शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

श्रीगणेशाची स्थापना, सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ९.३० ते ११ पर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 19:35 IST

सोमवारी २ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी असून, भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापनेसाठी व पूजनासाठी विशिष्ट वेळ किंवा मुहूर्त नसतो. त्यामुळे, प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत अर्थात दुपारी १.३० वाजतापर्यंत कधीही स्थापना व पूजन करता येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी २ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी असून, भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापनेसाठी व पूजनासाठी विशिष्ट वेळ किंवा मुहूर्त नसतो. त्यामुळे, प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत अर्थात दुपारी १.३० वाजतापर्यंत कधीही स्थापना व पूजन करता येईल.स्थापना व पूजनासाठी सकाळी ६.३० ते ८ वाजतापर्यंत उत्तम वेळ लागून आली आहे. तरी मुहूर्तानुसार स्थापना करणाऱ्यांसाठी या दिवसातील सर्वोत्तम असा मुहूर्त सकाळी ९.३० ते ११ वाजतापर्यंतचा आहे. या वेळांमध्ये वातावरणात चंद्र व गुरू या ग्रहांचा शुभप्रभाव असल्याचे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. या दिवशी भद्रा प्रारंभ दुपारी ३.२२ वाजतापासून आहे. चंद्रास्त रात्री ९.०८ वाजता आहे. सार्वजनिक गणेशाची स्थापना सांगितलेल्या वेळेव्यतिरिक्त दुपारी १.३० ते संध्याकाळी ६.३० वाजतापर्यंत करता येईल. या दिवशी राहूकाल सकाळी ७.३० ते ९ वाजतापर्यंत असला तरी गणेश स्थापना व पूजन करता येईल, असा योग असल्याचे वैद्य यांनी सांगितले. भाद्रपद गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशस्थापना व पूजन करणे शक्य नसल्यास, त्या दिवसानंतर त्यावर्षी ते करू नये. यामुळे, एखाद्या वर्षी श्रीगणेश स्थापना झाली नाही तर अघटित घडेल, असे होत नाही. तसेच, स्थापनेनंतर अशौच आल्यास दुसºयाकडून लगेच गणपती विसर्जन करून घ्यावे. एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झाले तरी चालतील, असे शास्त्रच सांगत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. यासोबतच, गणेश विसर्जनाबाबतीत कोणतीही अंधश्रद्धा पाळू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीReligious programmeधार्मिक कार्यक्रम