शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

यंदाही बुद्ध पौर्णिमेला प्राणी प्रगणना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:07 IST

नागपूर : बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राण्यांची प्रगणना यंदाही होणार नाही. एवढेच नाही तर कोरोना संक्रमणामुळे यंदा या निसर्गानुभव उपक्रमावर ...

नागपूर : बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राण्यांची प्रगणना यंदाही होणार नाही. एवढेच नाही तर कोरोना संक्रमणामुळे यंदा या निसर्गानुभव उपक्रमावर बंधन घालण्यात आले आहे. तब्बल दुसऱ्या वर्षीही हा उपक्रम होणार नसल्याने वन्यजीव अभ्यासकांचा हिरमोड झाला आहे.

दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात जंगलातील प्राण्यांची गणना केली जाते. मागील अनेक वर्षांपासून वन विभागात ही पद्धत प्रचलित होती. सारेच प्राणी पाणवठ्यावर रोज न येता त्यांच्या ठराविक वेळा असतात, या पद्धतीची गणना अचूकपणे होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर या पद्धतीने होणारी गणना बंद झाली होती. तरीही वन्यजीव अभ्यासकांना प्राण्यांचा अभ्यास जवळून करता यावा, जंगलातील पशु-पक्षी, रात्रीचे जंगलातील वातावरण याचा अनुभव निसर्गप्रेमींना मिळावा आणि जनजागृती व्हावी यासाठी वन विभागाने हा उपक्रम ‘निसर्गानुभव’ या नावाने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला कायम ठेवला होता. अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प, वनक्षेत्राच्या परिसरात तो मचाणावर बसून केला जायचा. मात्र मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा उपक्रम रद्द केला होता. येत्या २६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा असली तरी कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाही हा उपक्रम रद्द करण्यात आला आहे.

पक्षी निरीक्षण, प्राणी निरीक्षणात आवड असणाऱ्यांची या उपक्रमासाठी आठवडाभरापासून नोंदणी करण्यासाठी धावपळ असते. अनेक वन्यजीव अभ्यासक या पर्वणीची वर्षभर वाट पाहत असतात. मात्र लागोपाठ दोन वर्षापासून हा उपक्रम बंद असल्याने निसर्गानुभवाच्या आनंदाला ही मंडळी मुकली आहे.