शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

केरळ पूरग्रस्तांसाठी अत्यावश्यक साहित्य रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 22:17 IST

केरळमध्ये प्रचंड पावसामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना अत्यावश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थ आदी सुमारे १० लक्ष रुपये किमतीच्या वस्तू असलेला ट्रक गुरुवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला. केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेयांनी दाखविली हिरवी झेंडी : मदत करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळमध्ये प्रचंड पावसामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना अत्यावश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थ आदी सुमारे १० लक्ष रुपये किमतीच्या वस्तू असलेला ट्रक गुरुवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला. केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले.रविभवन परिसरातून केरळच्या पूरग्रस्त नागरिकांना विशेषत: महिलांसाठी आवश्यक असलेले साहित्य, कपडे, मच्छरदाणी व मुलांसाठी अत्यावश्यक मदत येथील डी. पी. जैन कंपनीच्यावतीने करण्यात आली आहे. या कंपनीचे अध्यक्ष दीपक जैन व व्यवस्थापकीय संचालक गिरीश जैन यांनी पूरग्रस्तांसाठी ही मदत दिली आहे. यासाठी गिट्टीखदान परिसरातील सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र शर्मा यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने केरळ येथील पूरग्रस्तांसाठी नागपूर येथून विविध मदत साहित्य पाठविण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदत पाठविताना दीपक जैन व गिरीश जैन यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदत पाठणाऱ्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून केरळसाठी रवाना केले.मर्चन्डाईज व्हैन्च्युरीअस प्रा. लि. च्या माध्यमातून ही मदत गोळा करण्यात आली आहे. यामध्ये ब्लॅकेट, टॉवेल, बेडशीट, महिलांसाठी आवश्यक असलेले कपडे, सॅनिटरी पॅड, ओडोमॉस क्रीम, लहान मुलांना आवश्यक असलेले सर्व साहित्य तसेच कपडे, मच्छरदाणी, साबण तसेच दैनंदिन अत्यावश्यक वस्तू व खाद्यपदार्थ असलेला ट्रक गुरुवारी रवाना करण्यात आला. केरळमध्ये आलेल्या या भीषण संकटकाळामध्ये लाखो नागरिक बेघर झाले आहे. सध्या विविध निवारा शिबिरामध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दैनंदिन आवश्यक असलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी सामाजिक दायित्व समजून केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यावेळी अविनाश बडगे, नितीन श्रावगी, आदित्य आसोपा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेKerala Floodsकेरळ पूर