शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

धर्मांतरण केल्यावरही आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांविरोधात न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 21:32 IST

Nagpur News धर्मपरिवर्तन केल्यानंतरही आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची भूमिका विश्व हिंदू परिषदेने मांडली आहे.

ठळक मुद्देअखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी स्पष्ट केली विहिंपची भूमिका

नागपूर : धर्मांतर करून ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना मिळणारे आरक्षण संविधान संमत नाही. धर्मपरिवर्तन केल्यानंतरही आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची भूमिका विश्व हिंदू परिषदेने मांडली आहे. विहिंपचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी या संदर्भात पत्रपरिषदेत भाष्य केले.

ख्रिश्चन व मुस्लिमांनी १९३६ मध्ये आरक्षणाची मागणी केली होती, परंतु महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरित अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना आरक्षण देण्यास स्पष्ट नकार दिला होता. गेल्या काही वर्षांत असे आढळून आले आहे की, अनेक लोक धर्मांतर केल्यानंतरही पूर्वीचे नाम, उपनाम कायम ठेवून अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणाचा लाभ घेताना दिसतात. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा परांडे यांनी दिला.

काँग्रेस नेते शिवराज पाटील यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात म्हटले होते की, “भगवान श्रीकृष्णाने भगवत गीतेत अर्जुनाला जिहाद शिकविला होता.” हिंदू चिंतनात जिहादच्या संकल्पनेला स्थान नाही. भगवान श्रीकृष्णाने गीतेत कर्मयोग शिकविला आहे. भगवत गीता हा ग्रंथ इस्लामच्या उदयापूर्वीचा आहे. त्यामुळे गीतेत जिहाद सांगितला आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. शिवराज पाटील यांनी प्रसिद्धी, तुष्टीकरण आणि समाजात भ्रम निर्माण करण्यासाठी असे विधान केले असावे, असा टोलाही परांडे यांनी लगावला.

टॅग्स :BJPभाजपा