शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

ईव्हीएम संशयास्पद; बॅलेटवर निवडणुका व्हाव्यात : राजू शेट्टी यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 20:51 IST

लोकसभा निवडणुकीत देशभरातील २५० मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीनंतर जास्त मते मोजण्यात आली. काही मतमोजणी केंद्राच्या परिसरात वायफाय यंत्रणा नसताना मतमोजणीच्या वेळी सिग्नल दिसत होते. ईव्हीएम संदर्भात संशयास्पद गोष्टी घडल्या आहेत. निवडणुका स्वच्छ व पारदर्शी वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. परंतु तक्रार करूनही आयोगाकडून शंकांचे निराकरण करण्यात आलेले नाही. पुढारलेल्या देशात ईव्हीएमचा वापर होत नाही. बॅलेटपेपरवर निवडणुका होतात. आपल्या देशातही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देदुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत देशभरातील २५० मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीनंतर जास्त मते मोजण्यात आली. काही मतमोजणी केंद्राच्या परिसरात वायफाय यंत्रणा नसताना मतमोजणीच्या वेळी सिग्नल दिसत होते. ईव्हीएम संदर्भात संशयास्पद गोष्टी घडल्या आहेत. निवडणुका स्वच्छ व पारदर्शी वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. परंतु तक्रार करूनही आयोगाकडून शंकांचे निराकरण करण्यात आलेले नाही. पुढारलेल्या देशात ईव्हीएमचा वापर होत नाही. बॅलेटपेपरवर निवडणुका होतात. आपल्या देशातही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.मतमोजणीच्या वेळी विशिष्ट फेऱ्यापर्यंत आघाडीवरील उमदेवार नंतरच्या फेºयात अचानक मागे गेले. एका विशिष्ट मतांच्या फरकाने उमेदवार विजयी झालेत. देशभरात सरकारविरोधात रोष असूनही युतीचे उमेदवार निवडून आले. यापुढील निवडणुकीतही अशीच परिस्थिती कायम राहिली तर लोकांचा लोकशाहीवर विश्वास राहणार नाही. देशात अराजकता माजेल, अशी भीती राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफडे, विदर्भ विभागाचे अध्यक्ष देवेंद्र भुयार, जिल्हा अध्यक्ष दयाल राऊ त, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य बापुसाहेब करंडे आदी उपस्थित होतेशेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ‘एल्गार’ पुकारणारराज्यात दुष्काळाने रुद्रावतार धारण केला आहे. विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे. गुरांचा चारा व पाणी मिळत नाही. नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. दुसरीकडे टँकर माफियांनी हैदोस घातला आहे. २३ एप्रिलला मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तातडीने उपाययोजना हाती घेण्याची गरज होती. परंतु राज्य शासनाने बघ्याची भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यक र्त्यांवर ३५३ कलमान्वये गुन्हे दाखल केले जात आहेत. शासनाच्या या दडपशाहीला न जुमानता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघटना एल्गार पुकारणार आहे. यासाठीच विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.केंद्राच्या धोरणामुळे ऊ स उत्पादक संकटातऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी( फे अर रेम्युनरेटीव्ह प्राईस) अर्थात रास्त व किफायतशीर भाव न देणाऱ्या साखर कारखानदारावर शासनाने कारवाई करावी. यासंदर्भात संघटनेच्या माध्यमातून साखर आयुक्तांकडे वारंवार मागणी केली. वास्तविक एफआरपी न मिळण्याला केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे. राज्य सरकारने यासंदर्भात पाठपुरावा करण्याची गरज आहे. परंतु सरकारचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.विरोधकांनी एकत्र यावेसरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याने संघटनेची भूमिका सरकार विरोधात आहे. भाजप-शिवसेना युतीचा पराभव करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकर घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMediaमाध्यमे