शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

आंदोलक-शासन एकत्र बसेल तरच पर्यावरणाची समस्या निकाली निघेल : विभागीय आयुक्त संजीव कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:18 IST

पर्यावरण तज्ज्ञ विकासविरोधी नाही आणि सरकारही पर्यावरणविरोधी नाही. दोन्ही यंत्रणांना एकत्र बसून तोडगा काढावा लागेल. अन्यथा, पर्यावरण संवर्धन आणि विकास हे दोन्ही मुद्दे कायम शत्रूत्वाचा भाव ठेवतील, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.

ठळक मुद्देकौस्तुभ चॅटर्जी आणि नंदकिशोर गांधी यांना ‘मोहन धारिया पर्यावरण पुरस्कार’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरण तज्ज्ञ विकासविरोधी नाही आणि सरकारही पर्यावरणविरोधी नाही. जशी वृक्षांची गरज आहे, तशीच मेट्रोचीही गरज आहे. शाश्वत विकास म्हणून दोन्हींचीही गरज आहे. मात्र, त्यासाठी दोन्ही यंत्रणांना एकत्र बसून तोडगा काढावा लागेल. अन्यथा, पर्यावरण संवर्धन आणि विकास हे दोन्ही मुद्दे कायम शत्रूत्वाचा भाव ठेवतील, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात वनराई फाऊंडेशनच्या वतीने संजीव कुमार यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रीन व्हिजिलचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी व अमरावती येथील कामधेनू प्राकृतिक ऊर्जा केंद्राचे प्रमुख नंदकिशोर गांधी यांना ‘स्व. डॉ. मोहन धारिया पर्यावरण पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सृष्टी पर्यावरण मंडळाचे स्वानंद सोनी उपस्थित होते. व्यासपीठावर वनराईचे समीर सराफ, डॉ. पिनाक दंदे, अनंत घारड, प्रकाश तागडे, नीलेश खांडेकर उपस्थित होते.लोकशाहीमुळेच विकास होतो, असे नाही तर लोकांच्या सहभागातून शाश्वत विकास साधला जातो. लोकशाहीमध्ये नेतृत्व जसे विचार करेल, त्याअनुषंगाने विकासाचे वेगवेगळे मार्ग अस्तित्वात येत असतात. मुंबईमध्ये मेट्रोसाठी आरे वनांच्या कत्तलीवरून बराच आगडोंब उसळला. मात्र, मेट्रोही गरजेची आहे. अशास्थितीत दोन्ही यंत्रणांनी एकत्र बसून उपाय शोधला असता तर एवढा गोंधळ निर्माण झाला नसता. त्यासाठी आंदोलक आणि शासकीय यंत्रणेने पुढाकार घेणे गरजेचे होते.यावर्षी गेल्या ५० वर्षात जेवढा पाऊस झाला त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक होता. मात्र, असे असतानाही अनेक ठिकाणांची पाण्याची तूट भरून निघाली नाही. शेकडो वर्षे आधी समाजसुधारकांनी महाराष्ट्र घडविला आणि त्याची प्रेरणा घेऊन आजही तशी माणसे घडत आहेत. मात्र, उत्तर भारतात तसे चित्र नाही. शासकीय योजना अंमलात येण्यापूर्वीच इथल्या लोकसहभागातून अनेक कामे मार्गी लागली आहेत. तीच प्रेरणा संपूर्ण भारताला देणे गरजेचे असल्याचे डॉ. संजीव कुमार यावेळी म्हणाले. याप्रसंगी सत्कारमूर्ती कौस्तुभ चॅटर्जी व नंदकिशोर गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक किशोर धारिया यांनी केले. परिचय रेखा दंडिगे-घिया यांनी करवून दिला. संचालन अजय पाटील यांनी केले. तर आभार नीलेश खांडेकर यांनी मानले.

टॅग्स :environmentपर्यावरण