शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नगरसेवकांच्या तक्रारीनंतरही खड्डा बुजत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:50 IST

शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात डांबरीकरण शक्य नसल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून पुढे केले जात आहे. नासुप्रचीही अशीच भूमिका आहे. महापालिकेने तर अजब धोरण स्वीकारले आहे. तक्रार असेल तोच खड्डा बुजवायचा, अन्य खड्डे जीवघेणे असले तरी त्याची दखलच घ्यायची नाही. प्रशासन इतके मुजोर झाले आहे, की नगरसेवकाने तक्रार केल्यानतंरही खड्डा बुजवला जात नाही.

ठळक मुद्देमुजोर प्रशासनाला आवरणार कोण : आटोमोटिव्ह चौकात खड्ड्यामुळे अपघाताचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात डांबरीकरण शक्य नसल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून पुढे केले जात आहे. नासुप्रचीही अशीच भूमिका आहे. महापालिकेने तर अजब धोरण स्वीकारले आहे. तक्रार असेल तोच खड्डा बुजवायचा, अन्य खड्डे जीवघेणे असले तरी त्याची दखलच घ्यायची नाही. प्रशासन इतके मुजोर झाले आहे, की नगरसेवकाने तक्रार केल्यानतंरही खड्डा बुजवला जात नाही.उत्तर नागपुरातील आटोमोटिव्ह चौकातून इतवारीकडे जाणाऱ्या मार्गावर मागील काही दिवसांपासून मोठा खड्डा पडला आहे. या भागातील बसपाचे नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी महापालिका प्रशासन व नासुप्रकडे तक्रार केली आहे. परंतु अद्याप या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ता कुणाच्या मालकीचा आहे. यापेक्षा या रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून तक्रार प्राप्त होताच महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेणे अपेक्षित होते. परंतु विभागाला अपघाताशी काहीही देणेघेणे नाही.शहरातील खड्ड्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून नागरिकांच्या जीवितालाच धोका निर्माण झाला आहे. शहरात मेट्रो, सिमेंट रस्ते व उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. त्याकरिता रस्त्यांच्या मधोमध खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यात पुन्हा केबल आॅपरेटर्सही खड्डे खोदत आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहे. यासंदर्भात माहिती घेतली असता रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असताही महापालिकेचे अधिकारी मात्र केवळ लेखी स्वरूपात तक्रार दिल्यानंतरच खड्ड्यांची दखल घेत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एप्रिल ते जूनपर्यंत महापालिकेकडे एक हजार नऊ खड्ड्यांची तक्रार प्राप्त झाली. मात्र, त्यापैकी केवळ ७३३ खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली. उर्वरित २६६ खड्डे तसेच राहिले. आॅगस्टपर्यंत ही संख्या जवळपास चार हजारापर्यंत वाढली. महापालिकेने त्यापैकी तीन हजार खड्डे बुजवण्याचा दावा केला आहे.पावसाळाभर त्रास सोसावा लागणारखड्डे बुजवण्यासाठी महापालिकेचा स्वत:चा हॉटमिक्स प्रकल्प आहे. त्या माध्यमातून खड्डे बुजवण्यात येतात. मात्र अद्याप सुरू झालेला नाही. पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी हॉटमिक्स प्रकल्प बंद असल्याने चुरी टाकून ते दाबण्यात येतात. परंतु पाऊ स आला की ही चुरी बाहेर पडते व पुन्हा खड्डा पडतो. पावसाळा संपेपर्यंत हा प्रकार सुरू राहणार असल्याने नागरिकांना त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नाही.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा