शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

'धर्मांतरांची व्यवस्था नीट ठेवा' बाबासाहेबांचे पत्र दाखवताच सर्वच अवाक् झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 07:00 IST

Dr Babasaheb Ambedkar Nagpur News कर्मवीर बाबू हरिदास आवळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व होते.

ठळक मुद्देधम्मक्रांतीच्या दोन दिवसांपूर्वी झाली उंटखान्यात सभा बाबू हरिदास आवळे बाबासाहेबांच्याप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीक्षाभूमीवरील धम्मक्रांतीच्या दोन दिवसाआधी शहरातील उंटखाना वस्तीतील महानगरपालिकेच्या शाळेत ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची धर्मांतराच्या विषयावर सभा झाली. या सभेत दादासाहेब गायकवाड यांनी धर्मांतराचा कार्यक्रम सार्वत्रिक निवडणुकानंतर करावा यावर जोर दिला. परंतु सभेत उपस्थित अ‍ॅड. हरिदास बाबू आवळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर कार्यक्रमाला जाहीर पाठिंबा दर्शविला. 'धर्मांतराची व्यवस्था नीट ठेवा' या आशयाचे बाबासाहेबांनी १५ दिवसांपूर्वी लिहिलेले पत्र खिशातून काढून दाखविताच सर्वच अवाक झाले. धम्मदीक्षेचा कार्यक्रम पार पाडणे आमचे प्रथम कर्तव्य आहे. निवडणुका येतील आणि जातील पुढे पाहू, धम्मदीक्षेचा कार्यक्रम होणारच, असे ठासून सांगत, कार्यकर्त्यांचे मन वळविले.कर्मवीर बाबू हरिदास आवळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व होते. १ जुलै १९१६ रोजी कामठी छावणी येथे त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण रायपूर व महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झालेले बाबू हरिदास आवळे यांनी विज्ञान व कायद्याची पदवी घेतली. विद्यार्थिदशेपासूनच ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते. येथूनच ते बाबासाहेबांच्या जवळ पोहचले. समता सैनिक दलाच्या माध्यमातून अनुशासनप्रिय कार्यकर्ता म्हणून ते लोकप्रिय होते. डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मध्यप्रदेश शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे ते सरचिटणीस होते. मध्य प्रदेशातील हजारो अस्पृश्यांनी धम्मदीक्षेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी पत्रक काढून आवाहन केले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धर्मांतराच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. बाबासाहेबांच्या महापरिनिवार्णानंतर त्यांनी दीक्षाभूमीवर १३ एप्रिल, १९५७ रोजी रातोरात कमळाच्या फुलात उभी असलेली तथागत गौतम बुद्ध यांच्या मूतीर्ची स्थापना केली. ती मूर्ती कुणी बसविली, अशी चौकशी पोलिसांनी केल्यानंतर कुणीही जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. तेव्हा स्वत: आवळेबाबूंनी पुढे येत जबाबदारी स्वीकारली व स्वत:वर अतिक्रमणाचा गुन्हा दाखल करून घेतला.दीक्षाभूमीची १४ एकर जागा मिळवून दिलीआवळे बाबू महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यही होते. विधान परिषदेत अशासकीय ठराव आणून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बौद्धांच्या धार्मिक कायार्साठी चौदा एकर जागा मिळवून दिली. दीक्षाभूमी मिळविण्याचे श्रेयही आवळे बाबू यांनाच जाते. बाबासाहेबांच्या पश्चात संघटनांचा भार वहन करण्यासाटी गठित करण्यात आलेल्या प्रेसिडियमचे ते सेक्रेटरी होते. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचे ते उपाध्यक्ष होते. त्यांना ऑल इंडिया समता सैनिक दलाचे अध्यक्ष म्हणूनही निवडण्यात आले.

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी