शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नागपूर सुधार प्रन्यास कायद्यांतर्गत न्यायाधिकरण स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 10:48 IST

भूसंपादनविषयीच्या वादाची प्रकरणे ऐकून निर्णय देण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास कायदा-१९३६ मधील कलम ६० अंतर्गत न्यायाधिकरणची स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा न्यायाधीश अध्यक्षपदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूसंपादनविषयीच्या वादाची प्रकरणे ऐकून निर्णय देण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास कायदा-१९३६ मधील कलम ६० अंतर्गत न्यायाधिकरणची स्थापना करण्यात आली आहे. न्यायाधिकरणात जिल्हा न्यायाधीशांची अध्यक्ष तर, नगर रचना विभागातील दोन संचालकांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली आहे.२ फेब्रुवारी २०१६ रोजी उच्च न्यायालयाला दिलेल्या हमीनुसार चार महिन्यांत न्यायाधिकरणची स्थापना करण्यात राज्य सरकारला अपयश आले होते. त्यामुळे भगीरथीबाई वाकोडीकर व इतरांनी नगर विकास विभागाचे सचिव डॉ. नितीन करीर यांच्याविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली होती. ही याचिका प्रलंबित असताना सरकारने न्यायाधिकरण स्थापन केले. परिणामी न्यायालयाने सचिवांचा माफीनामा स्वीकारून ही याचिका निकाली काढली.१९९९ मध्ये भगीरथीबाई वाकोडीकर व इतरांची जमीन नासुप्र कायद्यांतर्गत संपादित करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी समाधानकारक भरपाईसाठी २००४ मध्ये दावा सादर केला. परंतु, न्यायाधिकरण नसल्यामुळे दाव्यावर निर्णय होऊ शकल नाही. परिणामी, त्यांनी न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयात सुरुवातीला रिट याचिका दाखल केली होती. सरकारने चार महिन्यांत न्यायाधिकरण स्थापन करण्याची ग्वाही दिल्यामुळे २ फेब्रुवारी २०१६ रोजी ही याचिका निकाली काढण्यात आली होती. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. ए. एस. ढोरे तर सरकारतर्फे अ‍ॅड. राजीव छाबरा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास