शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केरळ पूरग्रस्तांसाठी अत्यावश्यक साहित्य रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 22:17 IST

केरळमध्ये प्रचंड पावसामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना अत्यावश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थ आदी सुमारे १० लक्ष रुपये किमतीच्या वस्तू असलेला ट्रक गुरुवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला. केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेयांनी दाखविली हिरवी झेंडी : मदत करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळमध्ये प्रचंड पावसामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना अत्यावश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थ आदी सुमारे १० लक्ष रुपये किमतीच्या वस्तू असलेला ट्रक गुरुवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला. केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले.रविभवन परिसरातून केरळच्या पूरग्रस्त नागरिकांना विशेषत: महिलांसाठी आवश्यक असलेले साहित्य, कपडे, मच्छरदाणी व मुलांसाठी अत्यावश्यक मदत येथील डी. पी. जैन कंपनीच्यावतीने करण्यात आली आहे. या कंपनीचे अध्यक्ष दीपक जैन व व्यवस्थापकीय संचालक गिरीश जैन यांनी पूरग्रस्तांसाठी ही मदत दिली आहे. यासाठी गिट्टीखदान परिसरातील सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र शर्मा यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने केरळ येथील पूरग्रस्तांसाठी नागपूर येथून विविध मदत साहित्य पाठविण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदत पाठविताना दीपक जैन व गिरीश जैन यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदत पाठणाऱ्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून केरळसाठी रवाना केले.मर्चन्डाईज व्हैन्च्युरीअस प्रा. लि. च्या माध्यमातून ही मदत गोळा करण्यात आली आहे. यामध्ये ब्लॅकेट, टॉवेल, बेडशीट, महिलांसाठी आवश्यक असलेले कपडे, सॅनिटरी पॅड, ओडोमॉस क्रीम, लहान मुलांना आवश्यक असलेले सर्व साहित्य तसेच कपडे, मच्छरदाणी, साबण तसेच दैनंदिन अत्यावश्यक वस्तू व खाद्यपदार्थ असलेला ट्रक गुरुवारी रवाना करण्यात आला. केरळमध्ये आलेल्या या भीषण संकटकाळामध्ये लाखो नागरिक बेघर झाले आहे. सध्या विविध निवारा शिबिरामध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दैनंदिन आवश्यक असलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी सामाजिक दायित्व समजून केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यावेळी अविनाश बडगे, नितीन श्रावगी, आदित्य आसोपा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेKerala Floodsकेरळ पूर