शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

नागपुरात दुकाने बंद तरीही रस्त्यावर वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 21:32 IST

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २० मार्चपासून शहरात टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर १४ मे गुरुवारपासून ही टाळेबंदी शिथिल करण्यात आली. त्यामुळे गेल्या पावणे दोन महिन्यानंतर शहराच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा गर्दी उसळली आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी ९० टक्के दुकाने अजूनही उघडण्यात आली नसताना रस्त्यांवर वाढलेली गर्दी शंका उपस्थित करणारी आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन शिथिल : विनाकाम फिरणारे साधत आहेत संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २० मार्चपासून शहरात टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर १४ मे गुरुवारपासून ही टाळेबंदी शिथिल करण्यात आली. त्यामुळे गेल्या पावणे दोन महिन्यानंतर शहराच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा गर्दी उसळली आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी ९० टक्के दुकाने अजूनही उघडण्यात आली नसताना रस्त्यांवर वाढलेली गर्दी शंका उपस्थित करणारी आहे.गुरुवारपासून शहरातील लॉकडाऊनला सौम्य करण्यात येऊन, दिशानिर्देशासह व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही बऱ्याच व्यापाऱ्यांच्या मनातील धास्ती अजूनही उतरलेली नसून अनेकांनी दुकाने बंद ठेवण्यातच धन्यता मानली आहे. एरवी व्यापारी प्रतिष्ठाने व ग्राहकांनी गजबजून असलेले महाल लॉकडाऊन शिथिलच्या दुसऱ्या दिवशीही शांतच होते. संपूर्ण व्यापारी पेठ दुसऱ्या दिवशीही बंदच होती. सक्करदरा, नंदनवन या भागातील दुकानेही उघडण्यात आली नव्हती. असे असताना रस्त्यांवर वाढलेली गर्दी अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहेत. शिथिलतेचा लाभ घेत टवाळखोर संधी साधत असल्याचे दिसून येते. विनाकाम बाहेर निघणारे हे टवाळखोर रस्त्यांवरील ट्राफिक कमी असल्याचा फायदा घेत बेफाम वाहने चालवत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या काळात एका बाईकवर एकच, अशी नियमावली असतानाही ट्रिपल सिट गाडी चालवून इतर वाहकांना संकटात टाकत असल्याचेही चित्र शुक्रवारी दुपारचे होते. संध्याकाळी तर पुन्हा या गर्दीत वाढ झाल्याचे दिसून येत होते.पावणे दोन महिन्यानंतर सिग्नल्स सुरू! गेले दीड-पावणे दोन महिने टाळेबंदी असल्याने रस्त्यावरची गर्दी पूर्णपणे ओसरली होती. त्यामुळे, चौकांतील सिग्नल्स बंद झाली होती आणि ट्राफिक नियमावलीही सैल पडली होती. मात्र, शुक्रवारी रस्त्यावर वाढलेल्या चौतरफा गर्दीमुळे पुन्हा एकदा सिग्नल्स सुरू झाल्याची जाणिव होत होती. पोलीस यंत्रणा लॉकडाऊनमध्ये व्यस्त असल्याने या चौकांमध्ये पोलीस नव्हते तरीही नागरिक सिग्नल्स पाळत असल्याचे दिसून येत होते. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर