शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

‘इव्हीएम’द्वारे लोकशाही नष्ट करण्याचे षङ्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:18 IST

ओबीसी समाज आता जागृत होऊ लागला आहे. तो जागृत झाला तर त्याला आजवर अंधारात कुणी ठेवले? त्याचे अधिकार त्यांना कुणी मिळू दिले नाहीत?

ठळक मुद्देव्ही.एल. मातंग : बहुजन मुक्ती पार्टीच्या राज्य अधिवेशनात टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओबीसी समाज आता जागृत होऊ लागला आहे. तो जागृत झाला तर त्याला आजवर अंधारात कुणी ठेवले? त्याचे अधिकार त्यांना कुणी मिळू दिले नाहीत? त्याच्या अधिकारासाठी कोण लढले, हे त्याला चांगल्या पद्धतीने कळेल आणि आजवर आपल्याला धर्माच्या नावावर अंधपणे मत देत असलेला ओबीसी समाज उद्या मत देणार नाही. अशावेळी आपण सत्तेवर कसे येणार? या भीतीमुळेच सत्ताधाºयांनी इव्हीएम मशीन देशात आणली. इव्हीएम मशीन म्हणजे मताचा मिळालेला अधिकार हिरावणारी मशीन असून, या माध्यमातून लोकशाही नष्ट करण्याचे षङ्यंत्र देशात सुरू आहे, अशी जाहीर टीका बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.एल. मातंग यांनी येथे केली.बहुजन मुक्ती पार्टीचे दुसरे राज्य अधिवेशन रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवी माजी आमदार लक्ष्मण माने हे उद्घाटक होते. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब मिसाळ पाटील, विजय वाघचौरे, शिवाजी नाना पाटील, अनिलकुमार माने, प्रताप पाटील, आझाद लोंढे, रामनिवास गुप्ता, नंदा लोखंडे, यू.पी. राठोड, विजय राजूरकर, अ‍ॅड. अनिल किनाके व्यासपीठावर होते. व्ही. एल. मातंग म्हणाले, या देशात इव्हीएम मशीन आणण्याचे पाप हे काँग्रेसनेच केले आहे. त्यामुळे काँग्रेस इव्हीएमच्या विरोधात कधीच आवाज उचलताना दिसत नाही. भाजपाने या मशीनचा व्यापक वापर करून सत्ता स्थापित केली आहे. सध्याच्या सत्ताधाºयांनी इव्हीएमद्वारे मताचा अधिकारी हिरावला आहे, भूमी अधिग्रहणातून जमिनीचा अधिकार हिरावला आहे आणि नोटाबंदीद्वारे आता संपत्तीचाही अधिकार हिरावला आहे. याविरोधात जनआंदोलन उभारण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. संचालन महादेव जमदाडे यांनी केले. गणेश चौधरी यांनी आभार मानले.बहुजन समाजाने एकत्र यावे - लक्ष्मण मानेसरकारच्या जमिनी लुटण्याचा धंदा आजही सुरू आहे. सर्वच समाज त्रस्त आहे. तेव्हा बहुजन समाजाने एकत्र येऊन जनआंदोलन उभारावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केले. जात-पोटजात विसरा, आंतरजातीय विवाह करा, असे आवाहन त्यांनी केले. पँथरपासून आपली सुरुवात झाली. आता बुद्धाकडे आलो आहे. आरएसएसला संपवण्यासाठी लढत राहणार, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.