शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

जागतिक अन्न दिवस; नागपुरात रोज १५ टन अन्नाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 10:04 IST

भारतात एकीकडे भूकेमुळे मरण पावणारी बालके, कुपोषण अशा समस्या भेडसावत असताना, दुसरीकडे लाखो टन अन्नाची नासाडी होत आहे, एकट्या नागपुरात रोज १५ टन अन्नाची नासाडी होत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे बुफे संस्कृतीतून वाया जाते अन्न  हॉटेलमधून निघते सर्वाधिक शिळे अन्न

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतात एकीकडे भूकेमुळे मरण पावणारी बालके, कुपोषण अशा समस्या भेडसावत असताना, दुसरीकडे लाखो टन अन्नाची नासाडी होत आहे, एकट्या नागपुरात रोज १५ टन अन्नाची नासाडी होत असल्याची माहिती आहे. ३० लाख लोकसंख्येच्या या शहरात रोज तीन ट्रक अन्न कचऱ्यात फेकले जाते, हे अधिक गंभीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अन्न नासाडी ही चिंताजनक आणि संतापजनक असली तरी नागपुरात सार्वजनिक प्रसंग, उत्सव किंवा पारिवारिक समारंभ व हॉटेल्समध्ये सर्वात जास्त अन्न नासाडी होते. तज्ज्ञांच्या मते, पंक्ती, जेवणावळींमध्ये वाढणारा आणि खाणारा यांचा मेळ नसतो. त्यामुळे अन्नाची नासाडी होते. अन्नाची नासाडी कमी व्हावी यातून बुफेची संकल्पना पुढे आली. त्यातून नासाडी कमी होणे दूरच, ती पंगतीपेक्षाही दुपटीने वाढली आहे. महागाईत प्रचंड वाढ झाली आहे, हे खरे असले तरी नवश्रीमंत वर्ग, उच्च मध्यम व मध्यमवर्गाकडून ‘हॉटेलिंग'चा वापर वाढला आहे. आॅर्डर करताना पूर्वअंदाज न घेता डिशेशची मागणी केली जाते. भूकेचा अंदाज न घेतला गेल्याने बऱ्याचदा अन्न शिल्लक राहते. त्याचा परिणाम हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात शिळे अन्न फेकले जाते. गरजेपेक्षा दोन घास कमीची आॅर्डर केल्यास अन्नाची नासाडी टाळता येणार आहे. परंतु शहरात तसे होताना दिसून येत नाही. महापालिकेच्या हद्दीत सुमारे दोन हजारावर हॉटेल्स आहेत. यातील अनेक हॉटेल्सचालक उरलेले अन्न रात्री उशिरा कचरापेटीत किंवा नाल्यात फेकतात तर काही नियमानुसार मनपाकडे सुपूर्द करतात. अशा हॉटेल्सची केवळ ९०० वर संख्या आहे. त्यांच्याकडून रोज १५ टन शिळे अन्न मिळते. नागपुरात अर्धपोटी व उपासमार सहन करीत जगणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. रोज वाया जणाऱ्या या अन्नावर या भूकेल्यांना चार घास मिळू शकतील एवढे हे अन्न आहे.विचार करायला हवाअन्नाची नासाडी टाळण्यासाठी अन्न खाताना विचार करायला हवा. त्यामुळे अन्नसाठा, साधनसंपत्ती वाचेल, भूकेल्यांना अन्न मिळेल आणि प्रदूषणावरही नियंत्रण येईल. अन्नासाठी आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करीत असल्याने अन्नाचे नियोजन केल्यास ते तसेच साधनसंपत्तीही वाया जाणार नाही. अन्नाची नासाडी थांबविल्यास दूषित वायूची निर्मिती व त्यामुळे होणारे पर्यावरण प्रदूषणही थांबेल.प्यारे खानसामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर