-९५ मास्क, सॅनिटायझर उपलब्ध केले नसल्याने संसर्गाचा धोका असल्याने परिचारिका दहशतीत काम करत आहेत.मेहंदी लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हॅण्ड ग्लोव्हजचा वापरमहापालिकेच्या आरोग्य विभागाने पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या परिचारिकांना रबरी हॅण्ड ग्लोव्हज उपलब्ध केले नसल्याने मेहंदी लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हॅण्ड ग्लोव्हजचा वापर या परिचारिका करीत आहेत. असे करणे धोकादायक आहे.रिक्त जागा असूनही संधी का नाही?महापालिकेत आरोग्य विभागातील पाचशेहून अधिक पदे रिक्त आहेत. यात तीनशेहून अधिक परिचारिकांची पदे आहेत. दुसरीकडे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून २५० कंत्राटी परिचारिका काम करतात. त्यांना कायम का केले जात नाही, हा संशोधनाचा विषय आहे. परिणामी त्यांना आठ ते दहा हजार रुपये अशा तुटपुंज्या मानधनात कोरोना कालावधीत जोखमीचे काम करावे लागत आहे.आरोग्य विभागात नियोजनाचा अभावमहापालिकेच्या आरोग्य विभागात नियोजन व समन्वयाचा अभाव आहे. कर्मचारी व अधिकारी यांना मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी वेळोवेळी काम पडते. परंतु अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही यामुळे वेळीच उपाययोजना करता येत नाहीत. काम करताना अडचणी येतात, अशी माहिती आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस