शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

आता एकाच जागी ठेवल्या जातील ईव्हीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात होणाऱ्या विविध निवडणुकींत मतदान प्रक्रियेसाठी उपयोगात येणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅटला ठेवण्यासाठी निश्चित अशी जागा नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात होणाऱ्या विविध निवडणुकींत मतदान प्रक्रियेसाठी उपयोगात येणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅटला ठेवण्यासाठी निश्चित अशी जागा नाही. कधी नव्या प्रशासकीय इमारतीचे स्ट्राँग रूम, तर कधी कळमना येथील गोदामांमध्ये व्यवस्था केली जाते. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन चिंतामग्न असते. मात्र, ही चिंता दूर करण्यात आली असून, एकाच ठिकाणी सगळ्या ईव्हीएम ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वतीने सुरक्षेचा अभाव आणि स्थायी स्ट्राँग रूम नसल्याने उमरेड येथील स्ट्राँग रूममध्ये चोर शिरल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यामुळे, प्रशासनाची नाचक्की झाली होती. आता नागपूर जिल्हा प्रशासनाने हिंगणा तालुक्यात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची दोन गोदाम भाड्याने घेतली आहेत. एक गोदाम १० हजार चौरस फुटाचे आहे, तर दुसरे सात हजार चौरस फुटाचे आहे. सद्य:स्थितीत लोक निर्माण विभागाकडून या गोदामांच्या दुरुस्तीचे काम केले जात आहे.

६.९५ लाख रुपये होतील खर्च

दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून ६ लाख ९५ हजार ३७७ रुपये मंजूर झाले आहेत. या निधीत ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या सुरक्षेसाठी गोदामात सीसीटीव्ही, सुरक्षा गार्डसह विविध व्यवस्थांचे नियोजन केले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाने दुरुस्तीसाठी १३ लाख ९० हजार ७५४ रुपयांचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु, सरकारने केवळ ६ लाख ९५ हजार ३७७ रुपयेच मंजूर केले आहेत.

२० हजार ईव्हीएम-व्हीव्हीपॅट

२०१९ मधील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत उपयोगात आलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटला वर्तमानात कळमना येथील तीन गोदामांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. हिंगणा विधानसभा निवडणुकीसंदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याच कारणाने हिंगणा विधानसभेच्या ईव्हीएम तेथेच ठेवण्यात आल्या आहेत. निवडणुकीनंतर एक वर्षापर्यंत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा दुसऱ्यांदा वापर केला जात नाही. एक वर्षपर्यंत कोणताच आक्षेप न आल्याच्या स्थितीत त्यांचा वापर केला जातो. वर्तमान स्थितीत नागपूर जिल्ह्यातील विविध स्ट्राँग रूममध्ये जवळपास २० हजार ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

१३ हजार ईव्हीएम परत पाठविल्या होत्या

यापूर्वी नव्या प्रशासकीय इमारतीत ठेवण्यात आलेल्या जवळपास १३ हजार ईव्हीएम हैदराबाद येथील पीआयसीएल कंपनीकडे परत पाठविण्यात आल्या होत्या. या मशीन्स १५ वर्षांहून अधिक काळापासून वापरात होत्या. त्याच कारणाने त्यांना परत पाठवून नव्या ईव्हीएमची व्यवस्था केली जात आहे.

....