शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

अन् अख्खे रनाळा गाव हळहळले!

By admin | Updated: January 25, 2017 02:54 IST

यवतमाळ - आर्णी मार्गावरील जेतवन बुद्धविहाराजवळ (जिल्हा यवतमाळ) सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात

तिघांवर सामूहिक अंत्यसंस्कार : एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश कामठी : यवतमाळ - आर्णी मार्गावरील जेतवन बुद्धविहाराजवळ (जिल्हा यवतमाळ) सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात कामठी तालुक्यातील रनाळा येथील तिघे व नेरी येथील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रनाळा येथील तिघांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात सामूहिक अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अख्खे गाव स्तब्ध होते. सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. शांताराम माधवराव नवले (४५), लताबाई शांताराम नवले (४०), सरस्वती सूर्यभान नवले (५५) तिघेही रा. रनाळा, ता. कामठी व नेरी येथील अमित शेषराव वंजारी (२५) अशी मृतांची नावे आहेत. यांच्यासह नागपूरचे तिघेजण एमएच-४०/केआर-२४२२ क्रमांकाच्या स्कॉर्पिओने रनाळ्याहून उमरखेड तालुक्यात जात असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला आणि त्यात सातही जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रनाळा येथील काही नागरिकांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत सर्व जखमींसह मृतांना स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता उत्तरीय तपासणी तत्काळ करण्यात आली. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारात मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले. तिघांचेही मृतदेह मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास रनाळा येथे आणण्यात आले. मृतदेहाच्या प्रतीक्षेत प्रत्येकाने रात्र जागून काढली. मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. गावातील प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. प्रत्येक मन हळहळत होते. गावातील प्रत्येक व्यक्ती गावातच हजर होती. या घटनेमुळे नवले कुटुंबीयांवर संकटाचा जणू डोंगर कोसळला. अंत्ययात्रेत माजी आ. देवराव रडके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद सदस्या सरिता रंगारी, पंचायत समितीचे उपसभापती देवेंद्र गवते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे, उपसभापती प्रमोद महल्ले, अनिल निधान, भिलगावचे सरपंच मोहन माकडे, येरखेड्याचे सरपंच मनीष कारेमोरे यांच्यासह लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी) शांतारामची सामाजिक बांधिलकी रनाळा येथे स्मशानभूमीचा वाद सुरू आहे. या वादग्रस्त स्मशानभूमीत दहनशेड तयार करण्यासाठी शांताराम नवले यांनी पुढाकार घेतला होता. यासाठी त्यांनी अनेक दिवस संघर्षही केला. त्यांच्याच पुढाकाराने या स्मशानभूमीत शेड तयार करण्यात आले. याच शेडमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करीत रनाळावासीयांना अखेरचा निरोप द्यावा लागतो. थरथरत्या हातांनी त्यांचे सरण रचण्यात आले. त्यांच्यापूर्वी या गावातील यमुनाबाई डहाके यांच्या पार्थिवावर या शेडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. विशेष म्हणजे, ते चांगल्या तऱ्हेने सरण रचायचे. गावातील बहुतांश अंत्यसंस्काराचे सरण त्यांनी रचत एक वेगळी सामाजिक बांधिलकी जोपासली होती. मुलांचे छत्र हरपले शांताराम नवले यांना तीन मुले आहेत. मोठा शुभम (२१) हा पांजरा (कोराडी) येथील महाविद्यालयात बी. ए. द्वितीय वर्षाला आहे. मधला सौरभ (१९) हा कामठी येथे पॉलिटेक्निक करीत असून, लहान कुणाल (१६) हा कामठीतील नूतन सरस्वती विद्यालयात १० व्या वर्गात शिकत आहे. काळाने अपघातात या तिघांचेही आई-वडील हिरावून घेतल्याने त्यांचे छत्र हरपले. भजनाच्या व्यासंगी सरस्वतीबाई या आपघातात सरस्वतीबाई सूर्यभान नवले यांचाही मृत्यू झाला. त्या भजनाच्या व्यासंगी होत्या. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन गावात महिला भजन मंडळाची स्थापना केली. गावातील अनेक महिलांना या भजन मंडळात सामावून घेतले होते. त्यांना तीन विवाहित मुली व एक मुलगा आहे. सूर्यभान नवले हे शांताराम यांचे मोठे बंधू होत. त्यांनी रनाळ्याचे सरपंचपदही भूषविले. शांताराम यांना चार भाऊ असून, ते धाकटे होत. सीताराम हे त्यांचा दुसऱ्या व गजानन तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ होय. सीताराम हे महावितरणमध्ये तर गजानन हे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते.