शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १०० शाळा सुरू करण्यासाठी समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 20:51 IST

राज्यात १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार शाळा निवडीचे निकष निश्चित करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय शाळा मंडळाचे व्यवस्थापन, पर्यवेक्षण व नियंत्रण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समिती स्थापन करण्यात आली आहे. समित्यांची रचना व कार्य निश्चित करण्याचे अधिकार स्थायी समितीला देण्यात आलेले आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

ठळक मुद्देशालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार शाळा निवडीचे निकष निश्चित करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय शाळा मंडळाचे व्यवस्थापन, पर्यवेक्षण व नियंत्रण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समिती स्थापन करण्यात आली आहे. समित्यांची रचना व कार्य निश्चित करण्याचे अधिकार स्थायी समितीला देण्यात आलेले आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.विधानसभा सदस्य पांडुरंग बरोरा, शशिकांत शिंदे, मंगेश कुडाळकर, डी.पी. सावंत, संदीपानराव भुमरे, तृप्ती सावंत, मनोहर भोईर, संजय पोतनीस, दीपिका चव्हाण, हनुमंत डोळस आदींनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.रायगडमधील ३२ अनधिकृत शाळांना बंदची नोटीसरायगड जिल्ह्यातील ३२ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली असून या अनधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे सूचित केले आहे तसेच त्या शाळा बंद करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.अ‍ॅड. आशिष शेलार, अ‍ॅड. पराग अळवणी, प्रशांत ठाकूर, अजित पवार, दिलीप वळसे पाटील आदींनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर या तावडे यांनी अनधिकृत शाळा बंद करताना त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे लगतच्या मान्यतापाप्त शाळेमध्ये समायोजन करण्यात येत असल्याचेही स्पष्ट केले.गडकिल्ल्यांवर लोकवर्गणीतून स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीनमहाराष्ट्रातील ५१ गडकिल्ल्यांवर स्वच्छतागृह बांधण्यासाठी सेवाभावी संस्थेने लोकवर्गणीतून उभ्या केलेल्या निधीमधून शौचालय बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.सदस्य मेधा कुलकर्णी यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता. माहितीच्या अधिकारानुसार राज्यातील ५१ किल्ल्यांवर एकही शौचालय नसल्याची बाब फेब्रुवारी २०१८ मध्ये उघडकीस आली. त्यामुळे गडकिल्ल्याचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने सेवाभावी संस्था पुणे आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यावर स्वच्छतागृह बांधण्यासाठी संस्थेने लोकवर्गणीतून निधी उभारला असून त्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८vidhan sabhaविधानसभा