शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

केरळ पूरग्रस्तांसाठी अत्यावश्यक साहित्य रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 22:17 IST

केरळमध्ये प्रचंड पावसामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना अत्यावश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थ आदी सुमारे १० लक्ष रुपये किमतीच्या वस्तू असलेला ट्रक गुरुवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला. केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेयांनी दाखविली हिरवी झेंडी : मदत करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळमध्ये प्रचंड पावसामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना अत्यावश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थ आदी सुमारे १० लक्ष रुपये किमतीच्या वस्तू असलेला ट्रक गुरुवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला. केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले.रविभवन परिसरातून केरळच्या पूरग्रस्त नागरिकांना विशेषत: महिलांसाठी आवश्यक असलेले साहित्य, कपडे, मच्छरदाणी व मुलांसाठी अत्यावश्यक मदत येथील डी. पी. जैन कंपनीच्यावतीने करण्यात आली आहे. या कंपनीचे अध्यक्ष दीपक जैन व व्यवस्थापकीय संचालक गिरीश जैन यांनी पूरग्रस्तांसाठी ही मदत दिली आहे. यासाठी गिट्टीखदान परिसरातील सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र शर्मा यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने केरळ येथील पूरग्रस्तांसाठी नागपूर येथून विविध मदत साहित्य पाठविण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदत पाठविताना दीपक जैन व गिरीश जैन यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदत पाठणाऱ्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून केरळसाठी रवाना केले.मर्चन्डाईज व्हैन्च्युरीअस प्रा. लि. च्या माध्यमातून ही मदत गोळा करण्यात आली आहे. यामध्ये ब्लॅकेट, टॉवेल, बेडशीट, महिलांसाठी आवश्यक असलेले कपडे, सॅनिटरी पॅड, ओडोमॉस क्रीम, लहान मुलांना आवश्यक असलेले सर्व साहित्य तसेच कपडे, मच्छरदाणी, साबण तसेच दैनंदिन अत्यावश्यक वस्तू व खाद्यपदार्थ असलेला ट्रक गुरुवारी रवाना करण्यात आला. केरळमध्ये आलेल्या या भीषण संकटकाळामध्ये लाखो नागरिक बेघर झाले आहे. सध्या विविध निवारा शिबिरामध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दैनंदिन आवश्यक असलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी सामाजिक दायित्व समजून केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यावेळी अविनाश बडगे, नितीन श्रावगी, आदित्य आसोपा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेKerala Floodsकेरळ पूर