शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

ईव्हीएममध्ये गोलमाल

By admin | Updated: February 26, 2017 02:08 IST

महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आला. ईव्हीएममध्ये सेटिंग करून एका उमेदवाराची मते दुसऱ्या उमेदवाराकडे वळविण्यात आली.

सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांचा आरोप : मतपत्रिकेद्वारे फेरमतदानाची मागणी नागपूर : महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आला. ईव्हीएममध्ये सेटिंग करून एका उमेदवाराची मते दुसऱ्या उमेदवाराकडे वळविण्यात आली. यासंदर्भात उमेदवारांनी तक्रारी केल्यानंतरही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे नागपुरात धक्कादायक व अनपेक्षित निकाल लागले, असा आरोप काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लीम लीग व बसपाच्या पराभूत उमेदवारांनी केला आहे. ईव्हीएमच्या घोळाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तर नागपूरकरांनी भाजपाने केलेल्या विकास कामांना पावती दिली असून ईव्हीएमच्या घोळाचे आरोप करण्यापेक्षा कायदेशीर मार्ग वापरा, असा सल्ला भाजपा नेत्यांनी दिला आहे. पराभूत उमेदवार व त्यांच्या समर्थकांची शनिवारी सीए रोडवरील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. रमण ठवकर, कांता पराते, शिवसेनेचे बंडू तळवेकर, कि शोर पराते, बसपाच्या किरण पाटणकर तसेच भाजपाने उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीकडून लढलेल्या मीना तिडके, काँग्रेसने उमदेवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले अरुण डवरे यांच्यासह इतर पराभूत उमेदवार व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत उमेदवारांनी सांगितले की, निवडणुकीदरम्यान आपल्याला प्रभागातील मतदारांचा प्रचंड पाठिंबा होता. यापूर्वीही आम्ही निवडणुका लढविल्या असल्याने प्रभागातील मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे, याचा उमेदवारांना अंदाज येतो. थोड्याफार फरकाने तो चुकीचा ठरू शकतो. परंतु या निवडणुकीत ईव्हीएमच्या घोळामुळे अनपेक्षित व एकतर्फी निकाल लागले. जेथे शंभर-दोनशे मतात निकाल लागेल, असे वाटत होते तेथे तीन ते चार हजार मतांनी पराभव झाला. ही बाब पटणारी नाही. निकालांवर मतदारांचाही विश्वास बसेनासा झाला आहे. ईव्हीएमच्या घोळामुळे असे एकतर्फी निकाल आले असून निष्पक्ष वातावरणात मतपत्रिकेच्या माध्यमातून फेरनिवडणूक घेण्यात यावी,अशी अशी भूमिका उपस्थितांनी मांडली. मंगळवारी घेणार आंदोलनाचा निर्णय बैठकीत उपस्थित असलेले काँग्रेसचे पराभूत नगरसेवक सुरेश जग्यासी यांनी सांगितले की, सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र प्राप्त केल्यानतंर मंगळवारी आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल. पराभूत उमेदवार व नागरिकांना एकत्र करून या विरोधात लोकलढा उभारला जाईल. तसेच ईव्हीएमचच्या एकूणच प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.