शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
4
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
5
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
6
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
7
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
8
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
9
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
10
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
11
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
12
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
14
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
15
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
16
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
17
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
18
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
19
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
20
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर

पुरात स्वप्नही वाहून गेले....; नागपूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टर शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 20:58 IST

Nagpur News गत आठवड्यात ढगफुटीसदृश झालेल्या अतिवृष्टीने नागपूर जिल्ह्यात सावनेर, भिवापूर, उमरेड, कुही, नरखेड आणि काटोल तालुक्यातील शेती अक्षरशः खरडून नेली. नदी-नाल्यांचे पाणी शिवारात शिरले.

नागपूर : गत आठवड्यात ढगफुटीसदृश झालेल्या अतिवृष्टीने नागपूर जिल्ह्यात सावनेर, भिवापूर, उमरेड, कुही, नरखेड आणि काटोल तालुक्यातील शेती अक्षरशः खरडून नेली. नदी-नाल्यांचे पाणी शिवारात शिरले.

महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात २९ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा उत्पादन चांगले होईल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचे मात्र पुरात स्वप्न वाहून गेले आहे. आता सरकार मदत करेल, या आशेवर तो जीवन जगतो आहे.

२६ जणांचा गेला जीव

नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार १ जूनपासून २२ जुलैपर्यंत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे २६ जणांचा जीव गेला आहे. २२ जण जखमी झाले. १९५ पशुहानी झाली. ५३३ पक्ष्यांचाही मृत्यू झाला. तर १५१९ घरे, गोठे, व झोपड्यांचे नुकसान झाले आहे. तलावाचा बांध फुटल्याने नागपूर ग्रामीण तालुक्यातील जुनापाणी गाव बुडाले.

सावनेर, उमरेड, भिवापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान

मुसळधार पावसामुळे सावनेर, उमरेड आणि भिवापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सावनेर तालुक्यात ५ हजारांहून अधिक हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. ५० हून अधिक गावांत पुराचे पाणी शिरले. भिवापूर तालुक्यात ५,३३४ शेतकऱ्यांचे ५,५०७ हेक्टरवर शेतातील पिकांचे नुकसान झाले. उमरेड तालुक्यात ७,५५२.२७ हेक्टर क्षेत्रातील पिकास फटका बसला.

शेती बुडाली, मुलांना कसं शिकवू ?

काटोल तालुक्यातील चिखली नजीकच्या गोन्ही शिवारात बाबाराव काळे यांच्या ४ एकर शेती आहे. दीड एकरात सोयाबीन आणि तूर लावली होती. तर उर्वरित जागेवर पऱ्हाट होती. बियाणे अंकुरताना मुसळधार पावसाने घात केला. अख्खे शिवार पाण्याखाली आले. आता पिके सडू लागली आहे. शेतीसाठी एक लाखाचे कर्ज झाले. नववी आणि बारावीत असलेल्या मुलांचे शिक्षण करायचे आहे. साहेब यंदा सारेच बुडाले, मुले कसे शिकवू, काय खाऊ? असा पाणावलेल्या डोळ्यांनी प्रश्न त्यांना विचारला.

शेतात तळे, पिके पवळी !

सावनेर तालुक्यात शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी आहे. दोन दिवस उघड मिळाली. मात्र, आता पुन्हा ढग दाटून आले. अतिपावसाने खुबाळा, रिचा, सावनेर, कुसुंबी, नांदोरी, बडेगाव, खापा, उमरी जांभळापाणी, सिल्लोरी, बिचवा, कोच्छी, भेंडाळा, वाकोडी, गडेगाव, आंगेवाडा, तिघही, टेंभुरडोह शिवारातील पिके पिवळी पडू लागली आहेत.

रात्र जागून काढली...

गत रविवारी भिवापूर तालुक्यातील १० वर गावांत पुराचे पाणी शिरले. मध्यरात्रीच्या सुमारास नांद, चिखलापार, वणी, खरकाळा, धामनगाव (वि.म.), वडध, चिखली, जवळी, रोहणा आदी दहा गावांतील असंख्य घरांत पुराचे पाणी शिरल्यामुळे येथील ग्रामस्थांना अख्खी रात्र जागून काढावी लागली.

टॅग्स :floodपूर