शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

श्रीगणेशाची स्थापना, सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ९.३० ते ११ पर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 19:35 IST

सोमवारी २ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी असून, भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापनेसाठी व पूजनासाठी विशिष्ट वेळ किंवा मुहूर्त नसतो. त्यामुळे, प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत अर्थात दुपारी १.३० वाजतापर्यंत कधीही स्थापना व पूजन करता येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी २ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी असून, भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापनेसाठी व पूजनासाठी विशिष्ट वेळ किंवा मुहूर्त नसतो. त्यामुळे, प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत अर्थात दुपारी १.३० वाजतापर्यंत कधीही स्थापना व पूजन करता येईल.स्थापना व पूजनासाठी सकाळी ६.३० ते ८ वाजतापर्यंत उत्तम वेळ लागून आली आहे. तरी मुहूर्तानुसार स्थापना करणाऱ्यांसाठी या दिवसातील सर्वोत्तम असा मुहूर्त सकाळी ९.३० ते ११ वाजतापर्यंतचा आहे. या वेळांमध्ये वातावरणात चंद्र व गुरू या ग्रहांचा शुभप्रभाव असल्याचे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. या दिवशी भद्रा प्रारंभ दुपारी ३.२२ वाजतापासून आहे. चंद्रास्त रात्री ९.०८ वाजता आहे. सार्वजनिक गणेशाची स्थापना सांगितलेल्या वेळेव्यतिरिक्त दुपारी १.३० ते संध्याकाळी ६.३० वाजतापर्यंत करता येईल. या दिवशी राहूकाल सकाळी ७.३० ते ९ वाजतापर्यंत असला तरी गणेश स्थापना व पूजन करता येईल, असा योग असल्याचे वैद्य यांनी सांगितले. भाद्रपद गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशस्थापना व पूजन करणे शक्य नसल्यास, त्या दिवसानंतर त्यावर्षी ते करू नये. यामुळे, एखाद्या वर्षी श्रीगणेश स्थापना झाली नाही तर अघटित घडेल, असे होत नाही. तसेच, स्थापनेनंतर अशौच आल्यास दुसºयाकडून लगेच गणपती विसर्जन करून घ्यावे. एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झाले तरी चालतील, असे शास्त्रच सांगत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. यासोबतच, गणेश विसर्जनाबाबतीत कोणतीही अंधश्रद्धा पाळू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीReligious programmeधार्मिक कार्यक्रम