शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात सर्वजण अस्वस्थ

By admin | Updated: April 11, 2016 03:04 IST

अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे राजकारणात सर्वजण अस्वस्थ राहतात, असा नेम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी...

नितीन गडकरींचा नेम : न्यायदानातील विलंबावर खंतनागपूर : अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे राजकारणात सर्वजण अस्वस्थ राहतात, असा नेम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर साधला. जिल्हा वकील संघटनेतर्फे आयोजित ‘जस्टिसिया’ परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.ही तीन दिवसीय परिषद डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडली. कार्यक्रमात गडकरी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.राजकारणात कोणीही समाधान मानायला तयार नाही. यामुळे अस्वस्थता सतत वाढत आहे. नगरसेवक आमदारासाठी तिकीट मिळाली नाही म्हणून, आमदार मंत्रिपद मिळाले नाही म्हणून, मंत्री चांगले खाते मिळाले नाही म्हणून तर, चांगले खाते मिळणारे मुख्यमंत्री झालो नाही म्हणून अस्वस्थ होतात, असे गडकरी म्हणाले. याशिवाय गडकरी यांनी न्यायदानात होत असलेल्या विलंबावर खंत व्यक्त केली. न्यायव्यवस्थेवर आजही लोकांचा विश्वास आहे. न्यायव्यवस्था बदलत आहे. पारदर्शकता वाढत आहे. परंतु पक्षकारांना वेगात न्याय मिळाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.नागपुरातील वकिली क्षेत्राला श्रीमंत परंपरा लाभली आहे. येथे कोणीही जात व धर्माच्या नावावर भेदभाव करीत नाही. नवोदित वकील चुकत असल्यास तो कोणत्याही जातीधर्मातील असो ज्येष्ठ वकील त्याला कान धरून योग्य मार्गावर आणतात, असे सिरपूरकर यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी स्पर्धा अपिलीय न्यायाधिकरणात नागपुरातील एकही वकील व्यवसाय करीत नसल्यामुळे खंत व्यक्त केली. नागपुरातील वकिलांनी आता दिवाणी, औद्योगिक व फौजदारी प्रकरणाच्या बाहेर पडून स्वत:च्या कक्षा विस्तारण्याची वेळ आली आहे. हा काळ ‘कॉर्पोरेट प्रॅक्टिस’चा आहे, असे मत व्यक्त करून यासाठी वकिलांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्याची तयारी सिरपूरकर यांनी दर्शविली. न्या. गवई यांनी ही परिषद एक ज्ञानयज्ञ होती असे मत व्यक्त केले तर, न्या. धर्माधिकारी यांनी खरी वकिली न्यायालयातच शिकता येते, असे सांगितले. व्यासपीठावर परिषदेचे संयोजक अ‍ॅड. उदय डबले, संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल व सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे उपस्थित होते.याप्रसंगी नवनियुक्त प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)