शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
4
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
5
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
6
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
7
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
8
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
9
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
10
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
11
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
12
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
13
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
14
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
15
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
16
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
17
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
18
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
19
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
20
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ

ईव्हीएम संशयास्पद; बॅलेटवर निवडणुका व्हाव्यात : राजू शेट्टी यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 20:51 IST

लोकसभा निवडणुकीत देशभरातील २५० मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीनंतर जास्त मते मोजण्यात आली. काही मतमोजणी केंद्राच्या परिसरात वायफाय यंत्रणा नसताना मतमोजणीच्या वेळी सिग्नल दिसत होते. ईव्हीएम संदर्भात संशयास्पद गोष्टी घडल्या आहेत. निवडणुका स्वच्छ व पारदर्शी वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. परंतु तक्रार करूनही आयोगाकडून शंकांचे निराकरण करण्यात आलेले नाही. पुढारलेल्या देशात ईव्हीएमचा वापर होत नाही. बॅलेटपेपरवर निवडणुका होतात. आपल्या देशातही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देदुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत देशभरातील २५० मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीनंतर जास्त मते मोजण्यात आली. काही मतमोजणी केंद्राच्या परिसरात वायफाय यंत्रणा नसताना मतमोजणीच्या वेळी सिग्नल दिसत होते. ईव्हीएम संदर्भात संशयास्पद गोष्टी घडल्या आहेत. निवडणुका स्वच्छ व पारदर्शी वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. परंतु तक्रार करूनही आयोगाकडून शंकांचे निराकरण करण्यात आलेले नाही. पुढारलेल्या देशात ईव्हीएमचा वापर होत नाही. बॅलेटपेपरवर निवडणुका होतात. आपल्या देशातही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.मतमोजणीच्या वेळी विशिष्ट फेऱ्यापर्यंत आघाडीवरील उमदेवार नंतरच्या फेºयात अचानक मागे गेले. एका विशिष्ट मतांच्या फरकाने उमेदवार विजयी झालेत. देशभरात सरकारविरोधात रोष असूनही युतीचे उमेदवार निवडून आले. यापुढील निवडणुकीतही अशीच परिस्थिती कायम राहिली तर लोकांचा लोकशाहीवर विश्वास राहणार नाही. देशात अराजकता माजेल, अशी भीती राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफडे, विदर्भ विभागाचे अध्यक्ष देवेंद्र भुयार, जिल्हा अध्यक्ष दयाल राऊ त, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य बापुसाहेब करंडे आदी उपस्थित होतेशेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ‘एल्गार’ पुकारणारराज्यात दुष्काळाने रुद्रावतार धारण केला आहे. विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे. गुरांचा चारा व पाणी मिळत नाही. नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. दुसरीकडे टँकर माफियांनी हैदोस घातला आहे. २३ एप्रिलला मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तातडीने उपाययोजना हाती घेण्याची गरज होती. परंतु राज्य शासनाने बघ्याची भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यक र्त्यांवर ३५३ कलमान्वये गुन्हे दाखल केले जात आहेत. शासनाच्या या दडपशाहीला न जुमानता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघटना एल्गार पुकारणार आहे. यासाठीच विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.केंद्राच्या धोरणामुळे ऊ स उत्पादक संकटातऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी( फे अर रेम्युनरेटीव्ह प्राईस) अर्थात रास्त व किफायतशीर भाव न देणाऱ्या साखर कारखानदारावर शासनाने कारवाई करावी. यासंदर्भात संघटनेच्या माध्यमातून साखर आयुक्तांकडे वारंवार मागणी केली. वास्तविक एफआरपी न मिळण्याला केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे. राज्य सरकारने यासंदर्भात पाठपुरावा करण्याची गरज आहे. परंतु सरकारचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.विरोधकांनी एकत्र यावेसरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याने संघटनेची भूमिका सरकार विरोधात आहे. भाजप-शिवसेना युतीचा पराभव करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकर घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMediaमाध्यमे