शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मुले कमावती असली तरीही पत्नीला पोटगी द्यावीच लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 06:48 IST

कुटुंब न्यायालयाने पत्नी कलावतीला पाच हजार रुपये पोटगी मंजूर केल्यामुळे पती वसंतरावने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

राकेश घानोडेनागपूर : मुले कमावती असली तरीही पत्नीला पोटगी द्यावीच लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी दिला. पत्नीचे पालनपोषण करणे हे पतीचे प्राथमिक दायित्व आहे, असेदेखील कोर्टाने म्हटले.

कुटुंब न्यायालयाने पत्नी कलावतीला पाच हजार रुपये पोटगी मंजूर केल्यामुळे पती वसंतरावने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कलावती चार मुलांकडे रहात असून चारही मुले कमावती आहेत. त्यामुळे तिला पोटगी देण्याची गरज नाही. तिचे पालन-पोषण करण्याची आपली जबाबदारी नाही, असे वसंतरावने याचिकेत म्हटले होते. न्यायालयाने वसंतरावचे हे मुद्दे आधारहीन ठरवले. केवळ मुले कमावती असल्यामुळे पत्नीची देखभाल करण्याच्या जबाबदारीतून पती मोकळा होत नाही, असे न्यायालयाने बजावले. याशिवाय वसंतरावने कलावती बुटीक चालविते व ती एका भाडेकरूकडून पाच हजार रुपये महिना भाडे मिळवते, असाही दावा केला होता. न्यायालयाने यासंदर्भात रेकॉर्डवर काहीच पुरावे नसल्याचे नमूद करून वसंतरावचे हे दावेही फेटाळले. 

टॅग्स :Courtन्यायालय