शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पेंच प्रकल्प परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यास विहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:56 IST

मध्य प्रदेशात बांधण्यात आलेल्या धरणामुळे पेंच प्रकल्पातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तेव्हा पाणीसाठा वाढविण्यासाठी १०२० कोटीचा एक प्रस्ताव तयार करण्यात आला असून सिंचनासाठी पेंच प्रकल्प परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यांना विहीर बांधून देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : १०२० कोटीचा शासनास प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशात बांधण्यात आलेल्या धरणामुळे पेंच प्रकल्पातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तेव्हा पाणीसाठा वाढविण्यासाठी १०२० कोटीचा एक प्रस्ताव तयार करण्यात आला असून सिंचनासाठी पेंच प्रकल्प परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यांना विहीर बांधून देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शेतकरी कर्जमाफी व कर्ज वाटपावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. आतापर्यंत २०० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले असून तालुका स्तरावर शिबिर लावण्यात येत आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या बँकेच्या शाखेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव आरबीआयकडे पाठविण्यात येईल. तसेच त्या बँकेतून शासकीय ठेवीही काढून घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अन्नधान्य पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, लीलाधर वार्डेकर उपस्थित होते.साडेआठ लाख नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभपालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, अन्न सुरक्षा अभियानांतर्गत २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ देण्यात येते. या लाभासाठी शहरी भागात ५० हजार रुपये तर ग्रामीण भागासाठी ४४ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची अट आहे. जुन्या निकषामुळे जिल्ह्यात १ लाख ६१ हजार २० कार्डधारक लाभ घेण्यास अपात्र ठरले होते. मात्र आता नवीन निकषामुळे जिल्ह्यातील जवळपास सव्वा लाख कार्डधारकांना म्हणजेच जवळपास साडेआठ लाख नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळेल. यासाठी त्यांना फक्त हमी व वार्षिक उत्पन्न निकषात असल्याची माहिती द्यायची आहे.एनआयटी बरखास्तीची कारणे न्यायालयास सांगूशहरात एकच विकास संस्था हवी, या मताचे शासन आहे. त्यामुळेच एनआयटी (नागपूर सुधार प्रन्यास) बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. एनआयटीकडे असलेल्या योजना आणि मालमत्ता हस्तांतरणाचा प्रश्न आहे. त्याच्या अविकसित क्षेत्राचा विकासाचा मुद्दा आहे. यावर अद्याप तोडगा निघायचा आहे. तो लवकरच निघेल. एनआयटी बरखास्तीबाबतची योग्य बाजू कोर्टात मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेFarmerशेतकरी