शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

ईव्हीएममध्ये गोलमाल

By admin | Updated: February 26, 2017 02:08 IST

महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आला. ईव्हीएममध्ये सेटिंग करून एका उमेदवाराची मते दुसऱ्या उमेदवाराकडे वळविण्यात आली.

सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांचा आरोप : मतपत्रिकेद्वारे फेरमतदानाची मागणी नागपूर : महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आला. ईव्हीएममध्ये सेटिंग करून एका उमेदवाराची मते दुसऱ्या उमेदवाराकडे वळविण्यात आली. यासंदर्भात उमेदवारांनी तक्रारी केल्यानंतरही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे नागपुरात धक्कादायक व अनपेक्षित निकाल लागले, असा आरोप काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लीम लीग व बसपाच्या पराभूत उमेदवारांनी केला आहे. ईव्हीएमच्या घोळाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तर नागपूरकरांनी भाजपाने केलेल्या विकास कामांना पावती दिली असून ईव्हीएमच्या घोळाचे आरोप करण्यापेक्षा कायदेशीर मार्ग वापरा, असा सल्ला भाजपा नेत्यांनी दिला आहे. पराभूत उमेदवार व त्यांच्या समर्थकांची शनिवारी सीए रोडवरील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. रमण ठवकर, कांता पराते, शिवसेनेचे बंडू तळवेकर, कि शोर पराते, बसपाच्या किरण पाटणकर तसेच भाजपाने उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीकडून लढलेल्या मीना तिडके, काँग्रेसने उमदेवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले अरुण डवरे यांच्यासह इतर पराभूत उमेदवार व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत उमेदवारांनी सांगितले की, निवडणुकीदरम्यान आपल्याला प्रभागातील मतदारांचा प्रचंड पाठिंबा होता. यापूर्वीही आम्ही निवडणुका लढविल्या असल्याने प्रभागातील मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे, याचा उमेदवारांना अंदाज येतो. थोड्याफार फरकाने तो चुकीचा ठरू शकतो. परंतु या निवडणुकीत ईव्हीएमच्या घोळामुळे अनपेक्षित व एकतर्फी निकाल लागले. जेथे शंभर-दोनशे मतात निकाल लागेल, असे वाटत होते तेथे तीन ते चार हजार मतांनी पराभव झाला. ही बाब पटणारी नाही. निकालांवर मतदारांचाही विश्वास बसेनासा झाला आहे. ईव्हीएमच्या घोळामुळे असे एकतर्फी निकाल आले असून निष्पक्ष वातावरणात मतपत्रिकेच्या माध्यमातून फेरनिवडणूक घेण्यात यावी,अशी अशी भूमिका उपस्थितांनी मांडली. मंगळवारी घेणार आंदोलनाचा निर्णय बैठकीत उपस्थित असलेले काँग्रेसचे पराभूत नगरसेवक सुरेश जग्यासी यांनी सांगितले की, सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र प्राप्त केल्यानतंर मंगळवारी आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल. पराभूत उमेदवार व नागरिकांना एकत्र करून या विरोधात लोकलढा उभारला जाईल. तसेच ईव्हीएमचच्या एकूणच प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.