शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

लॉकडाऊनमुळे कामगार गावी गेले : परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत कामे ठप्पच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 22:39 IST

लॉकडाऊनमुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने बांधकामासह काही अन्य क्षेत्रांतील कामे सुरू करण्याची परवानगी दिली. नागपूर शहरातील सिमेंट रोड, रस्ते, उड्डाणपूलासह अन्य कामे सुरू होतील अशी आशा होती. परंतु यासाठी महत्त्वाचा घटक असलेले कामगार गावी गेले आहेत. काही दिवसांनी लॉकडाऊन संपला तरी निर्माण झालेली परिस्थिती बघता कामगार परण्याची शक्यता नाही. त्यामुळे परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत विकासकामे ठप्पच राहणार आहेत.

ठळक मुद्देसिमेंट रोडसह विकासकामांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने बांधकामासह काही अन्य क्षेत्रांतील कामे सुरू करण्याची परवानगी दिली. नागपूर शहरातील सिमेंट रोड, रस्ते, उड्डाणपूलासह अन्य कामे सुरू होतील अशी आशा होती. परंतु यासाठी महत्त्वाचा घटक असलेले कामगार गावी गेले आहेत. काही दिवसांनी लॉकडाऊन संपला तरी निर्माण झालेली परिस्थिती बघता कामगार परण्याची शक्यता नाही. त्यामुळे परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत विकासकामे ठप्पच राहणार आहेत.महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता मनपा आयुक्तांनी नवीन विकासकामांना ब्रेक लावले होते. सुरू असलेले प्रकल्प, सिमेंट रोडची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. अर्धवट सिमेंट रोडची कामे पावसाळ्यापूर्वी होतील, अशी अपेक्षा होती. पण लॉकडाऊन सुरू होताच कामे ठप्प पडली. महापालिकेत लहानमोठे २०० कंत्राटदार आहेत. प्रत्येकाकडे सरासरी २० ते २५ कामगार आहेत. म्हणजेच ४ ते ५ हजार कामगार काम करीत होते. यात प्रामुख्याने मध्य प्रदेशातील कामगारांचा समावेश आहे.तसेच इंजिनिअर, ट्रकचालक, टिप्पर चालक अशा कुशल कामगारांचाही यात समावेश आहे. आधीच बिल वेळेवर मिळत नाही. त्यात अर्धवट कामामुळे कंत्राटदारांना बिल सादर करणे शक्य नाही. पुढे काही महिने बिल मिळण्याची शक्यता नाही. अशा कोंडीत कंत्राटदार सापडले आहेत. होळीसाठी गावी गेलेले कामगार परतले होते. पण लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने व जवळ पैसे नसल्याने कामगार मिळेल त्या साधनाने गावी गेले. मनपा कंत्राटदारांना बिल मिळालेले नाही. अशा परिस्थितीत कामगारांना थांबविण्यासाठी त्यांना देण्यासाठी कंत्राटदारांकडे पैसै नव्हते. त्यामुळे कामगारांना थांबविणे शक्य झाले नाही.पावसाळ्यापूर्वी सिमेंट रोड पूर्ण होणे अशक्यलॉकडाऊनमुळे सिमेंट रोडसह प्रकल्पांचे बांधकाम ठप्प आहे. कामगार त्यांच्या गावी गेल्याने इतक्यात ते परतण्याची शक्यता नाही. त्यामुळे सिमेट रोडची अर्धवट कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नाही. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.कामगार नाहीत, सिमेंटचे दरही वाढलेनवीन कामांना मंजुरी नाही. जुनी कामे सुरू होती. त्यात पावसाळ्यानंतर मनपातील कंत्राटदारांना बिल मिळालेले नाही. वेळेवर बिले मिळत नाहीत. लॉकडाऊनमुळे कामगार गावी गेले आहेत. स्थानिक कामगार बांधकाम क्षेत्रात काम करीत नाहीत. कंत्राट घेतला तेव्हा सिमेंटच्या बॅगेची किंमत २४० रुपये होते. आता ३७० रुपये झाली आहे. पुढे पावसाळा सुरू होईल. अशा अडचणीत मनपातील कंत्राटदार सापडले आहेत. प्रशासनाने किमान बिल दिले तर थोडा दिलासा मिळेल. विजय नायडू, अध्यक्ष, मनपा कंत्राट संघटना

टॅग्स :Migrationस्थलांतरणLabourकामगार