शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागपुरात दुकाने बंद तरीही रस्त्यावर वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 21:32 IST

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २० मार्चपासून शहरात टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर १४ मे गुरुवारपासून ही टाळेबंदी शिथिल करण्यात आली. त्यामुळे गेल्या पावणे दोन महिन्यानंतर शहराच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा गर्दी उसळली आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी ९० टक्के दुकाने अजूनही उघडण्यात आली नसताना रस्त्यांवर वाढलेली गर्दी शंका उपस्थित करणारी आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन शिथिल : विनाकाम फिरणारे साधत आहेत संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २० मार्चपासून शहरात टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर १४ मे गुरुवारपासून ही टाळेबंदी शिथिल करण्यात आली. त्यामुळे गेल्या पावणे दोन महिन्यानंतर शहराच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा गर्दी उसळली आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी ९० टक्के दुकाने अजूनही उघडण्यात आली नसताना रस्त्यांवर वाढलेली गर्दी शंका उपस्थित करणारी आहे.गुरुवारपासून शहरातील लॉकडाऊनला सौम्य करण्यात येऊन, दिशानिर्देशासह व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही बऱ्याच व्यापाऱ्यांच्या मनातील धास्ती अजूनही उतरलेली नसून अनेकांनी दुकाने बंद ठेवण्यातच धन्यता मानली आहे. एरवी व्यापारी प्रतिष्ठाने व ग्राहकांनी गजबजून असलेले महाल लॉकडाऊन शिथिलच्या दुसऱ्या दिवशीही शांतच होते. संपूर्ण व्यापारी पेठ दुसऱ्या दिवशीही बंदच होती. सक्करदरा, नंदनवन या भागातील दुकानेही उघडण्यात आली नव्हती. असे असताना रस्त्यांवर वाढलेली गर्दी अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहेत. शिथिलतेचा लाभ घेत टवाळखोर संधी साधत असल्याचे दिसून येते. विनाकाम बाहेर निघणारे हे टवाळखोर रस्त्यांवरील ट्राफिक कमी असल्याचा फायदा घेत बेफाम वाहने चालवत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या काळात एका बाईकवर एकच, अशी नियमावली असतानाही ट्रिपल सिट गाडी चालवून इतर वाहकांना संकटात टाकत असल्याचेही चित्र शुक्रवारी दुपारचे होते. संध्याकाळी तर पुन्हा या गर्दीत वाढ झाल्याचे दिसून येत होते.पावणे दोन महिन्यानंतर सिग्नल्स सुरू! गेले दीड-पावणे दोन महिने टाळेबंदी असल्याने रस्त्यावरची गर्दी पूर्णपणे ओसरली होती. त्यामुळे, चौकांतील सिग्नल्स बंद झाली होती आणि ट्राफिक नियमावलीही सैल पडली होती. मात्र, शुक्रवारी रस्त्यावर वाढलेल्या चौतरफा गर्दीमुळे पुन्हा एकदा सिग्नल्स सुरू झाल्याची जाणिव होत होती. पोलीस यंत्रणा लॉकडाऊनमध्ये व्यस्त असल्याने या चौकांमध्ये पोलीस नव्हते तरीही नागरिक सिग्नल्स पाळत असल्याचे दिसून येत होते. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर