शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने कर्तव्याची जाणीव ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:01 IST

आज देश, समाज यासंदर्भात जाणीव राहिलेली नाही. ही जबाबदारी केवळ शासनाची आहे, ....

ठळक मुद्देशांताक्का : राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आज देश, समाज यासंदर्भात जाणीव राहिलेली नाही. ही जबाबदारी केवळ शासनाची आहे, असे सांगून देशाप्रति, समाजाप्रति आपली जबाबदारी टाळली जात आहे. नागरिकांनी जबाबदारी टाळल्यामुळे त्याचे दुष्परिणाम बघायला मिळत आहे. चांगली शासन व्यवस्था टिकविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्याचा बोध घेणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले.सोमवारी रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव साजरा झाला. या सोहळ्यात सेविकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून आयएमएच्या माजी अध्यक्ष डॉ. वर्षा ढवळे उपस्थित होत्या. तर रा.से.स.च्या नागपूर विभाग कार्यवाहिका करुणा साठे, प्रमख कार्यवाहिका सीता अन्नदानम, विदर्भ प्रांत कार्यवाहिका रोहिणी आठवले उपस्थित होत्या. त्याचबरोबर अ.भा. शारीरिक प्रमुख मनीषा संत, माजी प्रमुख संचालिका प्रमिला मेढे, महापौर नंदा जिचकार, पश्चिम क्षेत्र प्रांत प्रमुख रत्नाताई हसेगावकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राम हरकरे यांनीसुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. राष्ट्रसेविका समितीला ८१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ८१ सेविकांद्वारे घोषवादन व प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यापूर्वी शस्त्रपूजन व ध्वजारोहण झाले. यावेळी शांताक्का म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीत कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. आपल्यात मनुष्यत्व आहे का? हा विचार करणे गरजेचे आहे. देशाची परंपरा व धर्माला आपण विसरत चाललो आहे. अधर्माचा विरोध करताना आपली पावले मागे पडत आहे. विजयादशमीचा उत्सव आपल्याला धर्म व संस्कृतीचे रक्षण करण्याचे शिकवितो. राक्षसी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी दैवी शक्ती जागृत करणे गरजेचे झाले आहे.त्या म्हणाल्या की, देशाला अखंड ठेवण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढे येणे गरजेचे आहे. जम्मू-काश्मिरात राष्ट्रीय मुस्लीम महिला मंचचे उदाहरण देत, या मंचच्या महिला सदस्य घरोघरी जाऊन लोकांमध्ये जागृती आणत आहे. त्याचा परिणाम जम्मूमध्ये दिसून आला आहे. आपण केवळ शासनाची जबाबदारी असे सांगून आपल्या कर्तव्याकडे पाठ फेरतो. लव्ह जिहाद या विषयावर बोलताना त्यांनी केरळ राज्यातील उदाहरण देत उच्चशिक्षित तरुणी यात फसत चालल्या आहेत. याचे मुख्य कारण संस्कार आणि ज्येष्ठांचा आदर हरवीत चालला आहे. याप्रसंगी मुख्य अतिथी डॉ. ढवळे यांनी महिलांना स्वत:ची क्षमता ओळखण्याचा सल्ला दिला. त्यांनी कन्या भ्रूणहत्या ही सामाजिक वेदना असल्याचे सांगत त्याला महिला आणि पुरुष दोघेही जबाबदार असल्याचे म्हणाल्या. मुलींना आत्मविश्वास व आरोग्य जोपासण्याचा त्यांनी सल्ला दिला.चिनी वस्तूंचा बहिष्कार कराजी गोष्ट राष्ट्रासाठी घातक आहे, त्यापासून आपण दूर राहणे गरजेचे आहे. चीनच्या वस्तू खरेदी करून आपण देशाला हानी पोहोचवीत आहोत. दिवाळीला मोठ्या संख्येने चीनच्या वस्तू बाजारात येतात. त्यामुळे चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. शासनाकडे मागण्यांची पूर्तता करण्यासाठी करण्यात येणाºया आंदोलनावरही त्यांनी टीका केली. देशात गरिबी असताना आंदोलनाच्या नावाने आपण लाखो लिटर दूध रस्त्यावर फेकतो. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतो. हे नुकसान राष्ट्राबरोबरच स्वत:चेसुद्धा असल्याचे शांताक्का म्हणाल्या.