शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

माजी सैनिकांना प्रतीक्षा ‘अच्छे दिन’ येण्याची

By admin | Updated: July 3, 2014 00:56 IST

मागील ३२ वर्षांपासून प्रलंबित असलेली ‘वन रँक वन पेन्शन’ची मागणी केंद्र सरकारने लागू करून माजी सैनिकांच्या जीवनातही चांगल्या दिवसाची (अच्छे दिन) सुरुवात करावी, अशी मागणी आता जोर

नागपूर : मागील ३२ वर्षांपासून प्रलंबित असलेली ‘वन रँक वन पेन्शन’ची मागणी केंद्र सरकारने लागू करून माजी सैनिकांच्या जीवनातही चांगल्या दिवसाची (अच्छे दिन) सुरुवात करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नागपुरात अलीकडेच महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर्स संघटनेच्या नेतृत्वात एक बैठक झाली. या बैठकीत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘वन रँक वन पेन्शन’लागू करण्यास विलंब करू नये, अशी विनती केंद्र सरकारकडे केली आहे.वन रँक वन पेन्शनलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘वन रँक वन पेन्शन’ लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थसंकलात अंशत: तरतूदही केली होती. निवडणुकीच्या प्रचार काळातही नरेंद्र मोदी यांनीही माजी सैनिकांची ही मागणी सत्तेत आल्यावर पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. मोदी सरकार सत्तारूढ झाले आहे. दोन आठवड्यानंतर अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी सैनिकांच्या संघटनांनी केंद्राकडे त्यांच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. १९८२ मध्ये सर्वप्रथम माजी सैनिकांसाठी ‘वन रँक वन पेन्शन’ची मागणी करण्यात आली होती. तेव्हापासून केंद्रात आलेल्या प्रत्येक सरकारकडे सैनिकांच्या संघटनांकडून यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र प्रत्येक वेळी प्रशासकीय यंत्रणा या प्रस्तावाची चुकीची मांडणी सरकारकडे करीत असल्याने योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे येत गेले. सध्या सैन्यदलातून निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तुलनेत इतरांची (बिलो आॅफिसर्स रँक) पेन्शन अत्यल्प आहे. ही असमनाता दूर करण्यासाठी ‘वन रँक वन पेन्शन’ची अत्यंत आवश्यकता आहे. अर्थसंकल्पात तरतूद कराया योजनेचा अंतिम मसुदा तयार करताना कोणत्याही त्रुटी राहू नये याची काळजी घ्यावी आणि यासंदर्भात निर्णय घेताना सैनिकी अधिकाऱ्यांशी सरकारने सल्लामसलत करावी. सैनिकांची आठवण दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि गणराज्यदिनी करण्यात येते. मात्र सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेला सैनिक कोणत्या हालअपेष्टांना तोंड देतो याकडे सरकारचे वर्षभर दुर्लक्ष होते. यंदा सत्ताबदलानंतर सर्वांना ‘अच्छे दिन’ येणार याची प्रतीक्षा आहे. माजी सैनिकांचाही त्यात समावेश आहे. ‘वन रँक वन पेन्शन’ लागू करून सरकारने हे पाऊल उचलावे. यासाठी नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही प्रयत्न करावे. मनोहर भातकुलकरमहाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर्स संघटना