शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

आठवड्यानंतरही त्या बाळांना न्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या हृद्यद्रावक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या हृद्यद्रावक घटनेला आठवडा झाला आहे. मात्र संपूर्ण देशाच्या मनात कालवाकालव करणाऱ्या या घटनेला आठवडा उलटूनदेखील, कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. अद्याप कुणावर ना गुन्हा दाखल झाला आहे, ना चौकशीचा अहवाल सादर झाला आहे. नेमकी कुणावर जबाबदारी निश्चित करायची, हेदेखील स्पष्ट झालेले नसून विविध विभागांकडून एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करण्यात येत आहे. एरवी राजकीय स्वार्थ असलेल्या प्रकरणांत काही तासांच्या आत गुन्हा दाखल होऊन संबंधितांना अटक होताना दिसून येते. परंतु गरिबांच्या लेकरांना अकाली मृत्यूनंतरदेखील प्रशासकीय अनास्थेचाच सामना करावा लागत आहे.

दि. ९ जानेवारी रोजी संबंधित घटना घडल्यानंतर ‘व्हीव्हीआयपी’ नेते, अर्धा डझनाहून अधिक मंत्री ते सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींपर्यंत अनेकांनी घटनास्थळाला भेट दिली. कुणी आर्थिक मदत जाहीर केली, तर कुणी कारवाई करण्याची भाषा केली. मात्र कारवाई कुणावर करावी, हेच अद्याप ठरलेले नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने मंत्रालयात अहवाल सादर केला. यात आरोग्य विभागावरच जबाबदारी ढकलण्यात आली. दुसरीकडे आरोग्य खात्याचा अहवाल सादर करण्यासाठी कोणता मुहूर्त शोधला जात आहे, हा प्रश्नच आहे. आता आरोग्य विभागाच्या अहवालात कोणावर ठपका ठेवला जातो, याकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आठवडाभरात त्या बाळांच्या कुटुंबियांचे व विशेषत: मातांचे अश्रू थांबलेले नाहीत. अशा घटनांमध्ये त्वरित कारवाई अपेक्षित असते. मात्र अगदी मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतरदेखील कारवाईची दिशा स्पष्ट झालेली नाही. जिल्हा शल्यचिकित्सकांपासून ते कर्तव्यावर असलेल्या परिचारिकांची केवळ चौकशीच झाली आहे. एकूणच प्रशासनाच्या या भूमिकेमुळे सामान्य जनतेत रोष आहे. गरिबांच्या आक्रोशाला वाली कोण, असा प्रश्न आठवड्याभरात वारंवार उपस्थित झाला आहे.

‘व्हीआयपी’ नेत्यांच्या भेटी अन् कोरडी सहानुभूती

संबंधित घटना घडल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापासून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह अनेक मंत्री तेथे पोहोचले. कारवाईची भाषा सर्वांनी केली. पण त्यांची सहानुभूती प्रत्यक्षात कोरडीच ठरली व पीडित कुटुंबियांना काहीच दिलासा मिळालेला नाही.

चौकशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षाच

राज्य शासनाने अगोदर आरोग्य संचालक साधना तायडे यांच्याकडे सहासदस्यीय चौकशी समितीचे अध्यक्षपद दिले होते व त्यांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांची उचलबांगडी केली व चौकशी समितीची धुरा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याहाती दिली. त्यांना तत्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले होते. परंतु अद्याप समितीचा अहवाल सादर झालेला नाही.

इलेक्ट्रिक ऑडिट होणार का ?

‘इलेक्ट्रिक ऑडिट’चा मुद्दा ‘लोकमत’ने उपस्थित केला व त्यानंतर ऊर्जा खात्याला जाग आली. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी भंडाऱ्याला भेट दिली. मात्र राज्यभरातील रुग्णालयांचे ‘इलेक्ट्रिक ऑडिट’ किती कालावधीत होणार, यावर त्यांनी भाष्य केले नाही.