शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे कामगार गावी गेले : परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत कामे ठप्पच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 22:39 IST

लॉकडाऊनमुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने बांधकामासह काही अन्य क्षेत्रांतील कामे सुरू करण्याची परवानगी दिली. नागपूर शहरातील सिमेंट रोड, रस्ते, उड्डाणपूलासह अन्य कामे सुरू होतील अशी आशा होती. परंतु यासाठी महत्त्वाचा घटक असलेले कामगार गावी गेले आहेत. काही दिवसांनी लॉकडाऊन संपला तरी निर्माण झालेली परिस्थिती बघता कामगार परण्याची शक्यता नाही. त्यामुळे परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत विकासकामे ठप्पच राहणार आहेत.

ठळक मुद्देसिमेंट रोडसह विकासकामांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने बांधकामासह काही अन्य क्षेत्रांतील कामे सुरू करण्याची परवानगी दिली. नागपूर शहरातील सिमेंट रोड, रस्ते, उड्डाणपूलासह अन्य कामे सुरू होतील अशी आशा होती. परंतु यासाठी महत्त्वाचा घटक असलेले कामगार गावी गेले आहेत. काही दिवसांनी लॉकडाऊन संपला तरी निर्माण झालेली परिस्थिती बघता कामगार परण्याची शक्यता नाही. त्यामुळे परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत विकासकामे ठप्पच राहणार आहेत.महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता मनपा आयुक्तांनी नवीन विकासकामांना ब्रेक लावले होते. सुरू असलेले प्रकल्प, सिमेंट रोडची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. अर्धवट सिमेंट रोडची कामे पावसाळ्यापूर्वी होतील, अशी अपेक्षा होती. पण लॉकडाऊन सुरू होताच कामे ठप्प पडली. महापालिकेत लहानमोठे २०० कंत्राटदार आहेत. प्रत्येकाकडे सरासरी २० ते २५ कामगार आहेत. म्हणजेच ४ ते ५ हजार कामगार काम करीत होते. यात प्रामुख्याने मध्य प्रदेशातील कामगारांचा समावेश आहे.तसेच इंजिनिअर, ट्रकचालक, टिप्पर चालक अशा कुशल कामगारांचाही यात समावेश आहे. आधीच बिल वेळेवर मिळत नाही. त्यात अर्धवट कामामुळे कंत्राटदारांना बिल सादर करणे शक्य नाही. पुढे काही महिने बिल मिळण्याची शक्यता नाही. अशा कोंडीत कंत्राटदार सापडले आहेत. होळीसाठी गावी गेलेले कामगार परतले होते. पण लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने व जवळ पैसे नसल्याने कामगार मिळेल त्या साधनाने गावी गेले. मनपा कंत्राटदारांना बिल मिळालेले नाही. अशा परिस्थितीत कामगारांना थांबविण्यासाठी त्यांना देण्यासाठी कंत्राटदारांकडे पैसै नव्हते. त्यामुळे कामगारांना थांबविणे शक्य झाले नाही.पावसाळ्यापूर्वी सिमेंट रोड पूर्ण होणे अशक्यलॉकडाऊनमुळे सिमेंट रोडसह प्रकल्पांचे बांधकाम ठप्प आहे. कामगार त्यांच्या गावी गेल्याने इतक्यात ते परतण्याची शक्यता नाही. त्यामुळे सिमेट रोडची अर्धवट कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नाही. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.कामगार नाहीत, सिमेंटचे दरही वाढलेनवीन कामांना मंजुरी नाही. जुनी कामे सुरू होती. त्यात पावसाळ्यानंतर मनपातील कंत्राटदारांना बिल मिळालेले नाही. वेळेवर बिले मिळत नाहीत. लॉकडाऊनमुळे कामगार गावी गेले आहेत. स्थानिक कामगार बांधकाम क्षेत्रात काम करीत नाहीत. कंत्राट घेतला तेव्हा सिमेंटच्या बॅगेची किंमत २४० रुपये होते. आता ३७० रुपये झाली आहे. पुढे पावसाळा सुरू होईल. अशा अडचणीत मनपातील कंत्राटदार सापडले आहेत. प्रशासनाने किमान बिल दिले तर थोडा दिलासा मिळेल. विजय नायडू, अध्यक्ष, मनपा कंत्राट संघटना

टॅग्स :Migrationस्थलांतरणLabourकामगार