शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

उपराजधानीत जीव धोक्यात घालून पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 10:11 IST

नागपूर शहरात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या परिचारिकांना कुठल्याही स्वरूपाची सुरक्षा साधने महापालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेली नाहीत.

ठळक मुद्देमनपाकडून परिचारिकांना सुरक्षेची साधने उपलब्ध नाहीतआरोग्य विभागात नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गामुळे खासगी व सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात संसर्गाची लागण झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असतानाही नागपूर शहरात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या परिचारिकांना कुठल्याही स्वरूपाची सुरक्षा साधने महापालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेली नाहीत. यामुळे त्यांना जीव धोक्यात घालून तपासणी करावी लागत आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात संसर्गित रुग्णांची संख्या पाच हजारांच्या जवळ गेली आहे. तर मृत रुग्णांची संख्या शंभराहून अधिक झाली आहे. दुसरीकडे यात दररोज तीनशेहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने मेयो, मेडिकल रुग्णालयावरील भार वाढला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संसर्गित रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. या रुग्णांची तपासणी करण्यासाठी परिचारिका त्यांच्या घरी जात आहेत. परंतु त्यांना महापालिकेने सुरक्षा किट उपलब्ध केलेली नाही. रबरी हॅण्डग्लोव्हज, एन-९५ मास्क, सॅनिटायझर उपलब्ध केले नसल्याने संसर्गाचा धोका असल्याने परिचारिका दहशतीत काम करत आहेत.मेहंदी लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हॅण्ड ग्लोव्हजचा वापरमहापालिकेच्या आरोग्य विभागाने पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या परिचारिकांना रबरी हॅण्ड ग्लोव्हज उपलब्ध केले नसल्याने मेहंदी लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हॅण्ड ग्लोव्हजचा वापर या परिचारिका करीत आहेत. असे करणे धोकादायक आहे.रिक्त जागा असूनही संधी का नाही?महापालिकेत आरोग्य विभागातील पाचशेहून अधिक पदे रिक्त आहेत. यात तीनशेहून अधिक परिचारिकांची पदे आहेत. दुसरीकडे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून २५० कंत्राटी परिचारिका काम करतात. त्यांना कायम का केले जात नाही, हा संशोधनाचा विषय आहे. परिणामी त्यांना आठ ते दहा हजार रुपये अशा तुटपुंज्या मानधनात कोरोना कालावधीत जोखमीचे काम करावे लागत आहे.आरोग्य विभागात नियोजनाचा अभावमहापालिकेच्या आरोग्य विभागात नियोजन व समन्वयाचा अभाव आहे. कर्मचारी व अधिकारी यांना मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी वेळोवेळी काम पडते. परंतु अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही यामुळे वेळीच उपाययोजना करता येत नाहीत. काम करताना अडचणी येतात, अशी माहिती आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस