शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

प्रत्येकाने कर्तव्याची जाणीव ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:01 IST

आज देश, समाज यासंदर्भात जाणीव राहिलेली नाही. ही जबाबदारी केवळ शासनाची आहे, ....

ठळक मुद्देशांताक्का : राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आज देश, समाज यासंदर्भात जाणीव राहिलेली नाही. ही जबाबदारी केवळ शासनाची आहे, असे सांगून देशाप्रति, समाजाप्रति आपली जबाबदारी टाळली जात आहे. नागरिकांनी जबाबदारी टाळल्यामुळे त्याचे दुष्परिणाम बघायला मिळत आहे. चांगली शासन व्यवस्था टिकविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्याचा बोध घेणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले.सोमवारी रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव साजरा झाला. या सोहळ्यात सेविकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून आयएमएच्या माजी अध्यक्ष डॉ. वर्षा ढवळे उपस्थित होत्या. तर रा.से.स.च्या नागपूर विभाग कार्यवाहिका करुणा साठे, प्रमख कार्यवाहिका सीता अन्नदानम, विदर्भ प्रांत कार्यवाहिका रोहिणी आठवले उपस्थित होत्या. त्याचबरोबर अ.भा. शारीरिक प्रमुख मनीषा संत, माजी प्रमुख संचालिका प्रमिला मेढे, महापौर नंदा जिचकार, पश्चिम क्षेत्र प्रांत प्रमुख रत्नाताई हसेगावकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राम हरकरे यांनीसुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. राष्ट्रसेविका समितीला ८१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ८१ सेविकांद्वारे घोषवादन व प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यापूर्वी शस्त्रपूजन व ध्वजारोहण झाले. यावेळी शांताक्का म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीत कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. आपल्यात मनुष्यत्व आहे का? हा विचार करणे गरजेचे आहे. देशाची परंपरा व धर्माला आपण विसरत चाललो आहे. अधर्माचा विरोध करताना आपली पावले मागे पडत आहे. विजयादशमीचा उत्सव आपल्याला धर्म व संस्कृतीचे रक्षण करण्याचे शिकवितो. राक्षसी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी दैवी शक्ती जागृत करणे गरजेचे झाले आहे.त्या म्हणाल्या की, देशाला अखंड ठेवण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढे येणे गरजेचे आहे. जम्मू-काश्मिरात राष्ट्रीय मुस्लीम महिला मंचचे उदाहरण देत, या मंचच्या महिला सदस्य घरोघरी जाऊन लोकांमध्ये जागृती आणत आहे. त्याचा परिणाम जम्मूमध्ये दिसून आला आहे. आपण केवळ शासनाची जबाबदारी असे सांगून आपल्या कर्तव्याकडे पाठ फेरतो. लव्ह जिहाद या विषयावर बोलताना त्यांनी केरळ राज्यातील उदाहरण देत उच्चशिक्षित तरुणी यात फसत चालल्या आहेत. याचे मुख्य कारण संस्कार आणि ज्येष्ठांचा आदर हरवीत चालला आहे. याप्रसंगी मुख्य अतिथी डॉ. ढवळे यांनी महिलांना स्वत:ची क्षमता ओळखण्याचा सल्ला दिला. त्यांनी कन्या भ्रूणहत्या ही सामाजिक वेदना असल्याचे सांगत त्याला महिला आणि पुरुष दोघेही जबाबदार असल्याचे म्हणाल्या. मुलींना आत्मविश्वास व आरोग्य जोपासण्याचा त्यांनी सल्ला दिला.चिनी वस्तूंचा बहिष्कार कराजी गोष्ट राष्ट्रासाठी घातक आहे, त्यापासून आपण दूर राहणे गरजेचे आहे. चीनच्या वस्तू खरेदी करून आपण देशाला हानी पोहोचवीत आहोत. दिवाळीला मोठ्या संख्येने चीनच्या वस्तू बाजारात येतात. त्यामुळे चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. शासनाकडे मागण्यांची पूर्तता करण्यासाठी करण्यात येणाºया आंदोलनावरही त्यांनी टीका केली. देशात गरिबी असताना आंदोलनाच्या नावाने आपण लाखो लिटर दूध रस्त्यावर फेकतो. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतो. हे नुकसान राष्ट्राबरोबरच स्वत:चेसुद्धा असल्याचे शांताक्का म्हणाल्या.