शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

स्मार्ट सिटीत जागोजागी कचरा : मनपा प्रशासन सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 00:55 IST

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात गेल्या तीन-चार दिवसापासून साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत. यामुळे दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनागरिकांच्या तक्रारींची दखल नाही : लोकांच्या आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात गेल्या तीन-चार दिवसापासून साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत. यामुळे दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.दिवाळीचा सण शहरात सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना रस्त्यावर सफाई कर्मचारी शोधूनही सापडत नाही. घरोघरी कचरा उचलणारी यंत्रणा कोलमडल्याने नागरिक रस्त्याच्या कडेला वा मोकळ्या जागेत कचरा टाकत आहेत. सक्करदरा तलावाच्या बाजूला कचरा संकलनासाठी ठेवण्यात आलेल्या कुंड्यांच्या बाजूला कचरा पडून आहे. सक्करदरा भागातील छोटा ताजबाग परिसरात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. अशीच परिस्थिती सक्करदरा येथील बुधवार बाजाराची आहे. बाजारात साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागले आहे. ताजुद्दीन बाबा उड्डाण पुलाखाली कचला उचलला जात नसल्याने ढिगारे लागले आहे. गेल्या तीन-चार दिवसापासून कचरा पडून आहे. महाल येथील राजविलास टॉकीजच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला कचऱ्याचा ढीग साचला आहे. बाजूलाच दुकाने आहे. येथे लोकांची वर्दळ असते असे असूनही साफसफाईसाठी कर्मचारी तैनात करण्यात आलेले नाही.सीताबर्डी उड्डाण पुलाखाली जागोजागी दोन दिवसापासून कचरा साचून आहे.निवासी भागातील अंतर्गत रस्ते स्वच्छ करण्यासाठी सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु दिवाळीमुळे सफाई कर्मचारी मोठ्या प्रमाणात सुटीवर असल्याने साफसफाई बंद आहे. यामुळे अजूनही जागोजागी फटाक्यांचा कचरा तसाच पडून आहे. काही वस्त्यात कचरा संकलन करणारी गाडी फिरली परंतु बहुसंख्य वस्त्यात फिरली नाही. यामुळे जागा मिळेल तिथे कचरा टाकला जात आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न