शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘इव्हीएम’द्वारे लोकशाही नष्ट करण्याचे षङ्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:18 IST

ओबीसी समाज आता जागृत होऊ लागला आहे. तो जागृत झाला तर त्याला आजवर अंधारात कुणी ठेवले? त्याचे अधिकार त्यांना कुणी मिळू दिले नाहीत?

ठळक मुद्देव्ही.एल. मातंग : बहुजन मुक्ती पार्टीच्या राज्य अधिवेशनात टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओबीसी समाज आता जागृत होऊ लागला आहे. तो जागृत झाला तर त्याला आजवर अंधारात कुणी ठेवले? त्याचे अधिकार त्यांना कुणी मिळू दिले नाहीत? त्याच्या अधिकारासाठी कोण लढले, हे त्याला चांगल्या पद्धतीने कळेल आणि आजवर आपल्याला धर्माच्या नावावर अंधपणे मत देत असलेला ओबीसी समाज उद्या मत देणार नाही. अशावेळी आपण सत्तेवर कसे येणार? या भीतीमुळेच सत्ताधाºयांनी इव्हीएम मशीन देशात आणली. इव्हीएम मशीन म्हणजे मताचा मिळालेला अधिकार हिरावणारी मशीन असून, या माध्यमातून लोकशाही नष्ट करण्याचे षङ्यंत्र देशात सुरू आहे, अशी जाहीर टीका बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.एल. मातंग यांनी येथे केली.बहुजन मुक्ती पार्टीचे दुसरे राज्य अधिवेशन रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवी माजी आमदार लक्ष्मण माने हे उद्घाटक होते. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब मिसाळ पाटील, विजय वाघचौरे, शिवाजी नाना पाटील, अनिलकुमार माने, प्रताप पाटील, आझाद लोंढे, रामनिवास गुप्ता, नंदा लोखंडे, यू.पी. राठोड, विजय राजूरकर, अ‍ॅड. अनिल किनाके व्यासपीठावर होते. व्ही. एल. मातंग म्हणाले, या देशात इव्हीएम मशीन आणण्याचे पाप हे काँग्रेसनेच केले आहे. त्यामुळे काँग्रेस इव्हीएमच्या विरोधात कधीच आवाज उचलताना दिसत नाही. भाजपाने या मशीनचा व्यापक वापर करून सत्ता स्थापित केली आहे. सध्याच्या सत्ताधाºयांनी इव्हीएमद्वारे मताचा अधिकारी हिरावला आहे, भूमी अधिग्रहणातून जमिनीचा अधिकार हिरावला आहे आणि नोटाबंदीद्वारे आता संपत्तीचाही अधिकार हिरावला आहे. याविरोधात जनआंदोलन उभारण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. संचालन महादेव जमदाडे यांनी केले. गणेश चौधरी यांनी आभार मानले.बहुजन समाजाने एकत्र यावे - लक्ष्मण मानेसरकारच्या जमिनी लुटण्याचा धंदा आजही सुरू आहे. सर्वच समाज त्रस्त आहे. तेव्हा बहुजन समाजाने एकत्र येऊन जनआंदोलन उभारावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केले. जात-पोटजात विसरा, आंतरजातीय विवाह करा, असे आवाहन त्यांनी केले. पँथरपासून आपली सुरुवात झाली. आता बुद्धाकडे आलो आहे. आरएसएसला संपवण्यासाठी लढत राहणार, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.