शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

केंद्राच्या निर्देशानंतरही जनावरांचा खाद्य तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 13:30 IST

केंद्र शासनाच्या मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्रालयातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. पशुखाद्यांचा जीवनावश्यक गोष्टीत समावेश करून आंतरराज्यीय वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्राण्यांचे खाद्यदर वाढलेजिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही दुकाने बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूची साखळी तोडून महामारीच्या नियंत्रणासाठी संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे आणि ती परिस्थितीची गरजही आहे. मात्र या काळात शहरातील पाळीव प्राण्यांना हाल सोसावे लागत आहेत. नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश असल्याने प्राण्यांची अन्नासाठी भटकंती वाढली आहे. दुसरीकडे घरगुती पाळलेल्या प्राण्यांसाठीच्या खाद्यान्नाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे पुरवठा खंडित झाल्याने प्राण्यांच्या खाद्यपदार्थांचे दर दुपटीने वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. लॉकडाउनच्या काळात जनावरांना अन्नाचा तुटवडा भासणार नाही, यासाठी केंद्र शासनाच्या मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्रालयातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. पशुखाद्यांचा जीवनावश्यक गोष्टीत समावेश करून आंतरराज्यीय वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. अन्नाविना प्राण्यांचा मृत्यू आणि त्यातून पुन्हा आजार पसरण्याचा धोका लक्षात घेता, मंत्रालयांतर्गत भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डातर्फे प्रत्येक जिल्हा प्रशासनाला व्हॉलेन्टीयर्सची टीम तयार करून प्राण्यांच्या अन्नाची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नागपूर जिल्हाधिकारी यांनीही रस्त्यावर भटकंती करणाऱ्या प्राण्यांना अन्न वितरित करण्याचे आवाहन नागरिकांना केले असून, प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने सुरू करण्याचीही सूचना केली केली आहे. याशिवाय महापालिकेनेही पशुखाद्य वाहतुकीला संचारबंदीतून सूट दिली आहे आणि कुत्री, गाई आदी प्राण्यांना अन्न देणाऱ्यांना पासेस देण्यात येत आहेत. सर्व स्तरावरून निर्देश असूनही पशुखाद्याचा प्रचंड तुटवडा भासत आहे. एकीकडे परदेशातून खाद्यपदार्थांची आयात थांबली आहे. दुसरीकडे देशातही खाद्यपुरवठा खंडित झाला असल्याने शहरामध्ये प्राण्यांचे खाद्य मिळेनासे झाले आहे. व्यावसायिकांकडे स्टॉक असेलही पण दुकाने सुरू करण्यास तेही धजावत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्राणी पाळणाºयांना मोठी समस्या येत आहे. काही व्यावसायिक फोन केल्यास पशुखाद्य देतात, मात्र त्यांचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. १५०० रुपयांना मिळणारे खाद्य अडीच ते तीन हजारापर्यंत विकले जात असल्याचे प्राणिमित्रांचे म्हणणे आहे.

- प्राण्यांच्या खाद्यांचे दर खूप वाढलेशहरातील प्राणिप्रेमी स्मिता मिरे या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र चालवितात. जवळपास १५० कुत्र्यांना ते दररोज अन्न देतात. शिवाय त्यांच्या संस्थेतर्फे टीमद्वारे शहरातील विविध भागात स्वयंसेवकांमार्फत कुत्र्यांना खाद्य पुरवठा केला जाते. लॉकडाऊननंतर खाद्याचे दर दुपटीने वाढल्याचे त्यांनी सांगितले. एक तर खाद्य मिळत नाही. त्यासाठी दूरवर शोधत जावे लागते. त्यांच्याकडेही स्टॉक संपल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चढ्या किमतीत खरेदी करावी लागते. एखादा प्राणी असेल त्यांचे ठीक आहे, मात्र आमची अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले.- महापालिकेने घेतली एनजीओची मदतरस्त्यावर भटकणाऱ्या प्राण्यांना अन्नाचा तुटवडा भासू नये म्हणून महापालिकेने व्यवस्था केली आहे. त्यासाठी शहरातील एनजीओची मदत घेतल्याचे मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले. घाटे रेस्टॉरंट आणि गुरुद्वारा सेवा समितीतर्फे दररोज २०० ते ३०० किलो पोळ्या मिळत असून, एनजीओद्वारे रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरांना पुरवल्या जाते. अन्न पोहचविताना पोलीस विभागाची अडचण येऊ नये म्हणून पासेसही देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेचीही टीम असून एनजीओ पोहचत नसलेल्या भागात आमच्या टीमद्वारे प्राण्यांना अन्नपुरवठा होत असल्याचे डॉ. महल्ले यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :foodअन्न